शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना नोकऱ्या, शेती व उद्योगांना कमी दरात वीज

By admin | Updated: October 4, 2016 06:18 IST

रामायण काळापासून गौरवशाली इतिहास असलेल्या विदर्भाची भूमी नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. परंतु

नागपूर : रामायण काळापासून गौरवशाली इतिहास असलेल्या विदर्भाची भूमी नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. परंतु कालांतराने निजाम व ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेले शोषण आजवर सुरू आहे. गेल्या ६० वर्षात विदर्भातील सिंचन, वीज, खनिजे व औद्योगीकरणाचे आधार काढून विदर्भाला मागास ठेवण्यात आले आहे. परंतु स्वतंत्र विदर्भ राज्यात येथील बेरोजगारांना नोकऱ्या, शेती व उद्योगांसाठी कमी दरात मुबलक वीज उपलब्ध केली जाईल. नवीन सरकार विदर्भाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही प्रतिरूप राज्यपाल डॉ. मधुकर निसळ यांनी आपल्या अभिभाषणातून दिली. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित विदर्भ राज्याच्या दुसऱ्या प्रतिरूप विधानसभेच्या कामकाजाला सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात करण्यात आली. प्रदूषणामुळे होणारे शेतीचे नुकसान, पशुधनाची आबाळ तसेच मानवी आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता सरक ारचा पर्यावरण संवर्धनावर भर राहणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे घडणाऱ्या आत्महत्या ही भीषण समस्या आहे. त्यामुळे सरकार कर्जमुक्तीचे धोरण स्वीक ारणार आहे. सोबतच उत्पादन खर्च कमी करणे, शेतीमालाला किफायतशीर भाव, कृषी उद्योगांना चालना, रोजगार निर्मिती व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही मधुकर निसळ यांनी दिली. शासनाच्या अधीन असलेल्या नोकऱ्यांत यापुढे विदर्भातील बेरोजगारांनाच संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आजवर अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल. विदर्भात निर्माण होणाऱ्या विजेपैकी एक तृतीयांश वीज येथील जनतेला मिळत होती. आता कमी खर्चात मागणीनुसार वीज उपलब्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे विदर्भातील उद्योगाला चालना मिळणार आहे. उद्योगासाठी नवीन पॅकेज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)