शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

विद्यापीठात निवडणुका बंद व्हाव्यात

By admin | Updated: January 10, 2016 03:23 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली आहे.

गडकरी यांच्या कानपिचक्या : अंतर्गत राजकारणामुळे संशोधनाकडे दुर्लक्षनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली आहे. प्राध्यापक संशोधन व शिकविण्याकडे दुर्लक्ष करून विद्यापीठाच्या अंतर्गत राजकारणात व्यस्त असतात. जोपर्यंत विद्यापीठातून निवडणूक प्रणाली हद्दपार होणार नाही, तोपर्यंत हे राजकारण संपणार नाही. त्यामुळे या निवडणुका बंद व्हायला हव्यात, असे परखड मत गडकरी यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधीविज्ञानशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्यादरम्यान शनिवारी गडकरी बोलत होते. गडकरी यांनी विद्यापीठातील व्यवस्थेतील त्रुटींवरच बोट ठेवले. १९९४ चा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा बनत असताना त्यात निवडणुकांचा समावेश करण्यात येऊ नये अशी माझी भूमिका होती, परंतु तसे होऊ शकले नाही. यातूनच विद्यापीठांमध्ये राजकारणामुळे वातावरण खराब झाले. प्रत्यक्ष राजकारणापेक्षा विद्यापीठांमधील राजकारण १०० पटींनी वाईट आहे. जर राजकारणच कराचये असेल तर विद्यापीठांमधून निघून महानगरपालिका व लोकसभेच्या निवडणूका लढा, या शब्दांत गडकरी यांनी प्रणालीवर प्रहार केला. विद्यापीठांत संशोधनामध्ये वाढ होण्यापेक्षा प्राध्यापकांनादेखील सहाव्या व सातव्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चेचे जास्त महत्त्व वाटते, असा चिमटादेखील त्यांनी काढला.(प्रतिनिधी)नागपूर विद्यापीठात प्रयत्नांचा अभावनागपूर विद्यापीठाकडून मला अनेक अपेक्षा आहेत. परंतु येथील कुलगुरू व अधिकारी प्रयत्नच करीत नाहीत. विद्यापीठांत काहीही विषय असला की लगेच समिती बनविण्यात येते. या समित्यांचे पुढे काय होते हे त्यातील सदस्यांनादेखील कळत नाही आणि अहवाल तर कधी समोरच येत नाही, असे गडकरी म्हणाले. नागपूर विद्यापीठाकडून शासनाकडेच आर्थिक मदत मागण्यात येते. परंतु अनेक माजी विद्यार्थी उद्योगक्षेत्रात मोठमोठ्या पदांवर आहेत. ते विद्यापीठाला ‘सीएसआर’अंतर्गत (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मदत करायला तयार आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासन त्यांच्याकडे निधी का मागत नाही, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.