शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

अकरावी करणार बारावीच्या विद्यार्थ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST

नागपूर : बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला जाहीर केला आहे. यात दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ...

नागपूर : बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला जाहीर केला आहे. यात दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार मूल्यांकन झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे. या फार्म्युल्यानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांचा घात करणार आहे. कारण तज्ज्ञांच्या मते, विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला ‘रेस्ट ईअर’ म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात. बोर्डाने मूल्यांकन करताना घेतलेला अकरावीचा आधारच मारक ठरणार आहे.

ही सत्यता शिक्षकांबरोबरच विद्यार्थीही मान्य करीत आहे; पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावीचे ४० टक्के गुणदान करायचे आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की प्रक्रिया किचकट आहे. कोरोनामुळे अनेक ज्युनि. कॉलेजच्या अकरावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात अथवा स्लममधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण येणार आहे. हे विद्यार्थी वर्षभर ऑनलाइन नव्हते. त्यांनी परीक्षाही दिल्या नाहीत. त्यामुळे गुणदान करताना शिक्षकांपुढे पेच निर्माण होणार आहे.

- काय म्हणतात शिक्षक

- बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होणार आहे. माझ्या अनुभवानुसार विज्ञान शाखेचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला रेस्ट इअर समजतात. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला ठरविताना दहावी ४०, अकरावी २० आणि बारावी ४० असा ठरविण्याची गरज होती.

प्रा. मनोज हेडाऊ

- कोविडमुळे मूल्यांकनाचा बोर्डाने जो फार्म्युला दिला आहे त्यात केवळ दहावीची परीक्षा खऱ्या अर्थाने झाली आहे, तर अकरावीच्या आणि बारावीच्या फेक परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे फार्म्युला ठरविताना दहावीची टक्केवारी वाढवायला हवी होती.

प्रा. अनिल बारोकर

- विज्ञान शाखेचा अकरावीचा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या तयारीला लागतो. अकरावीच्या अभ्यासाचे तो गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे गुणसुद्धा फार मिळत नाहीत. कोरोनामुळे तर फार नुकसान झाले आहे.

प्रा. रिना देसाई

- बारावीची परीक्षा होईल अशी अपेक्षा होती; पण कोरोनामुळे शक्य झाले नाही. बोर्डाला विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घ्यायचे होते. निकालही लावायचा होता. विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण होते. त्यामुळे बोर्डाने जो काही पर्याय दिला आहे तो स्वीकारावा लागेल.

प्रा. सपन नेहरोत्रा

- विद्यार्थी म्हणतात...

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो बारावीच्या दृष्टिकोनातून तयारी करतो. त्यासाठी अकरावीकडे दुर्लक्षच करतो. त्यामुळे अकरावीच्या गुणांवर परिणामही होतो; पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो. अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे; पण बोर्डाने दिलेल्या फार्म्युलामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

मयूर साबळे, विद्यार्थी

- आम्ही अकरावीत असताना कोरोना आला. त्यामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. बारावीत चांगले गुण मिळतील या अपेक्षेने मेहनतही घेतली; पण कोरोनामुळे परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे; पण आता पर्याय नाही.

कृतिका गंथडे, विद्यार्थिनी