शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

ईव्हीएमवर होणार राज्यातील विद्यार्थी संघाच्या निवडणुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराज्यपालांच्या अप्पर सचिवांचे (शिक्षण) विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अप्पर सचिव (शिक्षण) पी.पी. लुबल यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यासह राज्यभरातील विद्यापीठाच्या कुलुगुरूंना यासंदर्भातील पत्र पाठविले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या निवडणूक नियमावलीमध्ये प्रावधान करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, यामागे युवकांमध्ये ईव्हीएम मशीन व मतदानाप्रति जनजागृती करण्याचा उद्देश आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व ईव्हीएमबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत शहरासोबतच ग्रामीण भागावर जास्त जोर देण्यात येत आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुका या अभियानासाठी उपयुक्त माध्यम मानण्यात येत आहे. त्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे. सूत्रांच्या मते, विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्याची मागणी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत राज्यपालाचे माजी प्रतिनिधी डॉ. संजय खडक्कार यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्रही लिहिले होते. त्यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेऊन विद्यापीठांना निर्देश दिले आहे.विशेष म्हणजे राज्यात २५ वर्षानंतर २०१९-२० या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी महाविद्यालय व विद्यापीठात निवड प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात येत होती.विद्यार्थी संघटनांची मागणी लक्षात घेता, गेल्या वर्षी विद्यापीठासाठी बनलेल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट २०१६ मध्ये खुल्या निवडणुकीचे प्रावधान करण्यात आले आहे.

पहिले राज्य बनेलमहाविद्यालय व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत जर ईव्हीएमचा वापर झाल्यास महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनेल. आतापर्यंत देशाच्या कुठल्याही विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला नाही.

जनजागृतीसाठी गरजेचेयासंदर्भात डॉ. खडक्कार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुष्टी केली की, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना मी पत्र लिहिले होते. राजभवनातून त्यांना पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक