शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परीक्षा न घेताही नागपूर विभाग तळालाच, अमरावती विभाग राज्यात ‘सेकंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 11:04 IST

Nagpur News- कोरोना संक्रमणाने ना शाळा, ना परीक्षा तरीही निकालाने विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव केला आहे. नागपूर विभागात गाेंदिया तर अमरावती विभागात अकाेला, यवतमाळ जिल्हा ‘टाॅप’ ठरला.

ठळक मुद्देराज्यात शेवटी येण्यात नागपूर विभागाची हॅटट्रिकनागपूर ९९.३४, तर अमरावती ९९.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर / अमरावती : परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नागपूर विभागात ९९.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी सतत तिसऱ्या वर्षी विभागाचा राज्यात शेवटचाच क्रमांक राहिला. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९९.८४ टक्के, तर पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ८७.६६ टक्के इतका आहे. त्या तुलनेत यंदा अमरावती विभागाचा निकाल ४.८४ टक्क्यांनी वाढून ताे ९९.९८ टक्के लागला. राज्यात कोकणनंतर अमरावती दुसऱ्या स्थानी आहे. कोरोना संक्रमणाने ना शाळा, ना परीक्षा तरीही निकालाने विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव केला आहे. नागपूर विभागात गाेंदिया तर अमरावती विभागात अकाेला, यवतमाळ जिल्हा ‘टाॅप’ ठरला.

दरवर्षी अगोदर बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा परीक्षाविना निकाल हे सूत्र अवलंबविल्याने दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. नववी, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या ३०-३०-४० या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालाची टक्केवारी बघता शाळांनी विद्यार्थ्यांना भरभरून गुण दिल्याचे वास्तव आहे.

नागपूर विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्ये देखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७५ हजार ५०७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ४२१ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.४८ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.२१ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ६२ हजार १५९ पैकी १ लाख ६१ हजार ०९६ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.

अमरावती विभागात दहावीसाठी नोंदणी झालेले नियमित विद्यार्थी १ लाख ५८ हजार ८३९ होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार ८३७ मूल्यांकन प्राप्त असून, १ लाख ५८ हजार ८१६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी दहावीचा निकाल ९५.१४ टक्के लागला होता. यंदा निकालात ९९.९८ टक्के लागला आहे. विभागात इयत्ता दहावीसाठी १,६८,६०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६७,४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १ लाख ५९ लाख ३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकोला ९९.९९ टक्के, अमरावती ९९.९७ टक्के, बुलडाणा ९९.९८ टक्के, यवतमाळ ९९.९९ टक्के आणि वाशिम जिल्हा ९९.९८ टक्के निकाल जाहीर झाल्याची माहिती पत्रपरिषदेतून अमरावती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव नीलिमा टाके, सहसचिव जयश्री राऊत यांनी दिली.

गोंदिया जिल्हा नागपूर विभागात ‘टाॅप’

नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी सर्वांत जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १९ हजार ७१७ म्हणजेच ९९.६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातील नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून उत्तीर्णांची टक्केवारी ९९.२८ टक्के इतकी आहे तर विभागात उत्तीर्णांची सर्वांत कमी टक्केवारी चंद्रपूर जिल्ह्याची आहे. तेथे ३० हजार १२५ पैकी २९ हजार ८५५ म्हणजे ९९.१० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल