शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

ईव्हीएमवर होणार राज्यातील विद्यार्थी संघाच्या निवडणुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराज्यपालांच्या अप्पर सचिवांचे (शिक्षण) विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अप्पर सचिव (शिक्षण) पी.पी. लुबल यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यासह राज्यभरातील विद्यापीठाच्या कुलुगुरूंना यासंदर्भातील पत्र पाठविले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या निवडणूक नियमावलीमध्ये प्रावधान करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, यामागे युवकांमध्ये ईव्हीएम मशीन व मतदानाप्रति जनजागृती करण्याचा उद्देश आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व ईव्हीएमबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत शहरासोबतच ग्रामीण भागावर जास्त जोर देण्यात येत आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुका या अभियानासाठी उपयुक्त माध्यम मानण्यात येत आहे. त्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे. सूत्रांच्या मते, विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्याची मागणी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत राज्यपालाचे माजी प्रतिनिधी डॉ. संजय खडक्कार यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्रही लिहिले होते. त्यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेऊन विद्यापीठांना निर्देश दिले आहे.विशेष म्हणजे राज्यात २५ वर्षानंतर २०१९-२० या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी महाविद्यालय व विद्यापीठात निवड प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात येत होती.विद्यार्थी संघटनांची मागणी लक्षात घेता, गेल्या वर्षी विद्यापीठासाठी बनलेल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट २०१६ मध्ये खुल्या निवडणुकीचे प्रावधान करण्यात आले आहे.

पहिले राज्य बनेलमहाविद्यालय व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत जर ईव्हीएमचा वापर झाल्यास महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनेल. आतापर्यंत देशाच्या कुठल्याही विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला नाही.

जनजागृतीसाठी गरजेचेयासंदर्भात डॉ. खडक्कार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुष्टी केली की, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना मी पत्र लिहिले होते. राजभवनातून त्यांना पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक