शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परीक्षा न घेताही नागपूर विभाग तळालाच, अमरावती विभाग राज्यात ‘सेकंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 11:04 IST

Nagpur News- कोरोना संक्रमणाने ना शाळा, ना परीक्षा तरीही निकालाने विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव केला आहे. नागपूर विभागात गाेंदिया तर अमरावती विभागात अकाेला, यवतमाळ जिल्हा ‘टाॅप’ ठरला.

ठळक मुद्देराज्यात शेवटी येण्यात नागपूर विभागाची हॅटट्रिकनागपूर ९९.३४, तर अमरावती ९९.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर / अमरावती : परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नागपूर विभागात ९९.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी सतत तिसऱ्या वर्षी विभागाचा राज्यात शेवटचाच क्रमांक राहिला. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९९.८४ टक्के, तर पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ८७.६६ टक्के इतका आहे. त्या तुलनेत यंदा अमरावती विभागाचा निकाल ४.८४ टक्क्यांनी वाढून ताे ९९.९८ टक्के लागला. राज्यात कोकणनंतर अमरावती दुसऱ्या स्थानी आहे. कोरोना संक्रमणाने ना शाळा, ना परीक्षा तरीही निकालाने विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव केला आहे. नागपूर विभागात गाेंदिया तर अमरावती विभागात अकाेला, यवतमाळ जिल्हा ‘टाॅप’ ठरला.

दरवर्षी अगोदर बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा परीक्षाविना निकाल हे सूत्र अवलंबविल्याने दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. नववी, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या ३०-३०-४० या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालाची टक्केवारी बघता शाळांनी विद्यार्थ्यांना भरभरून गुण दिल्याचे वास्तव आहे.

नागपूर विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्ये देखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७५ हजार ५०७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ४२१ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.४८ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.२१ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ६२ हजार १५९ पैकी १ लाख ६१ हजार ०९६ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.

अमरावती विभागात दहावीसाठी नोंदणी झालेले नियमित विद्यार्थी १ लाख ५८ हजार ८३९ होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार ८३७ मूल्यांकन प्राप्त असून, १ लाख ५८ हजार ८१६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी दहावीचा निकाल ९५.१४ टक्के लागला होता. यंदा निकालात ९९.९८ टक्के लागला आहे. विभागात इयत्ता दहावीसाठी १,६८,६०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६७,४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १ लाख ५९ लाख ३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकोला ९९.९९ टक्के, अमरावती ९९.९७ टक्के, बुलडाणा ९९.९८ टक्के, यवतमाळ ९९.९९ टक्के आणि वाशिम जिल्हा ९९.९८ टक्के निकाल जाहीर झाल्याची माहिती पत्रपरिषदेतून अमरावती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव नीलिमा टाके, सहसचिव जयश्री राऊत यांनी दिली.

गोंदिया जिल्हा नागपूर विभागात ‘टाॅप’

नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी सर्वांत जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १९ हजार ७१७ म्हणजेच ९९.६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातील नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून उत्तीर्णांची टक्केवारी ९९.२८ टक्के इतकी आहे तर विभागात उत्तीर्णांची सर्वांत कमी टक्केवारी चंद्रपूर जिल्ह्याची आहे. तेथे ३० हजार १२५ पैकी २९ हजार ८५५ म्हणजे ९९.१० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल