शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी करणार बारावीच्या विद्यार्थ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST

नागपूर : बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला जाहीर केला आहे. यात दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ...

नागपूर : बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला जाहीर केला आहे. यात दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार मूल्यांकन झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे. या फार्म्युल्यानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांचा घात करणार आहे. कारण तज्ज्ञांच्या मते, विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला ‘रेस्ट ईअर’ म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात. बोर्डाने मूल्यांकन करताना घेतलेला अकरावीचा आधारच मारक ठरणार आहे.

ही सत्यता शिक्षकांबरोबरच विद्यार्थीही मान्य करीत आहे; पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावीचे ४० टक्के गुणदान करायचे आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की प्रक्रिया किचकट आहे. कोरोनामुळे अनेक ज्युनि. कॉलेजच्या अकरावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात अथवा स्लममधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण येणार आहे. हे विद्यार्थी वर्षभर ऑनलाइन नव्हते. त्यांनी परीक्षाही दिल्या नाहीत. त्यामुळे गुणदान करताना शिक्षकांपुढे पेच निर्माण होणार आहे.

- काय म्हणतात शिक्षक

- बोर्डाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होणार आहे. माझ्या अनुभवानुसार विज्ञान शाखेचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला रेस्ट इअर समजतात. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. बोर्डाने मूल्यांकनाचा फार्म्युला ठरविताना दहावी ४०, अकरावी २० आणि बारावी ४० असा ठरविण्याची गरज होती.

प्रा. मनोज हेडाऊ

- कोविडमुळे मूल्यांकनाचा बोर्डाने जो फार्म्युला दिला आहे त्यात केवळ दहावीची परीक्षा खऱ्या अर्थाने झाली आहे, तर अकरावीच्या आणि बारावीच्या फेक परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे फार्म्युला ठरविताना दहावीची टक्केवारी वाढवायला हवी होती.

प्रा. अनिल बारोकर

- विज्ञान शाखेचा अकरावीचा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या तयारीला लागतो. अकरावीच्या अभ्यासाचे तो गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे गुणसुद्धा फार मिळत नाहीत. कोरोनामुळे तर फार नुकसान झाले आहे.

प्रा. रिना देसाई

- बारावीची परीक्षा होईल अशी अपेक्षा होती; पण कोरोनामुळे शक्य झाले नाही. बोर्डाला विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घ्यायचे होते. निकालही लावायचा होता. विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण होते. त्यामुळे बोर्डाने जो काही पर्याय दिला आहे तो स्वीकारावा लागेल.

प्रा. सपन नेहरोत्रा

- विद्यार्थी म्हणतात...

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो बारावीच्या दृष्टिकोनातून तयारी करतो. त्यासाठी अकरावीकडे दुर्लक्षच करतो. त्यामुळे अकरावीच्या गुणांवर परिणामही होतो; पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो. अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे; पण बोर्डाने दिलेल्या फार्म्युलामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

मयूर साबळे, विद्यार्थी

- आम्ही अकरावीत असताना कोरोना आला. त्यामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. बारावीत चांगले गुण मिळतील या अपेक्षेने मेहनतही घेतली; पण कोरोनामुळे परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे; पण आता पर्याय नाही.

कृतिका गंथडे, विद्यार्थिनी