शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दीक्षाभूमीवरील सोहळ््याची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ

By admin | Updated: October 13, 2016 03:50 IST

धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते.

बाबासाहेबांनी मानवतेसाठी केलेले कार्य मोठेच : व्यक्त केल्या भावनानागपूर : धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणेही दीक्षाभूमीवर आले होते. यातील काहींनी पहिल्यांदा येथे भेट दिली होती. बाबासाहेबांबद्दल ऐकून व वाचनातून माहिती होती. मात्र येथे आल्यावर त्यांनी मानवतेसाठी किती अफाट कार्य केले याची प्रचिती आल्याची भावना काही परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली.त्रिरत्न बौद्ध संस्था आणि इंटरनॅशनल यूथ कॉन्वेंशनच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी कार्य केले जाते. याच माध्यमातून एक अभ्यासदौरा म्हणून बुद्धाचा मार्ग स्वीकारलेल्या काही विदेशी अनुयायांनी यावर्षी पहिल्यांदा नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. या समूहाशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला. यातील स्कॉटलँडवरून आलेले सोनिया जेमामन व जेम्स बोलेन यांनी असा ‘अमेझिंग’ सोहळा कधीही न अनुभवल्याची भावना व्यक्त केली. जगात अनेक ठिकाणी वर्ण किंवा वंश भेदावरून एका वर्गाला श्रेष्ठ व एका वर्गाला कनिष्ठ मानून त्या वर्गाच्या मानवाधिकाराचे हनन करण्याचा इतिहास आहे. या भेदभावाविरोधात ज्यांनी लढा दिला ते महान होते. डॉ. आंबेडकर यांनीही भारतात जातीभेदामुळे होणाऱ्या मानवतेविरोधी परिस्थितीशी लढा दिला आणि धम्मक्रांतीने रक्ताचा एक थेंबही न सांडविता परिवर्तन घडविले. येथे आल्यावर त्यांच्या मानवतेच्या महान कार्याची प्रचिती आल्याची भावना जेम्स बोलेन यांनी व्यक्त केली.इंग्लंडहून आलेल्या जोमी क्रॉस व बेथ व्हाईटहाऊस या दीक्षाभूमीवरील गर्दी आणि हा सोहळा पाहून भारावल्या होत्या. इंटरनॅशनल यूथ कन्वेंशनशी वर्षभरापासून जुळलो आहोत आणि यादरम्यान बाबासाहेबांबद्दल बराच अभ्यास केला आहे. मात्र येथे आल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची महती लक्षात आल्याचे बेथने सांगितले. बाबासाहेब इंग्लंडच्या विद्यापीठात शिकले याचा आम्हाला अभिमान आहे. आता इंग्लंडला गेल्यावर आधी त्या विद्यापीठाला भेट देणार असल्याचे बेथ हिने सांगितले. जर्मनीची स्टिफन मिडनड्रॉफ आणि आॅस्ट्रेलियावरून आलेले रशेल विल्सन व अँजेला वाईली यांनी यानंतरही दीक्षाभूमीवर येण्याची इच्छा व्यक्त केली. निघताना या सर्वांनी ‘जयभीम’ म्हणून निरोप घेतला.