शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अतिक्रमण, अस्वच्छतेमुळे नागपूरचा श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 11:01 IST

नागपूर शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे एकही फूटपाथ मोकळा नाही. कचरा संकलनात अजूनही अनेकांना ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे भान नाही.

ठळक मुद्दे फूटपाथही चालण्यायोग्य नाहीतउत्तम नागरी सुविधा हव्या तर मानसिकताही बदलवा!

गणेश हुड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ व सुंदर नागपूर’ हा नारा अमलात आणायचा असेल तर नागरिकांना मानसिकता बदलावी लागेल. शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे एकही फूटपाथ मोकळा नाही. कचरा संकलनात अजूनही अनेकांना ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे भान नाही. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग अद्यापही दिसतच आहेत. मात्र आता स्वच्छ व सुंदर नागपूरसाठी नागरिकांना बदलावेच लागणार आहे.मानकानुसार फूटपाथचे बांधकाम होत नसल्याने फूटपाथ असले तरी ते चालण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यांवरून चालतात. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी फूटपाथवरून चालणे अपेक्षित आहे. पदपथांबाबतीत इंडियन रोड काँग्रेसने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचेही सर्रास उल्लंघन होत आहे.

नकाशातील पार्किंग जागेवर अतिक्रमणशहरात रुग्णालय, मंगल कार्यालये आणि इमारतींमध्ये मंजूर पार्किंग जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेवर जनरेटर रुम, स्टोर रुम, जनरल वॉर्ड, स्टाफ रुम तयार केल्या आहेत. मंगल कार्यालये आणि इमारतींमध्येही पार्किंग ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवर वाहने उभी करावी लागतात.

अनधिकृत मंदिरांच्या धर्तीवर कारवाई व्हावीशहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी आहेत. त्यावर एकही अतिक्रमण नको, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. महापालिका आयुक्तांनी व महापौरांनी वेळोवेळी फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. परंतु शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणाची समस्या कायम आहे. यासाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील अनधिकृत मंदिरांचे बांधकाम हटविण्यात आले. यासाठी मोहीम राबविण्यात आली. त्याच धर्तीवर शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे.

अतिक्रमणामुळे नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. फूटपाथ चालण्यासाठी मोकळे करू. फेरीवाल्यांना स्मार्ट स्टॉल उपलब्ध केले जातील. १ जानेवारीपासून शहरातील पेट्रोल पंपावरील शौचालय खुले केले जातील. शहरात विविध भागात १०० शौचालये उभारण्यात येतील. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व्यापक नसबंदी कार्यक्रम राबविला जाईल. नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जाव्यात, अशी सक्षम यंत्रणा निर्माण केली जाईल.- संदीप जोशी, महापौरकचरा संकलनात सुधारणा व्हावीशहरातील कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया या कंपन्यांवर सोपविण्यात झाली. या दोन्ही कंपन्यांनी १६ नोव्हेंबरपासून शहरातील कचरा संकलनाला सुरुवात केली. मात्र अद्याप कचऱ्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. कचरा संकलनात सुधारणा व्हावी, यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागले होते. यात हळूहळू सुधारणा होत आहे. प्रशासन कामाला लागले आहे. अजूनही कचरा संकलनाची गाडी रुळावर आलेली नाही. यासाठी नागरिकांचा प्रतिसाद तितकाच महत्त्वाचा आहे. वारंवार आवाहन केल्यानंतरही नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करीत नाहीत. फलक लावूनदेखील कचरागाडीत कचरा न टाकता सार्वजनिक जागेवर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकGarbage Disposal Issueकचरा प्रश्न