शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीज बचत करणारे कृषीपंप देणार

By admin | Updated: December 26, 2015 03:41 IST

सध्याचे कृषी पंप मोठ्या प्रमाणात वीज खातात. ५ हॉर्स पॉवरच्या कृषी पंपाला प्रत्यक्षात ७ हॉर्स पॉवर एवढी वीज लागते.

ऊर्जामंत्र्यांची माहिती : ५० टक्के विजेची बचत, बिलही अर्धे होणारनागपूर : सध्याचे कृषी पंप मोठ्या प्रमाणात वीज खातात. ५ हॉर्स पॉवरच्या कृषी पंपाला प्रत्यक्षात ७ हॉर्स पॉवर एवढी वीज लागते. यामुळे जास्त वीज खर्च होते व शेतकऱ्यांनाही बिल जास्त येते. यावर उपाय म्हणून येत्या काळात शेतकऱ्यांना वीज बचत करणारे कृषीपंप देण्याची योजना राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने आखली आहे. संबंधित पंप लावण्यास अडीच हॉर्सपॉवरसाठी लागणाऱ्या विजेत ५ हॉर्स पॉवरचा पंप चालेल. यामुळे जवळपास ५० टक्के विजेची बचत होईल व शेतकऱ्यांवरील बिलाचे ओझेही हलके होईल.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत या संबंधीची योजना ऊर्जा विभागाने तयार केली असल्याचे सांगितले. बावनकुळे म्हणाले, संबंधित ऊर्जा बचत करणाऱ्या कृषी पंपाची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. राज्यात ४० लाख शेतकऱ्यांनाकडे वीज कनेक्शन आहे. या शेतकऱ्यांना ऊर्जा मंत्रालयातर्फे संबंधित कृषी पंप दिल्यास १६ हजार कोटी रुपये खर्च येईल. सध्या कृषी क्षेत्रासाठी अडीच हजार मेगावॅट वीज लागते. वीज बचत करणारे कृषी पंप लावल्यास हा वापर एक ते सव्वा हजार मेगा वॅटवर येईल. बचत होणाऱ्या विजेमुळे सबसिडीवरील भार कमी होईल. शिवाय ही वीज मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना देता येईल. शेतकऱ्यांकडे वीज बिलापोटी १२ हजार कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बचत करणारे कृषी पंप विनाशुल्क देण्याचा विचार सुरू आहे. नियमित बिल भरणाऱ्या शेतकऱ्यालाही याचा फायदा दिला जाईल. या संबंधीचे निकष, नियम लवकरच तयार केले जाईल. मार्चच्या अधिवेशनात ही योजना जाहीर करण्याचा विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना प्री-पेड मीटरराज्यातील १५ लाख शेतकऱ्यांकडे वीज मीटर नाही. या शेतकऱ्यांना प्री-पेड वीज मीटर दिले जाईल. मोबाईलच्या रिचार्ज व्हाऊचर प्रमाणे शेतकऱ्यांना विजेचे कार्ड खरेदी करावे लागेल. जेवढ्या रकमेचे कार्ड खरेदी केले तेवढी वीज शेतकऱ्याला वापरता येईल. शेतकऱ्यांनी ही वीज सवलतीच्या दरात म्हणजे ८५ पैसे प्रति युनिटप्रमाणेच मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांची ट्रान्सफार्मर समितीपाणी वाटप संस्थांप्रमाणे शेतकऱ्यांची ट्रान्सफार्मर समिती स्थापन केली जाईल. एका ट्रान्सफार्मरवरून जेवढ्या शेतकऱ्यांचे कनेक्शन असेल तेवढे शेतकरी या समितीचे सदस्य असतील. संबंधित शेतकऱ्यांनाच ट्रान्सफार्मरवर लक्ष ठेवावे लागेल. यामुळे हूक टाकून होणारी वीजचोरी व अतिरिक्त भार आल्यामुळे ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार रोखता येतील. या माध्यमातून होणाऱ्या वीज बचतीचा संबंधित समित्यांना फायदा दिला जाईल.रात्रीची वीज स्वस्त करणारराज्याच्या मागणीनुसार दिवसा १४ ते १५ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. मात्र, रात्री दोन हजार मेगावॅट वीज अतिरिक्त आहे. रात्रीची वीज वापरण्यास तयार असणाऱ्या विदर्भ- मराठवाड्यातील उद्योगांना स्वस्तात वीज देण्याची योजना असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.