शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

शेतकर्‍यांसाठी भाजपाचा सरकारविरुद्ध एल्गार

By admin | Updated: May 30, 2014 01:06 IST

रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना काढून घेतल्यामुळे, खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतवृष्टीचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळाले नाही.

विधानसभा क्षेत्रात आंदोलन : तहसील कार्यालयावर मोर्चे नागपूर : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना काढून घेतल्यामुळे, खरीप हंगाम तोंडावर आला  असताना, शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतवृष्टीचे पैसे अद्यापही  शेतकर्‍यांना मिळाले नाही.गारपिटीचा केवळ ५0 टक्केच निधी वाटप झाला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे नागपूर जिल्ह्यातील  शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकर्‍यांच्या अवस्थेला जबाबदार असलेल्या  सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात आंदोलन करणार  असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. ३१ मे रोजी दुपारी १ वाजता सावनेर, मौदा, उमरेड, नरखेड व रामटेक या तहसील कार्यालयावर  भाजपाचा मोर्चा धडकणार आहे, तर २ मे रोजी हिंगणा तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपाचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आपापल्या भागात  मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.  खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत शासनाने नागपूर जिल्ह्यासाठी  ९00 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. यातील १५0 कोटीचे कर्ज जिल्हा बँकेतून व ७५0  कोटींचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून वाटप होणार आहे. मात्र, जिल्हा बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे बँक डबघाईस आली आहे. त्यामुळे कर्जवाटप शक्य  नाही. राष्ट्रीयीकृत बँकेत कर्जवाटपाची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍याला  सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. यावर्षी मोठय़ा प्रमाणात बियाणे व खतांची कमतरता  आहे. त्यामुळे बोगस बियाणे मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाने तातडीने लक्ष  देऊन पुरेसे व अधिकृत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचे पैसे  तातडीने द्यावे आणि शेतकर्‍यांचा कर्जपुरवठय़ाचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी भाजपाची  आहे. या पत्रपरिषदेला माजी आ. अशोक मानकर,              जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक धोटे,  अरविंद गजभिये, प्रतिभा मांडवकर उपस्थित होते.  (प्रतिनिधी)