शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीज बिल येणार प्रचंड, ग्राहकात उडणार हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:33 IST

मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील १२ लाख ५ हजार ८५९ पैकी फक्त ३६ हजार २४६ ग्राहकांनीच महावितरणकडे मीटर रीडिंग पाठवले. उर्वरित ११ लाख ६९ हजार ६१३ ग्राहकांचे रीडिंगच नसल्याने त्यांना अंदाजे बिल पाठविण्यात आले होते. यातील अनेकांनी बिल भरलेलेच नाही. आता अशा ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेऊन बिल पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे बिल अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने असा प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग घेण्याची आणि बिल पाठविण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. कलेक्शन सेंटरही बंद करण्यात आले होते. यामुळे महावितरणने मागील वर्षातील वीजवापराच्या आकडेवारीनुसार मोबाईल एसएमएसवरून बिल पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक ग्राहकांनी बिलच भरले नाही. त्यामुळे महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले होते. परंतु अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. एप्रिल महिन्यात २३ हजार ६०८ ग्राहकांनीच रीडिंग पाठविले होते. मे महिन्यात ही संख्या वाढून ३६ हजार २४६ वर पोहचली. प्रतिसाद न देण्याऱ्यांची संख्या ११ लाख ६९ हजार ६१३ आहे. आता या सर्वच ग्राहकांना एकत्र बिल पाठविले जाणार असल्याने हाहाकार उडणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वापर अधिक असल्याने अर्थातच बिलही अधिक असणार आहे.दुसरीकडे अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी ३०० युनिटपर्यंतचे बिल माफ करण्याची मागणी केली आहे. परंतु राज्य सरकार यात सूट देण्याच्या मानसिकतेत नाही. लॉकडाऊनच्या काळात महावितरणला ७५० कोटी रुपयांचा तोटा आल्याने, हे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.शहरात गांधीबाग मागेशहराच्या चार डिव्हिजनपैकी मीटिर रीडिंग पाठविण्यात गांधीबाग डिव्हिजन सर्वात मागे आहे. इतवारी सब डिव्हिजनमधील ३३,२०७ ग्राहकांपैकी फक्त ३२१ ग्राहकांनाच रीडिंग पाठवीले. हे शहरातील मोठे व्यापार क्षेत्र आहे. ग्राहकांच्या मते, लॉकडाऊनच्या काळात प्रतिष्ठाने बंद होती. संचारबंदीमुळे घरून प्रतिष्ठानांमध्ये जाणेही शक्य नव्हते. त्यामुळेच रीडिंग पाठविता आले नाही.उत्पन्नात ३१६.५०० कोटींवरून १२९.३५ कोटींपर्यंत घसरणलॉकडाऊनच्या काळात ग्राहकांकडून बिल भरण्यात न आल्याने महावितरणचे उत्पन्न प्रभावित झाले. जानेवारी महिन्यात कंपनीला नागपूर जिल्ह्यातून ३१६.५० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा वीज बिलांच्या माध्यमातून होती. फेब्रुवारी महिन्यात हा आकडा ३०२.३८ कोटी होता. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने महावितरणला २७९.५४ कोटी रुपये मिळाले. तर, एप्रिल महिन्यात फक्त १२९.३५ कोटी रुपये मिळाले. यापैकी ९९.४ कोटी रुपये उद्योगांमधून आले. जानेवारीमध्ये १५४.९५ कोटी रुपयांचे बिल भरणाºया घरगुती ग्राहकांनी एप्रिल महिन्यात फक्त २९.९५ कोटी रुपयांचे बिल भरले. त्यामुळे सहाजिकच रिडींगनुसार पाठविण्यात आलेले बिल लॉकडाऊनच्या काळात भरण्यात न आल्याने ती रक्कमही यात लागून येणार आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल