शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अ‍ॅनलॉकनंतरही ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरू नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

जलालखेडा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बस सेवा बंद करण्यात आली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन ...

जलालखेडा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बस सेवा बंद करण्यात आली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या सेवा पुन्हा बंद करण्यात आल्या. अ‍ॅनलॉकनंतर ७ जूनपासून बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील काटोल आगाराने अजूनही जलालखेडा ते नरखेड व काटोल ते अंबाडा बस सेवा सुरू केलेली नाही. अनलॉकला आठवडा उलटूनही बस सेवा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे कृषी विषयक कार्यालयीन कामाकरिता शेतकऱ्यांना नरखेड येथील कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जावे लागते. परंतु या मार्गावरील बस सेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जलालखेडा परिसरात जवळपास २० ते ३० गावे आहेत. पण सध्या सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने येथील नागरिकांना तालुक्याची स्थळी जाण्यासाठी खाजगी वाहनांना जास्त पैसे द्यावे लागतात. अंबाडा हे गाव नरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे त्या बाजूने खासगी वाहनेसुद्धा जात नाही. त्या भागातील नागरिकांना खरेदीसाठी किंवा कामानिमित्त जलालखेडा, काटोल, नरखेड जाण्याकरिता एसटी शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहे.

---

जलालखेडा ते नरखेड व काटोल ते अंबाडा या दोन्ही मार्गावरील बस सेवा एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल.

- कुलदीप रंगारी, व्यवस्थापक, काटोल आगार

----

जलालखेडा ते नरखेड बस सेवा बंद असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतीच्या कामासाठी नरखेड येथील कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात जावे लागते. परंतु या मार्गावरील बस बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण जात आहे. त्यामुळे या मार्गावरील बस सेवा लवकर सुरू करण्यात यावी.

- हेमंत ठोंबरे, शेतकरी, मुक्तापूर.