शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वीज बिल येणार प्रचंड, ग्राहकात उडणार हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:33 IST

मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील १२ लाख ५ हजार ८५९ पैकी फक्त ३६ हजार २४६ ग्राहकांनीच महावितरणकडे मीटर रीडिंग पाठवले. उर्वरित ११ लाख ६९ हजार ६१३ ग्राहकांचे रीडिंगच नसल्याने त्यांना अंदाजे बिल पाठविण्यात आले होते. यातील अनेकांनी बिल भरलेलेच नाही. आता अशा ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेऊन बिल पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे बिल अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने असा प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग घेण्याची आणि बिल पाठविण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. कलेक्शन सेंटरही बंद करण्यात आले होते. यामुळे महावितरणने मागील वर्षातील वीजवापराच्या आकडेवारीनुसार मोबाईल एसएमएसवरून बिल पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक ग्राहकांनी बिलच भरले नाही. त्यामुळे महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले होते. परंतु अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. एप्रिल महिन्यात २३ हजार ६०८ ग्राहकांनीच रीडिंग पाठविले होते. मे महिन्यात ही संख्या वाढून ३६ हजार २४६ वर पोहचली. प्रतिसाद न देण्याऱ्यांची संख्या ११ लाख ६९ हजार ६१३ आहे. आता या सर्वच ग्राहकांना एकत्र बिल पाठविले जाणार असल्याने हाहाकार उडणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वापर अधिक असल्याने अर्थातच बिलही अधिक असणार आहे.दुसरीकडे अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी ३०० युनिटपर्यंतचे बिल माफ करण्याची मागणी केली आहे. परंतु राज्य सरकार यात सूट देण्याच्या मानसिकतेत नाही. लॉकडाऊनच्या काळात महावितरणला ७५० कोटी रुपयांचा तोटा आल्याने, हे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.शहरात गांधीबाग मागेशहराच्या चार डिव्हिजनपैकी मीटिर रीडिंग पाठविण्यात गांधीबाग डिव्हिजन सर्वात मागे आहे. इतवारी सब डिव्हिजनमधील ३३,२०७ ग्राहकांपैकी फक्त ३२१ ग्राहकांनाच रीडिंग पाठवीले. हे शहरातील मोठे व्यापार क्षेत्र आहे. ग्राहकांच्या मते, लॉकडाऊनच्या काळात प्रतिष्ठाने बंद होती. संचारबंदीमुळे घरून प्रतिष्ठानांमध्ये जाणेही शक्य नव्हते. त्यामुळेच रीडिंग पाठविता आले नाही.उत्पन्नात ३१६.५०० कोटींवरून १२९.३५ कोटींपर्यंत घसरणलॉकडाऊनच्या काळात ग्राहकांकडून बिल भरण्यात न आल्याने महावितरणचे उत्पन्न प्रभावित झाले. जानेवारी महिन्यात कंपनीला नागपूर जिल्ह्यातून ३१६.५० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा वीज बिलांच्या माध्यमातून होती. फेब्रुवारी महिन्यात हा आकडा ३०२.३८ कोटी होता. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने महावितरणला २७९.५४ कोटी रुपये मिळाले. तर, एप्रिल महिन्यात फक्त १२९.३५ कोटी रुपये मिळाले. यापैकी ९९.४ कोटी रुपये उद्योगांमधून आले. जानेवारीमध्ये १५४.९५ कोटी रुपयांचे बिल भरणाºया घरगुती ग्राहकांनी एप्रिल महिन्यात फक्त २९.९५ कोटी रुपयांचे बिल भरले. त्यामुळे सहाजिकच रिडींगनुसार पाठविण्यात आलेले बिल लॉकडाऊनच्या काळात भरण्यात न आल्याने ती रक्कमही यात लागून येणार आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल