शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सक्रियता संपली की मृत्यू अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:33 IST

आधुनिक जीवनशैली, अनियमित खानपान, मानसिक ताण आणि व्यायामाकडे दुर्लक्षामुळे लोकांमध्ये आजार बळावत आहेत. या आजाराला ‘सायको सोमेटिक डिसआॅर्डर’ही म्हटले जाते.

ठळक मुद्देडॉ. अल्ताफ उर रहमान : लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिल्या सुदृढ आयुष्याच्या टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक जीवनशैली, अनियमित खानपान, मानसिक ताण आणि व्यायामाकडे दुर्लक्षामुळे लोकांमध्ये आजार बळावत आहेत. या आजाराला ‘सायको सोमेटिक डिसआॅर्डर’ही म्हटले जाते. जेव्हापर्यंत आम्ही सक्रिय आहोत तोपर्यंतच आमचे आयुष्य कायम आहे. सक्रियता संपली की मृत्यू अटळ आहे, अशा शब्दात आरोग्याप्रति जागरूकता बाळगण्याचे आवाहन बेंगळूरु येथील होलिस्टिक लाईफ केअरचे विश्वस्त व सीईओ डॉ. अल्ताफ उर रहमान यांनी केले. शनिवारी नागपुरात समी डायरेक्ट कंपनीद्वारे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते लोकमतशी बोलत होते.डॉ. रहमान पुढे म्हणाले, आवश्यक व वेळेवर झोप, व्यायाम आणि संतुलित आहार जर आमच्या जीवनाचा भाग नसेल तर आम्हाला वात, पित्त आणि कफचा त्रास होऊ शकतो. नॅचरोपॅथीला ओळख मिळवून देण्यासाठी सीताराम जिंदल यांनी पुढाकार घेतला होता. यांनी केंद्रीय योग व प्राकृतिक चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या विकासासाठी मोठे कार्य केले. एज्युकेटिव्ह, प्रिंव्हेटिव्ह आणि क्युरेटिव्ह हा आयुर्वेदचा मूळ सिद्धांत आहे. परंतु फक्त क्युरेटिव्हलाच लक्षात घेतले जाते. यामुळे आयुर्वेदच्या विश्वसनीयतेचा आलेख खाली येतोय. भारतीय उपचार पद्धतींतर्गत केल्या जाणाºया उपचाराला विशेष कम्युनिटीशी जोडण्यात आले आहे, जे चुकीचे आहे. मागच्या काही वर्षात नैसर्गिक उपचार पद्धतीबाबत सकारात्मकता वाढत आहे. देशातील अनेक राज्यात यावर विशेष लक्ष दिले जात आहे. महाराष्ट्रातील पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ नॅचरोपॅथी येथेही या विषयावर संशोधन सुरू आहे.आयुर्वेद सांगतो, मनुष्याच्या शरीरात सात धातू असतात- यात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्रचा समावेश आहे. यामुळेच शरीर सुदृढ बनते. या धातूंचे शरीरातील संतुलन बिघडले तर अनुत्साह जाणवतो. रात्री झोपेसाठी ११ ते ३ ही योग्य वेळ आहे. यानंतर विसर्जनाची प्रक्रिया सुरू होते. या बाबीकडे लोकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आज समाज आणि कुटुंबातील आध्यात्मिकता संपत चालली आहे. परोपकारी जीवनापासून लोक परावृत्त होत आहेत. आजारांचे एक मुख्य कारण हेसुद्धा आहे, याकडेही त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.जीवनातून नकारात्मकता घालवाकुणाकडून फार अपेक्षा ठेवू नकाआवश्यक तेवढी आणि शांततापूर्ण झोप घ्याशारीरिक सक्रियेतेकडे लक्ष द्या. आठवड्यातून पाच दिवस रोज ४० ते ४५ मिनिट पायी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. मैदानी खेळ आणि पोहणेही फायद्याचे ठरू शकते.संतुलित भोजन वेळेवर घ्या, ज्यात डायटचा ५० टक्के भाग नाश्त्याच्या स्वरूपात हवा. जेवण आणि झोप यात दोन तासांचे अंतर हवे. वयाच्या चाळिशीनंतर रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्या.नैसर्गिक उपचार पद्धती म्हणजे काय?नैसर्गिक उपचार पद्धतीची चुकीची व्याख्या करण्यात आली आहे. ही अशी उपचार पद्धती आहे ज्यात पहिल्या टप्प्यात हे सुनिश्चित केले जाते की शरीरातून विषाक्त पदार्थ कसे बाहेर काढता येतील. दुसºया टप्प्यात विषाक्त पदार्थामुळे अशक्त झालेल्या भागात नव्याने प्राण फुंकण्यासोबतच कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जातो. तिसºया टप्प्यात पुनर्निर्माणाचे कार्य सुरू होते. ज्यात रोग प्रतिरोधकता क्षमता वाढून शरीर आणखी मजबूत बनते. ही उपचार पद्धती खूप स्वस्तही आहे.