शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांविरोधात एल्गार

By admin | Updated: May 16, 2017 02:24 IST

शहरात अवैध लेआऊट आणि नागरिकांच्या प्लॉटवर बळजबरीने ताबा मिळविल्याच्या विरोधात भूमाफिया पीडित जन आंदोलनाच्या वतीने आयोजित आंदोलनात...

पीडित उतरले रस्त्यावर : तोंडावर काळी पट्टी बांधून निदर्शनेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात अवैध लेआऊट आणि नागरिकांच्या प्लॉटवर बळजबरीने ताबा मिळविल्याच्या विरोधात भूमाफिया पीडित जन आंदोलनाच्या वतीने आयोजित आंदोलनात जवळपास ३०० पीडितांनी व्हेरायटी चौकात तोंडावर काळी पट्टी बांधुन निदर्शने करून भूमाफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. भूमाफियांविरोधात निदर्शने करून आंदोलनकर्त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे आंदोलनकर्त्यांनी भूमाफियांनी आदिवासी, झोपडपट्टी, जनहितासाठी आरक्षित जमिनी, भूदानच्या जमिनीवर ताबा घेतल्याचे नमूद केले. त्यानंतर त्या जागेचा प्लॉट असल्याचे दाखवून ते गरजू लोकांना विकले. जमिनीचा मूळ मालक आणि खरेदीदारांना ही बाब माहीत झाल्यास भूमाफिया त्यांना धमकी देतात. नियमानुसार सहकारी हाऊसिंग सोसायटी तयार करून प्लॉटची विक्री होणे गरजेचे आहे. भूमाफिया स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे प्लॉटही रेसिडेन्सियल सांगून विकत आहेत. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात दिलीप नरवडिया, नरेश निमजे, राहुल छाबरा, वासुदेव चौधरी, मुकुंद घाटे, रवींद्र विसाद, दिनेश लांडे, ज्ञानेश्वर गुरव, अरुण नायडू, सुनील खंडेलवाल, अजय कुमार, जीवन कोलते, ललित चौरिया आदी उपस्थित होते.मासिक किश्तीचे प्रलोभनपीडितांनी सांगितले की, अनेक भूमाफिया मासिक किश्तीवर प्लॉट उपलब्ध असल्याचे प्रलोभन देत आहेत. प्लॉटची पूर्ण रक्कम दिल्यानंतर रजिस्ट्री मिळत नाही. शासकीय कार्यालयाच्या चकरा मारल्यानंतरही त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर दबाव टाकल्यास ते धमकी देण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशी अनेक प्रकरणे शहरात दाखल आहेत. परंतु त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे भूमाफिया बिनधास्तपणे जमिनीचे व्यवहार करीत आहेत.दर महिन्यात घ्यावा जनता दरबारपीडितांनी महिन्यातून एकवेळा जनता दरबार घेऊन भूमाफियांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करून स्थायी रूपाने काम केल्यास असे प्रकरण घडणार नाहीत. दरम्यान, पीडितांनी ग्वालबन्सी प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांचे आभार मानले.