शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

स्वच्छ भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे

By admin | Updated: November 10, 2014 01:00 IST

आरोग्यदायी वातावरणासाठी कार्यालय तसेच परिसर स्वच्छतेसोबतच आपले गाव व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावे,

जिल्हा परिषद : शिवाजी जोंधळे यांचे आवाहननागपूर : आरोग्यदायी वातावरणासाठी कार्यालय तसेच परिसर स्वच्छतेसोबतच आपले गाव व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले. स्वच्छ भारत अभियान संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जि.प.च्या जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जि.प. प्रांगणात नुकतेच श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जोंधळे बोलत होते. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह जि.प.चे अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभागी झाले होते.श्रमदान मोहिमेंतर्गत जि.प.च्या सर्व विभागाची कार्यालयीन स्वच्छता करण्यात आली. याची पाहणी जोंधळे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पंचायत विभागाचे वासुदेव भांडारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आदींनी केली. स्वच्छ भारत मिशनतर्फे श्रमदान मोहीम त्रिस्तरीय पंचायत राज संस्था, सर्व शासकीय, निमशासकीय स्तरावर राबविण्यात येत आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक वेळा किमान दोन तास श्रमदान करणे अपेक्षित आहे. या दृष्टीने जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्र वारी तसेच तिसऱ्या व पाचव्या शनिवारी दुपारी ३.३०ते ५.३० या कालावधीत श्रमदान मोहीम जि.प.मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी सामूहिक स्वरूपात जि.प.इमारत व परिसर स्वच्छता आणि इतर नियोजित दिवशी प्रत्येक विभागाला आपल्या कार्यालयाची स्वच्छता करावी लागणार आहे.पंचायत समिती स्तरावर दर शुक्र वारी ३.३० ते ५.३० या कालावधीत श्रमदान कार्यक्र माचे आयोजन गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना या कार्यक्र मात सहभागी करून अंमलबजावणी करावयाची आहे. सामाजिक संघटना, खासगी शैक्षणिक संस्था, खासगी उपक्र म व व्यावसायिक यांचाही यात सहभाग राहणार आहे. या कार्यक्र मासाठी जि.प.च्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे विक्र ांत इंगळे, दिलीप वझलवार, भूपेश मेहर, निखील रोंदळकर, दिनेश मासोदकर, राजेश चौधरी, आशीष रावळे, अविनाश हुमणे, महेश जाचक, राधा रहांगडाले, चैताली देशमुख, अंजली पाटणकर, मिलिंद मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)