शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यातील ६१ हजार हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:29 IST

प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक अतिक्रमण धुळ्यात : वनक्षेत्राला अतिक्रमणाने ग्रासले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यातील किती वनक्षेत्रावर अतिक्रमण आहे, किती वर्षांपासून अतिक्रमण आहे, तसेच २०१८ मध्ये किती प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वनविभागातील एकूण वनक्षेत्रापैकी ६१,७८०.२३३ हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. यातील सर्वाधिक वनक्षेत्र हे वनविभागाच्या अंतर्गत येते. उर्वरित अतिक्रमण हे महसूल विभाग, राज्य वनविकास महामंडळ तसेच वनविभागाच्या अधिपत्याखाली आलेल्या खासगी वनांच्या क्षेत्रावर झालेले आहे.१९७८ नंतर राज्यातील वनजमिनींवर झालेल्या अतिक्रमणापैकी ९३८.१९६ हेक्टर अतिक्रमण जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत हटविण्यात आले. राज्यातील सर्वात जास्त धुळे वनवृत्तात २०,९२५.१७० हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमण आहे. त्याखालोखाल गडचिरोली (८,५८२.०४९ हेक्टर), औरंगाबाद (६,५८०.७६० हेक्टर), चंद्रपूर (५,२४९.११६ हेक्टर) यांचा क्रमांक लागतो.नागपूर वनवृत्तात २,८०८.९५१ हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण झाले आहे.तीन महिन्यांच्या कालावधीत सव्वाशे हेक्टर अतिक्रमणजानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १३०.३५८ हेक्टर वनक्षेत्रावर अतिक्रमणदेखील झाले. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक ३३.९६१ हेक्टर वनक्षेत्रावर २३ अतिक्रमणे झाली. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ३२.०९९ हेक्टर वनक्षेत्रात १६ अतिक्रमणे झाली. ठाणे येथे १४.८०८ हेक्टर वनक्षेत्रावर एकूण ७५९ अतिक्रमणे झाली.राज्यात २० टक्के वनक्षेत्रराज्यात सद्यस्थितीला ६१ हजार ७२३ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २०.०६ टक्के इतके आहे. सर्वाधिक ५५,४३३.२५ चौरस किमी वनक्षेत्र हे वनविभागाच्या अधिपत्याखाली आहे. तर महसूल विभाग (०.५१ %), महाराष्ट्र वन विकास महामंडळ (१.१५ %) व वनविभागाच्या अधिपत्याखाली येणारी खासगी वने (०.३८ %) यांच्या अंतर्गत उर्वरित वनक्षेत्र येते.सर्वाधिक वनक्षेत्रावर अतिक्रमणवनवृत्त                  अतिक्रमण (हेक्टरमध्ये)धुळे                        २०,९२५.१७०गडचिरोली            ८,५८२.०४९औरंगाबाद            ६,५८०.७६०मुंबई                    ५,९३३.६४४चंद्रपूर                 ५,२४९.११६नाशिक                ३,८११.५७८नागपूर               २,८०८.९५१

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल