शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

वीज बिल वसुलीवर भर, सेवेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरण सध्या वीजज बिल वसुलीवर सर्वाधिक भर देत आहे. परंतु ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरण सध्या वीजज बिल वसुलीवर सर्वाधिक भर देत आहे. परंतु ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध करणे हे सुद्धा महावितरणचे काम आहे. बुधवारी शहरातील हजारो नागरिकांना कडाक्याच्या उन्हाळ्यात रात्र अंधारात काढावी लागली. सायंकाळी गेलेली वीज दुसऱ्या दिवशीपर्यंत आलीच नाही. परिणामी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे थकबाकीची वसुली करा, पण सेवेचे काय असा प्रश्न नागरिकांकडून महावितरणला विचारला जात आहे.

सध्या कडक उन्ह तापू लागले आहे. कुलरही सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत वीज गेली तर काय होईल, याची कल्पना सर्वांनाच आहे. बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास असाच प्रकार घडला. हिवरीनगर, पडोळेनगर परिसरातील वीज अचानक गेली. बराच वेळ वाट पाहूनही वीज न आल्याने लोक घराबाहेर निघाले. काही लोकांनी वीज कार्यालयात फोन केला. तेव्हा ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याचे सांगण्यात आले. काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु काहीच फायदा झाला नाही. रात्री गेलेली वीज गुरुवारी सकाळी ११ वाजता काही वेळेसाठी आली आणि पुन्हा गेली. ती बराच वेळ आलीच नाही. य ट्रान्सफाॅर्मरच्या बिघाडामुळे केवळ हिवरीनगर व पडोळेनगरच नव्हे तर न्यू पँथरनगर, लोकजीवननगर, चांदमारी, संघर्षनगर, महाल आदी परिसरातील हजारो लोकांना रात्र अंधारात काढावी लागली.

अलीकडे महावितरण ज्या गतीने थकबाकी वसुली मोहीम राबवित आहे. तशीच तत्परसेवासुद्धा लोकांना उपलब्ध का केली जात नाही, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी केला.

- हा त्रास नेहमीचाच

या परिसरातील नागरिक आणि माजी नगरसेवक असलेले यशवंत मेश्राम यांनी सांगितले की, वीज गेली की ती तासन‌्तास येतच नाही. ही या परिसरातील रोजचीच बाब झाली आहे. ट्रान्सफाॅर्मरची नियमित देखभाल होत नसल्याने हे प्रकार होत आहे. बुधवारी लाईट गेली तेव्हा मी स्वत: वाठोडा स्टेशनचे इंचार्ज यांना सूचना दिली. परंतु काहीच झाले नाही. नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. असाच प्रकार सुरू राहिला तर नागरिकांचा असंतोष उफाळून आल्याशिवाय राहणार नाही.