शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

उपराजधानीतील सफाई कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ४५ टक्केच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 10:57 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्षजीपीएस घड्याळांमुळे प्रकार उघडकीस

गणेश हूड।आॅनलाईन लोकमतनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यात शहरातील स्वच्छता हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थातच यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.सफाई कर्मचारी काम करीत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी असल्याने आसीनगर झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस घड्याळांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचा कामाचा सर्वे करण्यात आला. यात ९ सफाई कर्मचाऱ्यांचा १२ दिवसाच्या कामकाजाचा डाटा कलेक्ट करण्यात आला. त्यानुसार त्यांनी सरासरी ४५ टक्के काम केल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच अपेक्षित कार्यक्षमतेनुसार काम केलेले नाही. प्र्रत्येक कर्मचाऱ्याने दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे. त्यानुसार १२ दिवसात ९६ तास काम करणे अपेक्षित होते.मात्र कामाच्या तासांची सरासरी ४५ टक्केच आहे. एका सफाई कर्मचाऱ्याने फक्त २.६३ तास काम केले आहे. एकाने सर्वाधिक ७२.३५ तास काम केले आहे. इतर ७ कर्मचाºयांनी ३८.९९, २८.५३, ५५.९३, ६८.५७, ३९.३२, २६.३७ व ५८.५६ तास काम केल्याचे निदर्शनास आले आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर ६४९० सफाई कर्मचारी आहेत. यातील ४९० कर्मचारी महापालिकेच्या इतर विभागात कार्यरत आहेत. म्हणजे ६००० सफाई कर्मचारी विभागात कार्यरत आहेत. ९ कर्मचाऱ्यांच्या १२ दिवसाच्या कामकाजाचा विचार करता प्रत्यक्षात २७०० कर्मचाऱ्यांचेच काम करण्यात आले. म्हणजेच ३३०० कर्मचाºयांनी काम केले नाही. याचाअर्थ सरसकट सर्वच कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत असा होत नाही. काही ८ तास काम करणारेही सफाई कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे.आसीनगरचा प्रयोग शहरात राबवावाप्रभागातील कचरा उचलला जात नाही, रस्त्यांची साफसफाई होत नाही, सफाई कर्मचारी कमी आहेत, अशी नगरसेवकांची तक्रार असते. वस्त्यातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार असते. त्यामुळे आसीनगरच्या धर्तीवर महापालिका सेवेतील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळी दिल्यातर कर्मचाऱ्यांना दिलेले साफसफाईची जबाबदारी कार्यक्षमतेने करतील. नागरिक ांच्या तक्रारी येणार नाहीत. त्यामुळे हा प्रयोग शहरात राबविण्यात यावा.अशी नागरिकांची मागणी आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार