शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांविरोधात एल्गार

By admin | Updated: May 16, 2017 02:24 IST

शहरात अवैध लेआऊट आणि नागरिकांच्या प्लॉटवर बळजबरीने ताबा मिळविल्याच्या विरोधात भूमाफिया पीडित जन आंदोलनाच्या वतीने आयोजित आंदोलनात...

पीडित उतरले रस्त्यावर : तोंडावर काळी पट्टी बांधून निदर्शनेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात अवैध लेआऊट आणि नागरिकांच्या प्लॉटवर बळजबरीने ताबा मिळविल्याच्या विरोधात भूमाफिया पीडित जन आंदोलनाच्या वतीने आयोजित आंदोलनात जवळपास ३०० पीडितांनी व्हेरायटी चौकात तोंडावर काळी पट्टी बांधुन निदर्शने करून भूमाफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. भूमाफियांविरोधात निदर्शने करून आंदोलनकर्त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे आंदोलनकर्त्यांनी भूमाफियांनी आदिवासी, झोपडपट्टी, जनहितासाठी आरक्षित जमिनी, भूदानच्या जमिनीवर ताबा घेतल्याचे नमूद केले. त्यानंतर त्या जागेचा प्लॉट असल्याचे दाखवून ते गरजू लोकांना विकले. जमिनीचा मूळ मालक आणि खरेदीदारांना ही बाब माहीत झाल्यास भूमाफिया त्यांना धमकी देतात. नियमानुसार सहकारी हाऊसिंग सोसायटी तयार करून प्लॉटची विक्री होणे गरजेचे आहे. भूमाफिया स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे प्लॉटही रेसिडेन्सियल सांगून विकत आहेत. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात दिलीप नरवडिया, नरेश निमजे, राहुल छाबरा, वासुदेव चौधरी, मुकुंद घाटे, रवींद्र विसाद, दिनेश लांडे, ज्ञानेश्वर गुरव, अरुण नायडू, सुनील खंडेलवाल, अजय कुमार, जीवन कोलते, ललित चौरिया आदी उपस्थित होते.मासिक किश्तीचे प्रलोभनपीडितांनी सांगितले की, अनेक भूमाफिया मासिक किश्तीवर प्लॉट उपलब्ध असल्याचे प्रलोभन देत आहेत. प्लॉटची पूर्ण रक्कम दिल्यानंतर रजिस्ट्री मिळत नाही. शासकीय कार्यालयाच्या चकरा मारल्यानंतरही त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर दबाव टाकल्यास ते धमकी देण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशी अनेक प्रकरणे शहरात दाखल आहेत. परंतु त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे भूमाफिया बिनधास्तपणे जमिनीचे व्यवहार करीत आहेत.दर महिन्यात घ्यावा जनता दरबारपीडितांनी महिन्यातून एकवेळा जनता दरबार घेऊन भूमाफियांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करून स्थायी रूपाने काम केल्यास असे प्रकरण घडणार नाहीत. दरम्यान, पीडितांनी ग्वालबन्सी प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांचे आभार मानले.