शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कागदावरील संशोधन जमिनीवर उतरवा - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 6, 2015 02:14 IST

पंदेकृव्ही दीक्षांत समारंभ; शेती ते बाजारपेठ साखळी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मतंव्य.

अकोला : कृषी क्षेत्रासमोर शेतकरी आत्महत्या, नापिकी, अनियमित हवामान हे मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विस्ताराच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांना शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान, हवामानाला अनुकूल पिकाच्या जाती, संशोधन मोठय़ाप्रमाणात तयार असल्याचे सांगण्यात येत आहे, पण या संशोधनाचा कागदावरच ढीग जमा झाला असून, आता हे कागदावरील संशोधन शेतकर्‍यांच्या शेतात नेण्याची खरी गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोला येथे अधोरेखीत केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात गुरूवार, ५ फेब्रुवारी रोजी आयोजित २९ वा दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथराव खडसे होते. या समारंभाला अकोला-वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (दापोली) माजी कुलगुरू डॉ. किसन लवांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी, कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती, माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर, डॉ.गोविंदराव भराड, डॉ. व्ही.एम. मायंदे यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी १0५३ स्नातक, स्नातकोतर आणि आचार्य अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती खडसे यांनी पदवी प्रदान केली. यामध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक चार सुवर्णपदक कृषी शाखेचा पदवीधर मनीष कुमार यांने प्राप्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध संशोधनात उल्लेखनीय काम करणारे संशोधक, शिक्षक व कर्मचार्‍यांना विविध पदके, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.