शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोज तीन जणांना चावतात साप

By admin | Updated: July 24, 2014 01:04 IST

नागपूर विभागात जानेवारी ते ३० जून २०१४ या दरम्यान ६८१ जणांना साप चावले. यावरून रोज तीन जणांना सर्पदंश होत असल्याचे समोर आले आहे. सर्पदंशाची ही संख्या मोठी असली तरी

नागपूर विभागात ६८१ जणांना सर्पदंश : वर्धेत सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिकसुमेध वाघमारे - नागपूरनागपूर विभागात जानेवारी ते ३० जून २०१४ या दरम्यान ६८१ जणांना साप चावले. यावरून रोज तीन जणांना सर्पदंश होत असल्याचे समोर आले आहे. सर्पदंशाची ही संख्या मोठी असली तरी याच्या तुलनेत मृत्यूची संख्या फार कमी आहे. सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना वर्धा जिल्ह्यातील आहेत. येथे २६८ जणांना साप चावले, तर वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे २९ जणांना साप चावल्याची नोंद आहे.भारतामध्ये दरवर्षी २ लाख ५० हजार लोकांना सर्पदंश होतो आणि यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू हा वेळेवर प्रथमोपचार न झाल्यामुळे होतो. आजही समाजामध्ये सापांविषयी गैरसमज अंधश्रध्दा रूढ आहेत. परंतु जनजागृती आणि विज्ञानाच्या माध्यमातून त्या दूर होताना दिसत आहे. साप या प्राण्याविषयी मानवाला प्रचंड भीती वाटते आणि या कारणाने मानव त्याला ठार करतो.तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक साप चावण्यामागे आपलीच काहिना काही चूक असते. कारण कोणताच साप स्वत:हून तसेच विनाकारण कधीच चावा घेत नाही. सर्पदंश टाळण्यासारखा आहे, परंतु नागपूर विभागात जानेवारी ते जून २०१४ या कालावधीत ६८१ जणांना सर्पदंश झाले. नागपूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या सहा महिन्यात चंद्रपूरमध्ये सर्पदंशाने एकाही मृत्यूची नोंद नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गाव अरण्यात आणि त्याला लागून आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमणावर घडतात. यातच आरोग्य व्यवस्थाही बळकट नाही. असे असताना, सहा महिन्यात फक्त २९ जणांना साप चावल्याची तर एका जणाचा मृत्यूची नोंद आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वात जास्त सर्पदंशाची नोंद आहे परंतु मृत्यूची संख्या एक आहे. याच्या खालोखाल नागपूर जिल्ह्यात १३८ सर्पदंश तर दोघांचा मृत्यूची नोंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये भंडाऱ्यात ८८ जणांना सर्पदंश, एकाचा मृत्यू, गोंदियात ७७ जणांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात ८१ जणांना सर्पदंश झाले आहे. अशी घ्या काळजी़़़जिथे साप असण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी शक्यतोवर खाली झोपू नये़ रात्री घराबाहेर पडताच बुट घालून निघावे़ हातात एक काठी ठेवावी़ चालताना काठीने जमिनीवर ठक ठक करीत चालावे. धरणीचे कंपनं सापाला कळतात़ त्यामुळे तोच वाटेतून दूर होतो़ आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यामुळे अशीच काळजी वसतिगृहात राहताना घ्यायला हवी. गावठी उपचार न करता सर्पदंश झाल्यावर रुग्णालयात दाखल करावे.