शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कतेनंतरही रेल्वेखाली आत्महत्येचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

नागपूर : गुन्हेगारीसह अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेस्थानक व परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. परिणामी रेल्वेखाली होणाऱ्या आत्महत्यांची संख्या ...

नागपूर : गुन्हेगारीसह अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेस्थानक व परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. परिणामी रेल्वेखाली होणाऱ्या आत्महत्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. परंतु अद्याप पूर्ण नियंत्रण मिळविता येणे शक्य झाले नाही. मागील अडीच वर्षांमध्ये नागपूर लोहमार्ग जिल्ह्यांतर्गत ६३ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्या. याच काळात रूळ ओलांडणाऱ्या शंभरावर नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.

रेल्वे परिसरातील गुन्हेगारी, तस्करी, अवैध विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेस्थानक व परिसरात गस्त वाढविली असूनही रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रकार सुरूच आहे. नागपूर लोहमार्ग जिल्ह्यातील सहा ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२१ या काळात ६३ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्या. नागपूर ठाण्याचा विचार केल्यास २०१९ या वर्षभरात ७ जणांनी आत्महत्या केल्या. २०२० मध्ये बराच काळ रेल्वे बंद होत्या. शहरातही लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. यानंतरही आत्महत्येच्या ५ घटनांची नोंद झाली. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यांमध्ये चार आत्महत्यांची नोंद झाली आहे. इतवारी ठाण्यात २०१९ मध्ये ९, २०२० मध्ये २ तर चालू वर्षात एका आत्महत्येची नोंद झाली आहे. रुळाशेजारील गावांमध्ये सतत जनजागृती केली जाते. त्यानंतरही रुळ ओलांडताना रेल्वेची धडक लागून मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. मागील अडीच वर्षांमध्ये ११३ जणांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला. सर्वाधिक २२ मृत्यू वर्धा ठाण्यांतर्गत झाले आहेत. त्यापाठोपाठ नागपूर ठाण्याचा क्रमांक लागतो.

.............

विविध कारणांनी झालेले मृत्यू

रुळ ओलांडताना - ११३

इलेक्ट्रिक शॉकमुळे - १८

आत्महत्या - ६३

अन्य कारणे -३४०

रेल्वेतूनपडून ९२ जणांचा मृत्यू

प्रवाशांना वारंवार आवाहन करूनही धावत्या रेल्वेत चढणे किंवा उतरण्याचा प्रकाराला आळा घालता येऊ शकला नाही. धावत्या रेल्वेतून पडून ९२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद नागपूर लोहमार्ग जिल्ह्यात झाली आहे. नागपूर ठाण्यात १४, इतवारीत १९ तर गोंदिया ठाण्यात दोन वर्षांमध्ये २२ जणांचा रेल्वेखाली पडून मृत्यू झाला आहे.

.............