शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक घरात जिजाऊ झाली पाहिजे

By admin | Updated: June 17, 2014 00:54 IST

आधुनिकतेच्या हव्यासात आम्ही पुन्हा इंग्रजीच्याच विळख्यात अडकलो आहोत. याची आपल्याला जाणीव आता व्हायला हवी. आपला धर्म, आपले राष्ट्र, आपला समाज आणि आपले कुटुंब शाबूत ठेवायचे असेल

अपर्णा रामतीर्थकर : जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार समारंभ नागपूर : आधुनिकतेच्या हव्यासात आम्ही पुन्हा इंग्रजीच्याच विळख्यात अडकलो आहोत. याची आपल्याला जाणीव आता व्हायला हवी. आपला धर्म, आपले राष्ट्र, आपला समाज आणि आपले कुटुंब शाबूत ठेवायचे असेल तर प्रत्येक घरात जिजाऊसारखी आई तयार झाली पाहिजे. आज ही गरज प्रकर्षाने जाणवायला लागली असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मेळघाटच्या सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. रामतीर्थकर म्हणाल्या, आधुनिक जीवनशैलीतून आपली परंपरा आणि संस्कृती नष्ट होते आहे. अन्य समाज त्यांच्या कट्टरवादाचा पुरस्कार करतात तर हिंदू मात्र मवाळ भूमिका घेतात. मुलींच्या बदललेल्या पोशाखावरून ते स्पष्ट होतेच आहे. या प्रकारात आईचा पदरही हल्ली सापडत नाही. पण आईचा पदर मोलाचे काम करतो. मुले शिक्षणाच्या निमित्ताने दूर राहतात. होस्टेलमध्ये पालकांपासून दूर राहतात आणि कुटुंबापासूनही दूर करतात. पोटच्या गोळ्यांना शिक्षण मिळावे म्हणून पालक खस्ता खातात पण मुले शिक्षण घेतल्यावर पालकांनाच अडगळ समजतात. याचाही विचार करण्याची वेळ आज आली आहे. घरातील संस्कार पक्का असला तर मुले कुठेही असली तरी त्यांचे विचार परिपक्व होत जातील. हा संस्कार आई आणि वडिलांनी मिळूनच करायला हवा पण त्यातही आई महत्त्वाची आहे. त्यामुळेच जिजाऊंसारखी आई घराघरांत तयार झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविकात अजेय देशमुख यांनी प्रतिष्ठानची माहिती दिली. नीता पांडे व त्यांच्या चमूने पोवाडा सादर केला. मानपत्राचे वाचन प्रसन्न बारलिंगे यांनी केले. डॉ. स्मिता कोल्हे यांचे स्वागत संध्या अलकरी आणि अनिल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी चिंचाळकर यांनी तर आभार संजय बाराहाते व अपूर्वा मार्डिकर यांनी मानले. (प्रतिनिधी)