शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

उपराजधानीतील सफाई कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ४५ टक्केच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 10:57 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्षजीपीएस घड्याळांमुळे प्रकार उघडकीस

गणेश हूड।आॅनलाईन लोकमतनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यात शहरातील स्वच्छता हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थातच यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.सफाई कर्मचारी काम करीत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी असल्याने आसीनगर झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस घड्याळांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचा कामाचा सर्वे करण्यात आला. यात ९ सफाई कर्मचाऱ्यांचा १२ दिवसाच्या कामकाजाचा डाटा कलेक्ट करण्यात आला. त्यानुसार त्यांनी सरासरी ४५ टक्के काम केल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच अपेक्षित कार्यक्षमतेनुसार काम केलेले नाही. प्र्रत्येक कर्मचाऱ्याने दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे. त्यानुसार १२ दिवसात ९६ तास काम करणे अपेक्षित होते.मात्र कामाच्या तासांची सरासरी ४५ टक्केच आहे. एका सफाई कर्मचाऱ्याने फक्त २.६३ तास काम केले आहे. एकाने सर्वाधिक ७२.३५ तास काम केले आहे. इतर ७ कर्मचाºयांनी ३८.९९, २८.५३, ५५.९३, ६८.५७, ३९.३२, २६.३७ व ५८.५६ तास काम केल्याचे निदर्शनास आले आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर ६४९० सफाई कर्मचारी आहेत. यातील ४९० कर्मचारी महापालिकेच्या इतर विभागात कार्यरत आहेत. म्हणजे ६००० सफाई कर्मचारी विभागात कार्यरत आहेत. ९ कर्मचाऱ्यांच्या १२ दिवसाच्या कामकाजाचा विचार करता प्रत्यक्षात २७०० कर्मचाऱ्यांचेच काम करण्यात आले. म्हणजेच ३३०० कर्मचाºयांनी काम केले नाही. याचाअर्थ सरसकट सर्वच कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत असा होत नाही. काही ८ तास काम करणारेही सफाई कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे.आसीनगरचा प्रयोग शहरात राबवावाप्रभागातील कचरा उचलला जात नाही, रस्त्यांची साफसफाई होत नाही, सफाई कर्मचारी कमी आहेत, अशी नगरसेवकांची तक्रार असते. वस्त्यातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार असते. त्यामुळे आसीनगरच्या धर्तीवर महापालिका सेवेतील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळी दिल्यातर कर्मचाऱ्यांना दिलेले साफसफाईची जबाबदारी कार्यक्षमतेने करतील. नागरिक ांच्या तक्रारी येणार नाहीत. त्यामुळे हा प्रयोग शहरात राबविण्यात यावा.अशी नागरिकांची मागणी आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार