शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:21 IST

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा घडविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन ७ आॅगस्ट रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा यासह एकूण २४ मागण्या सरकारकडे केल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी : ७ आॅगस्ट रोजी मुंबईत राष्ट्रीय महाअधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा घडविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन ७ आॅगस्ट रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा यासह एकूण २४ मागण्या सरकारकडे केल्या जाणार आहेत.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्यावर्षी नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन झाल्यानंतर राज्य सरकारने नॉन क्रिमिलेयरची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपये केली. ८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर लाखो ओबीसींचा मोर्चा काढल्यानंतर राज्य सरकारने ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. आॅगस्ट २०१७ मध्ये दिल्लीतील अधिवेशनानंतर केंद्र सरकारने क्रिमिलेयरची मर्यादा सहावरून आठ लाख रुपये केली. ओबीसी समाजाच्या एकत्रिकरणाचे हे फलित आहे. आता राज्याच्या धर्तीवर केंद्र सरकारने स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी मुंबईच्या राष्ट्रीय अधिवनेशनात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह ओबीसी समाजातील सर्वपक्षीय आमदार, खासदार, नेते यांच्यासह देशभरातील १५ हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या यांचा सत्कार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अशोक जीवतोडे, प्रमोद मानमोडे, राजूरकर, रमण पैगवार, त्रिशरण सहारे, सुधांशु मोहोड आदी उपस्थित होते.मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्याओबासीला केंद्रात २७ टक्के तर राज्यात १९ टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण संविधानानुसार देण्यात आलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना ओबीसीच्या कोट्यातील आरक्षण देऊ नये, स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केली.अशा आहेत ओबीसींच्या मागण्या

  • ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी.

 

  • मंडल आयोगाची नच्चिपन समिती आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या.

 

  • ओबीसी शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी.

 

  • ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे.

 

  • ओबीसींसाठी लावण्यात आलेली नॉन क्रिमिलेयरची अट रद्द करावी.

 

  • ओबीसींसाठी विधानसभा आणि लोकसभेसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत.

 

  • महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न प्रदान करावा.

 

  • ओबीसी प्रवर्गांना अ‍ॅट्रॉसिटीमध्ये सहभागी करावे.

 

  • ओबीसी रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी.

 

  • न्यायालयीन व्यवस्थेतही ओबीसी आरक्षण लागू करावे.

 

  • राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा द्यावा.

 

  • ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी. इतार मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळास लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा.

 

  • महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय १० रुपयात देण्यात यावे.

 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीBabanrao Taywadeबबनराव तायवाडे