शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक गडमंदिरात अतिक्रमण, अवैध बांधकाम : हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:05 IST

रामटेक येथील गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच, मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून आवश्यक आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनरसिम्हा मंदिरे, प्रवेशद्वारांची देखभाल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक येथील गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच, मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून आवश्यक आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.याविषयी न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २०१० मध्ये गडमंदिराच्या दुरवस्थेवर वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल केली. याप्रकरणात वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल न्यायालय मित्र म्हणून काम पाहतात. त्यांनी सदरहू अर्ज दाखल करून मंदिराशी संबंधित विविध समस्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. मंदिर परिसरात विविध प्रकारची अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मंदिराचा काही भाग अगस्त मुनी आश्रमच्या ताब्यात आहे. त्याची वैधता तपासणे आवश्यक आहे. तसेच, मंदिर परिसरात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्याकडून मंदिराला काहीच आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांना अटी व नियमांसह नियमित करणे गरजेचे आहे. धक्कादायक म्हणजे, सीतामाता रसोई घरातही अतिक्रमण करण्यात आले आहे.मंदिरापर्यंत जाण्यासाठी वराह, शिरपूर, भैरव व गोकुल ही चार प्रवेशद्वारे ओलांडावी लागतात. या प्रवेशद्वारांची अवस्था चांगली नाही. प्रवेशद्वारांना जागोजागी भेगा गेल्या आहेत. गडाच्या पायथ्याशी रुद्र नरसिम्हा व केवल नरसिम्हा यांची १५०० वर्षे जुनी मंदिरे आहेत. त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. परंतु, दोन्ही मंदिराच्या देखभालीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मंदिरे खराब होत आहेत. मंदिरातील देणगीचा वाद अद्याप निकाली निघालेला नाही भाविकांच्या सुविधेकरिता मंदिराजवळ स्वच्छतागृह बांधणे गरजेचे आहे. नगर परिषदेद्वारे मंदिराला पुरेसे पाणी पुरविले जात नाही. तसेच, मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे अशी माहिती अर्जाद्वारे न्यायालयाला देण्यात आली आहे. न्यायालयाने अर्ज रेकॉर्डवर घेऊन त्यावर ३ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. रामटेक नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.गड बळकटीकरण पूर्ण नाहीगडमंदिराचा गड ढासळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे गडाला बळकटी देण्याचे काम हातात घेण्यात आले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण झाल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर अ‍ॅड. जयस्वाल यांनी आक्षेप घेतला आहे. गड बळकटीकरणचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. काही भागाचे काम अद्याप झालेले नाही असे त्यांनी अर्जात नमूद करून यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRam Mandirराम मंदिरEnchroachmentअतिक्रमण