शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्ह्यात फक्त १२ विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST

नागपूर : अल्पसंख्यांकांच्या विकासात राज्य सरकारचा वेग कासवगतीपेक्षाही कमी दिसत आहे. राज्य सरकारने शैक्षणिक कर्जासाठी करोडो रुपयांची तरतूद केली ...

नागपूर : अल्पसंख्यांकांच्या विकासात राज्य सरकारचा वेग कासवगतीपेक्षाही कमी दिसत आहे. राज्य सरकारने शैक्षणिक कर्जासाठी करोडो रुपयांची तरतूद केली असली तरी योजना गतिमान करण्यावर मात्र भर नाही. मौलाना आजाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेतून ही उदासीनता स्पष्ट होत आहे. या योजनेत सवलती कमी आणि अडचणीच अधिक दिसत आहेत. यामुळे वर्षभरात फक्त १२ विद्यार्थ्यांनाच याचा लाभ घेता आला आहे.

यंदा आकडा मागील वर्षीपेक्षाही घटला आहे. २०१९-२० मध्ये शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात १६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळाले. महामंडळाच्या माहितीनुसार, कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी जमानतदार नसल्याने प्रस्ताव पुढे सरकत नाही. ही अट विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात हीच स्थिती आहे.

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय जुना जेलखानामधील हज हाऊसमध्ये आहे. शैक्षणिक कर्जाच्या अपेक्षेने येथे दूरवरून विद्यार्थी येतात. महामंडळाकडून अडीच ते ५ लाख रुपयांच्या कर्जाची तरतूद आहे. योजनेच्या लाभासाठी जमानतदार म्हणून सरकारी कर्मचारी, करदाता व्यवसायी किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीची संपूर्ण कागदपत्रे जोडावी लागतात.

...

जाचक अटी कशासाठी ?

अर्जातील जमानतदाराबद्दलच्या कडक अटी शैक्षणिक कर्ज मिळविताना अडचणीच्या ठरत असल्याचे मुंबईतील महामंडळाच्या अधिकाऱ्यांचेही मत आहे. मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना या अटीची पूर्तता करताना अडचणीचे ठरत आहे. सच्चरसह अन्य अहवालातही मुस्लीम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती मागासलेली दिसत असताना जमानतदार मिळविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. इच्छाशक्तीचा अभाव असल्याने सरकारने शैक्षणिक कर्जात ही अट घातली असावी, असे अनेकांचे मत आहे.