शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आकाश कोसळले तरी, न्यायदान थांबायला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 15:10 IST

Nagpur News आकाश कोसळले तरी, न्यायदान सुरू राहिले पाहिजे असे मत देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे कोरोनामुळे देशात धोकादायक परिस्थिती

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनामुळे देशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, या परिस्थितीतही न्यायदान प्रक्रिया थांबवली जाऊ शकत नाही. आकाश कोसळले तरी, न्यायदान सुरू राहिले पाहिजे असे मत देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे रामगिरी परिसरातील न्यायिक अधिकारी प्रशिक्षण केंद्रात स्थापित ई-रिसोर्स सेंटरचे शनिवारी दुपारी न्या. बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे न्यायालयांमध्ये नियमित पद्धतीने कामकाज करणे अशक्य होते. परिणामी तातडीने आवश्यक उपाययोजना करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणे ऐकायला सुरुवात केली. न्यायदान प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी न्याय व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने परिश्रम घेतले. आगामी आव्हानांनाही असेच तोंड देऊन पुढे जायचे आहे असे न्या. बोबडे यांनी सांगितले.

न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर वकिलांमधील असमानतेचा प्रश्न पुढे आला. काही वकिलांकडे तंत्रज्ञान होते तर, काहींकडे नव्हते. न्यायदान प्रक्रिया बाधित होऊ नये आणि सर्वांना समान संधी मिळावी याकरिता सदर समस्येवर उपाय करणे आवश्यक होते. ई-रिसोर्स सेंटर त्याचाच भाग आहे. या सेंटरमधून गरजू वकिलांना देशातील कोणत्याही न्यायालयात याचिका दाखल करता येतील. तसेच, ऑनलाईन सुनावणीत सहभागी होता येईल. देशातील या पहिल्या सेंटरला देशाचा केंद्र बिंदू असलेल्या नागपुरातून सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण देशामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती न्या. बोबडे यांनी दिली.

प्रलंबित प्रकरणाचा प्रश्न भेडसावेल

कोरोनामुळे सर्व न्यायालयांमध्ये केवळ अत्यावश्यक व तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जात आहे. परिणामी, येणाऱ्या काळात प्रलंबित प्रकरणांचा प्रश्न भेडसावेल याकडे न्या. बोबडे यांनी लक्ष वेधले. तसेच, या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मध्यस्थी न्यायव्यवस्थेचा उपयोग करणे अत्यावश्यक ठरेल असे सांगून या उपायाचा गांभिर्याने विचार करण्याचे पक्षकारांना आवाहन केले.

टॅग्स :Courtन्यायालय