शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात निवडणुका बंद व्हाव्यात

By admin | Updated: January 10, 2016 03:23 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली आहे.

गडकरी यांच्या कानपिचक्या : अंतर्गत राजकारणामुळे संशोधनाकडे दुर्लक्षनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली आहे. प्राध्यापक संशोधन व शिकविण्याकडे दुर्लक्ष करून विद्यापीठाच्या अंतर्गत राजकारणात व्यस्त असतात. जोपर्यंत विद्यापीठातून निवडणूक प्रणाली हद्दपार होणार नाही, तोपर्यंत हे राजकारण संपणार नाही. त्यामुळे या निवडणुका बंद व्हायला हव्यात, असे परखड मत गडकरी यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधीविज्ञानशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्यादरम्यान शनिवारी गडकरी बोलत होते. गडकरी यांनी विद्यापीठातील व्यवस्थेतील त्रुटींवरच बोट ठेवले. १९९४ चा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा बनत असताना त्यात निवडणुकांचा समावेश करण्यात येऊ नये अशी माझी भूमिका होती, परंतु तसे होऊ शकले नाही. यातूनच विद्यापीठांमध्ये राजकारणामुळे वातावरण खराब झाले. प्रत्यक्ष राजकारणापेक्षा विद्यापीठांमधील राजकारण १०० पटींनी वाईट आहे. जर राजकारणच कराचये असेल तर विद्यापीठांमधून निघून महानगरपालिका व लोकसभेच्या निवडणूका लढा, या शब्दांत गडकरी यांनी प्रणालीवर प्रहार केला. विद्यापीठांत संशोधनामध्ये वाढ होण्यापेक्षा प्राध्यापकांनादेखील सहाव्या व सातव्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चेचे जास्त महत्त्व वाटते, असा चिमटादेखील त्यांनी काढला.(प्रतिनिधी)नागपूर विद्यापीठात प्रयत्नांचा अभावनागपूर विद्यापीठाकडून मला अनेक अपेक्षा आहेत. परंतु येथील कुलगुरू व अधिकारी प्रयत्नच करीत नाहीत. विद्यापीठांत काहीही विषय असला की लगेच समिती बनविण्यात येते. या समित्यांचे पुढे काय होते हे त्यातील सदस्यांनादेखील कळत नाही आणि अहवाल तर कधी समोरच येत नाही, असे गडकरी म्हणाले. नागपूर विद्यापीठाकडून शासनाकडेच आर्थिक मदत मागण्यात येते. परंतु अनेक माजी विद्यार्थी उद्योगक्षेत्रात मोठमोठ्या पदांवर आहेत. ते विद्यापीठाला ‘सीएसआर’अंतर्गत (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मदत करायला तयार आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासन त्यांच्याकडे निधी का मागत नाही, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.