शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

दीक्षाभूमीवरील सोहळ््याची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ

By admin | Updated: October 13, 2016 03:50 IST

धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते.

बाबासाहेबांनी मानवतेसाठी केलेले कार्य मोठेच : व्यक्त केल्या भावनानागपूर : धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणेही दीक्षाभूमीवर आले होते. यातील काहींनी पहिल्यांदा येथे भेट दिली होती. बाबासाहेबांबद्दल ऐकून व वाचनातून माहिती होती. मात्र येथे आल्यावर त्यांनी मानवतेसाठी किती अफाट कार्य केले याची प्रचिती आल्याची भावना काही परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली.त्रिरत्न बौद्ध संस्था आणि इंटरनॅशनल यूथ कॉन्वेंशनच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी कार्य केले जाते. याच माध्यमातून एक अभ्यासदौरा म्हणून बुद्धाचा मार्ग स्वीकारलेल्या काही विदेशी अनुयायांनी यावर्षी पहिल्यांदा नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. या समूहाशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला. यातील स्कॉटलँडवरून आलेले सोनिया जेमामन व जेम्स बोलेन यांनी असा ‘अमेझिंग’ सोहळा कधीही न अनुभवल्याची भावना व्यक्त केली. जगात अनेक ठिकाणी वर्ण किंवा वंश भेदावरून एका वर्गाला श्रेष्ठ व एका वर्गाला कनिष्ठ मानून त्या वर्गाच्या मानवाधिकाराचे हनन करण्याचा इतिहास आहे. या भेदभावाविरोधात ज्यांनी लढा दिला ते महान होते. डॉ. आंबेडकर यांनीही भारतात जातीभेदामुळे होणाऱ्या मानवतेविरोधी परिस्थितीशी लढा दिला आणि धम्मक्रांतीने रक्ताचा एक थेंबही न सांडविता परिवर्तन घडविले. येथे आल्यावर त्यांच्या मानवतेच्या महान कार्याची प्रचिती आल्याची भावना जेम्स बोलेन यांनी व्यक्त केली.इंग्लंडहून आलेल्या जोमी क्रॉस व बेथ व्हाईटहाऊस या दीक्षाभूमीवरील गर्दी आणि हा सोहळा पाहून भारावल्या होत्या. इंटरनॅशनल यूथ कन्वेंशनशी वर्षभरापासून जुळलो आहोत आणि यादरम्यान बाबासाहेबांबद्दल बराच अभ्यास केला आहे. मात्र येथे आल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची महती लक्षात आल्याचे बेथने सांगितले. बाबासाहेब इंग्लंडच्या विद्यापीठात शिकले याचा आम्हाला अभिमान आहे. आता इंग्लंडला गेल्यावर आधी त्या विद्यापीठाला भेट देणार असल्याचे बेथ हिने सांगितले. जर्मनीची स्टिफन मिडनड्रॉफ आणि आॅस्ट्रेलियावरून आलेले रशेल विल्सन व अँजेला वाईली यांनी यानंतरही दीक्षाभूमीवर येण्याची इच्छा व्यक्त केली. निघताना या सर्वांनी ‘जयभीम’ म्हणून निरोप घेतला.