शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

रोज तीन जणांना चावतात साप

By admin | Updated: July 24, 2014 01:04 IST

नागपूर विभागात जानेवारी ते ३० जून २०१४ या दरम्यान ६८१ जणांना साप चावले. यावरून रोज तीन जणांना सर्पदंश होत असल्याचे समोर आले आहे. सर्पदंशाची ही संख्या मोठी असली तरी

नागपूर विभागात ६८१ जणांना सर्पदंश : वर्धेत सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिकसुमेध वाघमारे - नागपूरनागपूर विभागात जानेवारी ते ३० जून २०१४ या दरम्यान ६८१ जणांना साप चावले. यावरून रोज तीन जणांना सर्पदंश होत असल्याचे समोर आले आहे. सर्पदंशाची ही संख्या मोठी असली तरी याच्या तुलनेत मृत्यूची संख्या फार कमी आहे. सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना वर्धा जिल्ह्यातील आहेत. येथे २६८ जणांना साप चावले, तर वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे २९ जणांना साप चावल्याची नोंद आहे.भारतामध्ये दरवर्षी २ लाख ५० हजार लोकांना सर्पदंश होतो आणि यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू हा वेळेवर प्रथमोपचार न झाल्यामुळे होतो. आजही समाजामध्ये सापांविषयी गैरसमज अंधश्रध्दा रूढ आहेत. परंतु जनजागृती आणि विज्ञानाच्या माध्यमातून त्या दूर होताना दिसत आहे. साप या प्राण्याविषयी मानवाला प्रचंड भीती वाटते आणि या कारणाने मानव त्याला ठार करतो.तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक साप चावण्यामागे आपलीच काहिना काही चूक असते. कारण कोणताच साप स्वत:हून तसेच विनाकारण कधीच चावा घेत नाही. सर्पदंश टाळण्यासारखा आहे, परंतु नागपूर विभागात जानेवारी ते जून २०१४ या कालावधीत ६८१ जणांना सर्पदंश झाले. नागपूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या सहा महिन्यात चंद्रपूरमध्ये सर्पदंशाने एकाही मृत्यूची नोंद नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गाव अरण्यात आणि त्याला लागून आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमणावर घडतात. यातच आरोग्य व्यवस्थाही बळकट नाही. असे असताना, सहा महिन्यात फक्त २९ जणांना साप चावल्याची तर एका जणाचा मृत्यूची नोंद आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वात जास्त सर्पदंशाची नोंद आहे परंतु मृत्यूची संख्या एक आहे. याच्या खालोखाल नागपूर जिल्ह्यात १३८ सर्पदंश तर दोघांचा मृत्यूची नोंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये भंडाऱ्यात ८८ जणांना सर्पदंश, एकाचा मृत्यू, गोंदियात ७७ जणांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात ८१ जणांना सर्पदंश झाले आहे. अशी घ्या काळजी़़़जिथे साप असण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी शक्यतोवर खाली झोपू नये़ रात्री घराबाहेर पडताच बुट घालून निघावे़ हातात एक काठी ठेवावी़ चालताना काठीने जमिनीवर ठक ठक करीत चालावे. धरणीचे कंपनं सापाला कळतात़ त्यामुळे तोच वाटेतून दूर होतो़ आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यामुळे अशीच काळजी वसतिगृहात राहताना घ्यायला हवी. गावठी उपचार न करता सर्पदंश झाल्यावर रुग्णालयात दाखल करावे.