शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

राजकीय प्रकरणांसाठी प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालय हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजकारणातील गुन्हेगारीकरण संपणे आवश्यक आहे; परंतु जनतेच्या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनांमुळे दाखल प्रकरणांना वेगळ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राजकारणातील गुन्हेगारीकरण संपणे आवश्यक आहे; परंतु जनतेच्या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनांमुळे दाखल प्रकरणांना वेगळ्या श्रेणीत ठेवले गेले पाहिजे. राजकीय प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालयाची स्थापना होणे गरजेचे आहे, असे मत मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गौतम यांनी व्यक्त केले. बुधवारी ‘लोकमत भवन’ येथे ‘लोकमत’ समूहातील संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चेदरम्यान ते बोलत होते.

अनेकदा सभागृहातील कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. सभागृहाचे कामकाज चालविणे ही विरोधी पक्षांचीदेखील जबाबदारी आहे. गोंधळ करून कामकाजात अडथळे आणल्यावर सत्ताधाऱ्यांनाच फायदा होतो, विरोधकांना त्याचा काहीच लाभ मिळत नाही. विरोधकांनी त्यांची भूमिका रेकॉर्डवर आणली पाहिजे. अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत नारेबाजी करणे टाळले पाहिजे. विरोध दर्शविण्यासाठी सभात्याग, जागेवर नारेबाजी करून बसून जाणे यासारख्या संसदीय आयुधांचा उपयोग केला पाहिजे. मध्यप्रदेश विधानसभा सदस्यांची सक्रियता वाढावी यासाठी त्यांना त्यांच्याच भाषणाची सीडी उपलब्ध करून देणार आहे. जर विधानसभा व संसद लोकशाहीची मंदिरे असतील, तर लोकप्रतिनिधी तेथील पुजारी आहेत. जनतेचा विधिमंडळावर विश्वास कायम ठेवण्यासाठी पुजाऱ्यांना त्यांच्या भूमिकेत सुधारणा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मध्य भारत विकास संघाचे संयोजक रविनिश पांडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

विधान परिषद स्थापनेचे समर्थन

मध्यप्रदेशमध्ये विधान परिषदेची स्थापना करण्याची मागणी बऱ्याच काळापासून आहे. परिषदेसाठी इमारतदेखील बनून तयार आहे. विधानसभेने ठरावदेखील मंजूर केला आहे. आता केंद्राला यासंदर्भात निर्णय करायचा आहे, असे गिरीश गौतम यांनी सांगितले.

१,१६० असंसदीय शब्दांवर बंदी येणार

गिरीश गौतम यांच्या पुढाकारानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी असंसदीय ठरविलेल्या शब्दांना एकत्रित करण्यात आले. यानंतर १ हजार १६० शब्द निश्चित करण्यात आले. सभागृहात या शब्दांच्या वापरावर बंदी आणण्यात येणार आहे.

विशेषाधिकारावर मंथन

मध्यप्रदेशात विशेषाधिकारांसंदर्भात कुठलेही नियम बनलेले नाहीत. यासंदर्भात आता पुढाकार घेण्यात येणार आहे. प्रोटोकॉल समिती बनविण्यात आली आहे. ही समिती विशेषाधिकारावर मंथन करणार आहे. सोबतच विधानसभा अध्यक्ष सल्लागार समितीदेखील बनविण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून संसदेच्या कामकाजाबाबत सामूहिक निर्णय घेण्यात येईल, असे गौतम यांनी सांगितले.