शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी

By admin | Updated: May 16, 2014 00:45 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. यात कर्मचारी कमी पडले तर वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

मतमोजणीचे वेळापत्रक: तरणार की कोलमडणार?

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. यात कर्मचारी कमी पडले तर वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला कळमना मार्केट यार्डमध्ये सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या चौकटीत जिल्हा प्रशासनाने मतमोजणीचे नियोजन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र आणि टेबलची एकूण संख्या यावरून फेर्‍यांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. या प्रमाणानुसार नागपुरात १५ तर रामटेकमध्ये १८ फेर्‍या होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितल्यानुसार पहिल्या फेरीच्या मतगणनेला साधारणपणे ४५ मिनिट व त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला २0 ते २५ मिनिट इतका वेळ लागण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकानुसार अंदाज बांधला तर नागपूरच्या मतमोजणीला सात तास व रामटेकच्या मतमोजणीला ९ तास लागण्याची शक्यता आहे. या वेळेचा आधार घेतला तर नागपूरची मतमोजणी ३ वाजेपर्यंंत आणि रामटेकची मतमोजणी ५ वाजेपर्यंत संपायला हवी. जिल्हाधिकार्‍यांनी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास दुपारचे ४ वाजेल असे सांगितले आहे. निकाल जाहीर होण्यासाठी ६ वाजताची वेळ निश्‍चित केली आहे.

मतमोजणीसाठी १४५0 कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षणही देण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. पूर्ण क्षमतेने काम केले तरच वेळापत्रक यशस्वी ठरू शकते. २00९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव यासंदर्भात बोलका आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असूनही तेथील मोजणीची प्रक्रिया दुपारपर्यंंतच संपली होती.

मात्र त्यापेक्षा कमी मतदान केंद्र असणार्‍या शहरातील काही विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया सायंकाळपर्यंंत सुरू होती. यावेळीही असे प्रकार होणार नाही असे खात्रीपूर्वक कुणीच सांगायला तयार नाही. कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्या तरी त्यांच्याकडून आकडे नोंदविताना चुका होण्याचे प्रकार यापूर्वीच्या निवडणुकीत झाले आहेत. या शिवाय आयोगाने अनेक प्रपत्रात माहिती मागितली आहे.

उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही माहिती द्यावी लागणार आहे. कर्मचार्‍यांना खानपानासाठीही वेळ द्यावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून आहे. निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)