शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

ताजाबाद ट्रस्टच्या मनमानी कारभारामुळे कर्मचारी पोहोचले ठाण्यात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST

नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या नव्या कार्यकारिणीची निवड होऊन काही महिनेच उलटून गेले आहेत. परंतु आतापासूनच अध्यक्ष प्यारे ...

नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या नव्या कार्यकारिणीची निवड होऊन काही महिनेच उलटून गेले आहेत. परंतु आतापासूनच अध्यक्ष प्यारे खानसह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांवर मनमानी करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना वारंवार त्रास देऊन नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या देण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सुरक्षा प्रभारी शहजादा खान यांना मनमानी पद्धतीने निलंबित करण्यात आल्यामुळे हा असंतोष आणखीनच वाढला आहे. रविवारी ट्रस्टमधील कर्मचारी सक्करदरा ठाण्यात गोळा झाले. पोलिसांना त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी मध्यस्थी करण्यावर भर दिला. परंतु कर्मचाऱ्यांनी कामाच्या नावाखाली आम्हाला त्रास देण्यात येत असल्याचे पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०१७ मध्ये ट्रस्टचे काळजीवाहू शहजादा खान यांच्या नावे न्यायालयातून निलंबनाचे पत्र जारी झाले होते. तेव्हा तत्कालीन प्रशासनाने न्यायालयासमोर त्याचे उत्तर देऊन त्यांचे निलंबन टाळले होते. सोबतच प्रशासनाने खान यांना काळजीवाहू पदावरून सुरक्षा प्रभारी पदाचा कार्यभार सोपविला होता. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत आहेत. परंतु सध्या ट्रस्टच्या वतीने त्यांना जुन्या निलंबनाच्या पत्राचे कारण देऊन नोटीस पाठविली आणि निलंबित केले. त्यामुळे खान यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते मनमानी पद्धतीने निलंबित करणे चुकीचे आहे. ट्रस्टच्या वतीने मनमानी पद्धतीने नोटीस देऊन कर्मचाऱ्यांना धमकी देण्यात येत आहे. सोबतच अनावश्यक काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांनुसार कोरोनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सोबतच ट्रस्टच्या अध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्यही कर्मचाऱ्यांसोबत द्वेषपूर्ण व्यवहार करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.

..................