शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

चार सदस्यीय पद्धतीनेच निवडणूक

By admin | Updated: June 24, 2016 03:10 IST

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यावर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला.

हायकोर्टाचा स्थगितीस नकार : आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाची याचिका नागपूर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यावर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. या पद्धतीविरुद्ध आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाने महासचिव विद्या भिमटे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य शासनाने यासंदर्भात १९ मे २०१६ रोजी अध्यादेश जारी केला आहे. हा अध्यादेश असंवैधानिक आहे असा दावा करून त्यावर स्थगिती देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ही विनंती मान्य करण्यास नकार दिला. परंतु, राज्य शासनाचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव, राज्य निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय यांना नोटीस बजावून १४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.याचिकाकर्त्यांनी स्वत:ची बाजू स्पष्ट करण्यासाठी न्यायालयासमक्ष विविध मुद्दे मांडले आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेणे लहान पक्षांसाठी अन्यायकारक आहे. ही पद्धत केवळ मोठ्या पक्षांसाठी फायद्याची आहे. मोठे पक्ष आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. यामुळे ते चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीचा खर्च सहन करू शकतात. लहान पक्षांना व अपक्ष गरीब उमेदवारांना हे शक्य होणार नाही. परिणामी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय रद्द करणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.निवडणुकीत इव्हीएम वापरण्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. इव्हीएम वापरायची असल्यास सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे. या आदेशानुसार इव्हीएममध्ये पेपर ट्रेल (व्ही कार्ड) लावणे आवश्यक आहे. यामुळे निवडणूक पारदर्शक होते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. राजकीय पक्षांना निवडणूक लढण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. यामुळे निवडणूक जिंकणारे उमेदवार भ्रष्टाचार करणार नाहीत. महानगरपालिका व नगर परिषद निवडणुकीत एका उमेदवाराने किती खर्च करावा याची मर्यादा ठरवून देण्यात यावी. नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका अध्यक्षीय पद्धतीने होणार आहेत. या पद्धतीत अध्यक्षपदासाठी उमेदवार उभे राहतील व नागरिकांना अध्यक्ष निवडून द्यावा लागेल. ही पद्धत अवैध आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. नितीन सोनारे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)