शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

समता, महिलातही एमपीआयडी

By admin | Updated: January 19, 2016 03:57 IST

आर्थिक घोटाळ्यामुळे बंद पडलेल्या समता, महिला व अन्य सहकारी संस्थांच्या प्रकरणातही महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध

हायकोर्टाची स्वत:च दखल : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या संस्थानागपूर : आर्थिक घोटाळ्यामुळे बंद पडलेल्या समता, महिला व अन्य सहकारी संस्थांच्या प्रकरणातही महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम(एमपीआयडी)अंतर्गत गुन्हा नोंदविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून, पोलीस महासंचालक व मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात परीक्षण करून पुढील कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सोमवारी दिले.सर्वोच्च न्यायालयाने ‘सोमा वि. आंध्र प्रदेश शासन’ प्रकरणात सहकारी संस्थांतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातही एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. उच्च न्यायालयाने श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा ठगबाज समीर जोशीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर विषयाची व्याप्ती वाढवून वरीलप्रमाणे निर्देश दिले. हे प्रकरण आता फौजदारी रिट याचिका म्हणून हाताळण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक व मुख्य न्यायदंडाधिकारी यांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करून दोन आठवड्यात उत्तर सादर करायचे आहे. काही वर्षांपूर्वी समता, महिला व अन्य काही सहकारी संस्थांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. गुंतवणूकदारांना अद्याप त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. आयुष्यभराची कमाई बुडल्यामुळे अनेकांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.(प्रतिनिधी)समीर जोशीचा जामीन अर्ज मागेएमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यामुळे उच्च न्यायालयाने समीर जोशीला जामीन देण्यास नकार दिला. परिणामी जोशीने सोमवारी संबंधित अर्ज मागे घेतला. समीरने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना फसविले. या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीरला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. समीरतर्फे अ‍ॅड. आदिल मिर्झा तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे व नीरज जावडे यांनी बाजू मांडली.