शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

मिरगी हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:09 IST

नागपूर : विवाहापूर्वी मिरगीची माहिती भावी पती किंवा पत्नीला द्यावी. गैरसमजूत आणि सत्यता यावर प्रकाश टाकावा. मिरगी हे कायद्याने ...

नागपूर : विवाहापूर्वी मिरगीची माहिती भावी पती किंवा पत्नीला द्यावी. गैरसमजूत आणि सत्यता यावर प्रकाश टाकावा. मिरगी हे कायद्याने घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही, यावर मेंदूरोग तज्ज्ञांनी भर दिला. इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय मिरगी दिना’च्या निमित्ताने ‘मिरगीचे मानसिक आणि सामाजिक पैलू’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात मेंदूरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. जे.एम.के. मूर्ती यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. प्रवीणा शहा प्रामुख्याने उपस्थित होत्या. बंगळुरूचे डॉ. एच. व्ही. श्रीनिवास, केरळचे डॉ. राजेंद्रन, कोलकाताचे डॉ. गौतम गांगुली, चंदीगडचे डॉ. परमप्रीतसिंग खरवंदा, मुंबईच्या डॉ. कॅरल डिसूझा, लखनौचे डॉ. अतुल अग्रवाल, चेन्नईचे डॉ. मीनाक्षीसुंदरम यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय संयोजक प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम होते.

: समाजामध्ये मिरगीबाबत जनजागृतीची गरज : डॉ. शहा

डॉ. शहा म्हणाल्या, एखाद्या व्यक्तीला वयाच्या विसाव्या वर्षात जर मिरगीचा अटॅक आला तर त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या कालावधीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. रुग्णाने वेळीच आजाराचा स्वीकार केला नाही, पालकांनी त्याची काळजी घेतली नाही आणि समाजाने सहकार्य केले नाही तर त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन खराब होते. त्यामुळे लवकर निदान, उपचारांची गरज असते. त्याकरिता समाजामध्ये या आजाराबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे.

: मिरगीच्या रुग्णांनी निराशा दूर ठेवावी : डॉ. राजेंद्रन

निराशा ही समस्या मिरगीच्या रुग्णांमध्ये विविध प्रकारे उद्भवू शकते. मानसिक व सामाजिक कारणांनीदेखील रुग्णांमध्ये निराशा येते. मिरगीच्या रुग्णांनी नेहमीच सकारात्मक विचार ठेवून उपचाराला सामोरे जावे, असा सल्ला डॉ. राजेंद्रन यांनी दिला. मिरगीसंदर्भातील ऑर्गेनिक आणि सायकॉलॉजिकल समस्यांबद्दल डॉ. गांगुली यांनी चर्चा केली. यावर डॉ. अग्रवाल, डॉ. कॅरल डिसूझा आणि डॉ. श्रीनिवास यांनी आपले मत व्यक्त केले. डॉ. कॅरल डिसूझा यांनी रुग्णांना अतिसुरक्षा, परावलंबीत्व यामुळे रुग्णांच्या समस्या आणखी वाढतात, असे सांगितले. डॉ. खरवंदा यांनी मिरगी असलेल्या किशोरवयीन मुलांचे खूप वेगळ्या समस्या असतात. डॉक्टरांना संतुलन साधून त्यांच्यावर उपचार करावेत, असे मत मांडले. डॉ. मेश्राम यांनी मिरगी हा मेंदूचा घातक आजार असून त्यावरील उपचाराची माहिती दिली. संचालन डॉ. सुधीर भावे यांनी तर आभार डॉ. मीनाक्षीसुंदरम यांनी मानले.