शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

समता, महिलातही एमपीआयडी

By admin | Updated: January 19, 2016 03:57 IST

आर्थिक घोटाळ्यामुळे बंद पडलेल्या समता, महिला व अन्य सहकारी संस्थांच्या प्रकरणातही महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध

हायकोर्टाची स्वत:च दखल : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या संस्थानागपूर : आर्थिक घोटाळ्यामुळे बंद पडलेल्या समता, महिला व अन्य सहकारी संस्थांच्या प्रकरणातही महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम(एमपीआयडी)अंतर्गत गुन्हा नोंदविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून, पोलीस महासंचालक व मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात परीक्षण करून पुढील कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सोमवारी दिले.सर्वोच्च न्यायालयाने ‘सोमा वि. आंध्र प्रदेश शासन’ प्रकरणात सहकारी संस्थांतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातही एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. उच्च न्यायालयाने श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा ठगबाज समीर जोशीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर विषयाची व्याप्ती वाढवून वरीलप्रमाणे निर्देश दिले. हे प्रकरण आता फौजदारी रिट याचिका म्हणून हाताळण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक व मुख्य न्यायदंडाधिकारी यांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करून दोन आठवड्यात उत्तर सादर करायचे आहे. काही वर्षांपूर्वी समता, महिला व अन्य काही सहकारी संस्थांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. गुंतवणूकदारांना अद्याप त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. आयुष्यभराची कमाई बुडल्यामुळे अनेकांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.(प्रतिनिधी)समीर जोशीचा जामीन अर्ज मागेएमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यामुळे उच्च न्यायालयाने समीर जोशीला जामीन देण्यास नकार दिला. परिणामी जोशीने सोमवारी संबंधित अर्ज मागे घेतला. समीरने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना फसविले. या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीरला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. समीरतर्फे अ‍ॅड. आदिल मिर्झा तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे व नीरज जावडे यांनी बाजू मांडली.