शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

सक्रियता संपली की मृत्यू अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:33 IST

आधुनिक जीवनशैली, अनियमित खानपान, मानसिक ताण आणि व्यायामाकडे दुर्लक्षामुळे लोकांमध्ये आजार बळावत आहेत. या आजाराला ‘सायको सोमेटिक डिसआॅर्डर’ही म्हटले जाते.

ठळक मुद्देडॉ. अल्ताफ उर रहमान : लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिल्या सुदृढ आयुष्याच्या टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक जीवनशैली, अनियमित खानपान, मानसिक ताण आणि व्यायामाकडे दुर्लक्षामुळे लोकांमध्ये आजार बळावत आहेत. या आजाराला ‘सायको सोमेटिक डिसआॅर्डर’ही म्हटले जाते. जेव्हापर्यंत आम्ही सक्रिय आहोत तोपर्यंतच आमचे आयुष्य कायम आहे. सक्रियता संपली की मृत्यू अटळ आहे, अशा शब्दात आरोग्याप्रति जागरूकता बाळगण्याचे आवाहन बेंगळूरु येथील होलिस्टिक लाईफ केअरचे विश्वस्त व सीईओ डॉ. अल्ताफ उर रहमान यांनी केले. शनिवारी नागपुरात समी डायरेक्ट कंपनीद्वारे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते लोकमतशी बोलत होते.डॉ. रहमान पुढे म्हणाले, आवश्यक व वेळेवर झोप, व्यायाम आणि संतुलित आहार जर आमच्या जीवनाचा भाग नसेल तर आम्हाला वात, पित्त आणि कफचा त्रास होऊ शकतो. नॅचरोपॅथीला ओळख मिळवून देण्यासाठी सीताराम जिंदल यांनी पुढाकार घेतला होता. यांनी केंद्रीय योग व प्राकृतिक चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या विकासासाठी मोठे कार्य केले. एज्युकेटिव्ह, प्रिंव्हेटिव्ह आणि क्युरेटिव्ह हा आयुर्वेदचा मूळ सिद्धांत आहे. परंतु फक्त क्युरेटिव्हलाच लक्षात घेतले जाते. यामुळे आयुर्वेदच्या विश्वसनीयतेचा आलेख खाली येतोय. भारतीय उपचार पद्धतींतर्गत केल्या जाणाºया उपचाराला विशेष कम्युनिटीशी जोडण्यात आले आहे, जे चुकीचे आहे. मागच्या काही वर्षात नैसर्गिक उपचार पद्धतीबाबत सकारात्मकता वाढत आहे. देशातील अनेक राज्यात यावर विशेष लक्ष दिले जात आहे. महाराष्ट्रातील पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ नॅचरोपॅथी येथेही या विषयावर संशोधन सुरू आहे.आयुर्वेद सांगतो, मनुष्याच्या शरीरात सात धातू असतात- यात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्रचा समावेश आहे. यामुळेच शरीर सुदृढ बनते. या धातूंचे शरीरातील संतुलन बिघडले तर अनुत्साह जाणवतो. रात्री झोपेसाठी ११ ते ३ ही योग्य वेळ आहे. यानंतर विसर्जनाची प्रक्रिया सुरू होते. या बाबीकडे लोकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आज समाज आणि कुटुंबातील आध्यात्मिकता संपत चालली आहे. परोपकारी जीवनापासून लोक परावृत्त होत आहेत. आजारांचे एक मुख्य कारण हेसुद्धा आहे, याकडेही त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.जीवनातून नकारात्मकता घालवाकुणाकडून फार अपेक्षा ठेवू नकाआवश्यक तेवढी आणि शांततापूर्ण झोप घ्याशारीरिक सक्रियेतेकडे लक्ष द्या. आठवड्यातून पाच दिवस रोज ४० ते ४५ मिनिट पायी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. मैदानी खेळ आणि पोहणेही फायद्याचे ठरू शकते.संतुलित भोजन वेळेवर घ्या, ज्यात डायटचा ५० टक्के भाग नाश्त्याच्या स्वरूपात हवा. जेवण आणि झोप यात दोन तासांचे अंतर हवे. वयाच्या चाळिशीनंतर रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्या.नैसर्गिक उपचार पद्धती म्हणजे काय?नैसर्गिक उपचार पद्धतीची चुकीची व्याख्या करण्यात आली आहे. ही अशी उपचार पद्धती आहे ज्यात पहिल्या टप्प्यात हे सुनिश्चित केले जाते की शरीरातून विषाक्त पदार्थ कसे बाहेर काढता येतील. दुसºया टप्प्यात विषाक्त पदार्थामुळे अशक्त झालेल्या भागात नव्याने प्राण फुंकण्यासोबतच कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जातो. तिसºया टप्प्यात पुनर्निर्माणाचे कार्य सुरू होते. ज्यात रोग प्रतिरोधकता क्षमता वाढून शरीर आणखी मजबूत बनते. ही उपचार पद्धती खूप स्वस्तही आहे.