शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका रद्द; उत्साहावर पाणी

By admin | Updated: April 1, 2015 02:38 IST

जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने या निवडणुकांच्या तयारीसाठी शासकीय यंत्रणे घेतलेले परिश्रम ...

नागपूर : जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने या निवडणुकांच्या तयारीसाठी शासकीय यंत्रणे घेतलेले परिश्रम आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. निवडणुका रद्द झाल्याचे अधिकृत आदेश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार आयोगाने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या मुदतपूर्व होणाऱ्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. एप्रिल महिन्यात ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत होती त्या ग्रामंपचायतींसोबपतच ज्याची मुदत आॅगस्टमध्ये संपणार होती त्याही ग्रामपंचायीतंच्या निवडणुका सोबतच घेण्यात येणार होत्या. त्यात जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतींची मुदत ही आॅगस्ट/ सप्टेबर या दरम्यान संपणार होती. दरम्यान मुदतपूर्व निवडणुका घेण्यास काही आमदारांनी विरोध केला होता. त्याची दखल घेत शासनाने आयोगाला याबाबत विनंती केली होती. त्यानुसार आयोगाने ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपायची आहे अशा ठिकाणच्या रद्द केल्या . त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रद्द झाल्या. आता त्या जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.दरम्यान निवडणुका होणार म्हणून जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापासून तयारीला सुरुवात केली होती. सुरुवातीला ज्या गावात या निवडणुका होणार होत्या तेथील प्रभागांचे सीमांकन करण्यात आले. त्यावर आक्षेप मागवण्यात आले व त्यावर सुनावणी सुद्धा घेण्यात आली होती. त्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या होत्या. मतदार केंद्र निश्चित करण्यापर्यंतची तयारी निवडणूक यंत्रणेने सुुरू केली होती.दुसरीकडे निवडणुका लढवण्यास इच्छुक असणाऱ्या प्रतिनिधींनीही त्याची तयारी सुरू केली होती. जिल्ह्यातील १३ तालुक्यात या निवडणुका होणार असल्याने संबंधित भागातील आमदार आणि माजी आमदारांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायतींवर प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राखीव जागेवर निवडणुका लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र तयार करणे सुरू झाले होते. मतदारांशी संपर्क वाढविणे, मोर्चेबांधणी आदी प्रकार सुरू झाले होते. निवडणूक रद्द झाल्याचे आदेश आल्याने सर्वांच्या उत्साहावर पाणी पेरल्या गेले. (प्रतिनिधी)