शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेती कोर्ट किंवा लवाद स्थापन करावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायदे अनेक आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायदे अनेक आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवायच्या असतील तर राज्यात व देशात शेती कोर्ट किंवा शेतकरी लवादांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.

बीआरएसपीतर्फे उपरोक्त प्रश्नांसह राज्यातील जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांना घेऊन ५० दिवसीय जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना सुरेश माने म्हणाले, आगामी काळात नागरिकत्व व एनआरसीच्या विरोधातील लढा तीव्र करावा लागेल. वसतिगृहांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, ओबीसींची जनगणना करण्यात यावी, भीमा कोरेगाव आंदाेलनातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, मागासवर्गीय मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, वनवासी शब्दाला कायद्याने बंदी घालावी आदी प्रश्नांना घेऊन ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे.

३ जानेवारी रोजी गडचिरोलीतील आलापत्ती येथून या यात्रेची सुरुवात होईल. संपूर्ण राज्यभरात ही यात्रा फिरेल. ७ मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. त्यानंतर मार्च महिन्यात पक्षाचे तीन दिवसीय पंचवार्षिक अधिवेशन होईल. तसेच फेब्रुवारीपासून राज्यभरात आरक्षण परिषदा घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रपरिषदेला रमेश पाटील, विशेष फुटाणे, भास्करराव बांबाेडे, विश्रांती झांबरे, शरद वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.