शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

निवडणुका रद्द; उत्साहावर पाणी

By admin | Updated: April 1, 2015 02:38 IST

जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने या निवडणुकांच्या तयारीसाठी शासकीय यंत्रणे घेतलेले परिश्रम ...

नागपूर : जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने या निवडणुकांच्या तयारीसाठी शासकीय यंत्रणे घेतलेले परिश्रम आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. निवडणुका रद्द झाल्याचे अधिकृत आदेश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार आयोगाने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या मुदतपूर्व होणाऱ्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. एप्रिल महिन्यात ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत होती त्या ग्रामंपचायतींसोबपतच ज्याची मुदत आॅगस्टमध्ये संपणार होती त्याही ग्रामपंचायीतंच्या निवडणुका सोबतच घेण्यात येणार होत्या. त्यात जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतींची मुदत ही आॅगस्ट/ सप्टेबर या दरम्यान संपणार होती. दरम्यान मुदतपूर्व निवडणुका घेण्यास काही आमदारांनी विरोध केला होता. त्याची दखल घेत शासनाने आयोगाला याबाबत विनंती केली होती. त्यानुसार आयोगाने ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपायची आहे अशा ठिकाणच्या रद्द केल्या . त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रद्द झाल्या. आता त्या जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.दरम्यान निवडणुका होणार म्हणून जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापासून तयारीला सुरुवात केली होती. सुरुवातीला ज्या गावात या निवडणुका होणार होत्या तेथील प्रभागांचे सीमांकन करण्यात आले. त्यावर आक्षेप मागवण्यात आले व त्यावर सुनावणी सुद्धा घेण्यात आली होती. त्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या होत्या. मतदार केंद्र निश्चित करण्यापर्यंतची तयारी निवडणूक यंत्रणेने सुुरू केली होती.दुसरीकडे निवडणुका लढवण्यास इच्छुक असणाऱ्या प्रतिनिधींनीही त्याची तयारी सुरू केली होती. जिल्ह्यातील १३ तालुक्यात या निवडणुका होणार असल्याने संबंधित भागातील आमदार आणि माजी आमदारांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायतींवर प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राखीव जागेवर निवडणुका लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र तयार करणे सुरू झाले होते. मतदारांशी संपर्क वाढविणे, मोर्चेबांधणी आदी प्रकार सुरू झाले होते. निवडणूक रद्द झाल्याचे आदेश आल्याने सर्वांच्या उत्साहावर पाणी पेरल्या गेले. (प्रतिनिधी)