शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

निवडणुका रद्द; उत्साहावर पाणी

By admin | Updated: April 1, 2015 02:38 IST

जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने या निवडणुकांच्या तयारीसाठी शासकीय यंत्रणे घेतलेले परिश्रम ...

नागपूर : जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने या निवडणुकांच्या तयारीसाठी शासकीय यंत्रणे घेतलेले परिश्रम आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. निवडणुका रद्द झाल्याचे अधिकृत आदेश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार आयोगाने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या मुदतपूर्व होणाऱ्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. एप्रिल महिन्यात ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत होती त्या ग्रामंपचायतींसोबपतच ज्याची मुदत आॅगस्टमध्ये संपणार होती त्याही ग्रामपंचायीतंच्या निवडणुका सोबतच घेण्यात येणार होत्या. त्यात जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतींची मुदत ही आॅगस्ट/ सप्टेबर या दरम्यान संपणार होती. दरम्यान मुदतपूर्व निवडणुका घेण्यास काही आमदारांनी विरोध केला होता. त्याची दखल घेत शासनाने आयोगाला याबाबत विनंती केली होती. त्यानुसार आयोगाने ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपायची आहे अशा ठिकाणच्या रद्द केल्या . त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रद्द झाल्या. आता त्या जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.दरम्यान निवडणुका होणार म्हणून जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापासून तयारीला सुरुवात केली होती. सुरुवातीला ज्या गावात या निवडणुका होणार होत्या तेथील प्रभागांचे सीमांकन करण्यात आले. त्यावर आक्षेप मागवण्यात आले व त्यावर सुनावणी सुद्धा घेण्यात आली होती. त्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या होत्या. मतदार केंद्र निश्चित करण्यापर्यंतची तयारी निवडणूक यंत्रणेने सुुरू केली होती.दुसरीकडे निवडणुका लढवण्यास इच्छुक असणाऱ्या प्रतिनिधींनीही त्याची तयारी सुरू केली होती. जिल्ह्यातील १३ तालुक्यात या निवडणुका होणार असल्याने संबंधित भागातील आमदार आणि माजी आमदारांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायतींवर प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राखीव जागेवर निवडणुका लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र तयार करणे सुरू झाले होते. मतदारांशी संपर्क वाढविणे, मोर्चेबांधणी आदी प्रकार सुरू झाले होते. निवडणूक रद्द झाल्याचे आदेश आल्याने सर्वांच्या उत्साहावर पाणी पेरल्या गेले. (प्रतिनिधी)