पं.स.वसाहत बनले समस्यांचे माहेरघर : परिसरात सर्वत्र दुर्गंधी, सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाविजय नागपुरे कळमेश्वर पंचायत समिती कळमेश्वरच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण वसाहतीची वाताहत झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. शिवाय, येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नरकयातना सोसाव्या लागत असून घाणीमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे.ग्रामीण भागाचा विकास व्हावा व जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या याकरिता ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या त्रिस्तरीय समित्यांकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजना राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व मुख्यालयी राहण्यासाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. अशीच व्यवस्था कळमेश्वर पंचायत समितीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली. परंतु या निवासस्थानांकडे संबंधित प्रशासनाने आजतागायत लक्ष दिले नसल्याने येथे राहणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहावे, यासाठी शासनाने अनेक नियम बनविले. परंतु त्यांच्या निवास व्यवस्थेकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून उमटत आहेत.
कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची वाताहत
By admin | Updated: August 22, 2016 02:57 IST