शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कागदावरील संशोधन जमिनीवर उतरवा - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 6, 2015 02:14 IST

पंदेकृव्ही दीक्षांत समारंभ; शेती ते बाजारपेठ साखळी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मतंव्य.

अकोला : कृषी क्षेत्रासमोर शेतकरी आत्महत्या, नापिकी, अनियमित हवामान हे मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विस्ताराच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांना शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान, हवामानाला अनुकूल पिकाच्या जाती, संशोधन मोठय़ाप्रमाणात तयार असल्याचे सांगण्यात येत आहे, पण या संशोधनाचा कागदावरच ढीग जमा झाला असून, आता हे कागदावरील संशोधन शेतकर्‍यांच्या शेतात नेण्याची खरी गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोला येथे अधोरेखीत केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात गुरूवार, ५ फेब्रुवारी रोजी आयोजित २९ वा दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथराव खडसे होते. या समारंभाला अकोला-वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (दापोली) माजी कुलगुरू डॉ. किसन लवांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी, कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती, माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर, डॉ.गोविंदराव भराड, डॉ. व्ही.एम. मायंदे यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी १0५३ स्नातक, स्नातकोतर आणि आचार्य अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती खडसे यांनी पदवी प्रदान केली. यामध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक चार सुवर्णपदक कृषी शाखेचा पदवीधर मनीष कुमार यांने प्राप्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध संशोधनात उल्लेखनीय काम करणारे संशोधक, शिक्षक व कर्मचार्‍यांना विविध पदके, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.