शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शैक्षणिक संस्थांनी विदर्भाचा चेहरामोहरा बदलावा; व्हीएनआयटीत १९ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 07:30 IST

Nagpur News विदर्भासारख्या भागाचा चेहरामोहरा बदलून विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : समाजाला विकासाच्या दिशेकडे नेण्यात शैक्षणिक संस्थांची मौलिक भूमिका असते. विशेषत: बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून विदर्भासारख्या भागाचा चेहरामोहरा बदलून विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. बुधवारी ऑनलाईन माध्यमातून आयोजित व्हीएनआयटीच्या १९ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ते बोलत होते. (Educational institutions should change the face of Vidarbha; 19th Convocation Ceremony at VNIT)

 

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, कुलसचिव डॉ. एस. आर. साठे प्रामुख्याने उपस्थित होते. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन शासनाच्या अनेकविध प्रकल्पांमध्ये शैक्षणिक संस्था आपले योगदान देऊ शकतात. विशेषत: उद्योगांना लक्षात घेऊन कार्य करायला हवे. व्हीएनआयटीसारख्या संस्थांनी रस्ते अभियांत्रिकी, ड्रोन तंत्रज्ञान तसेच तंत्रज्ञानाच्या विकसित होत असलेल्या शाखांमध्ये योगदान देणे गरजेचे आहे. तसेच विदर्भातील नैसर्गिक संपदेचा विदर्भाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, याचा विचार संस्थेने करायला हवा. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान आणि कौशल्य समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. डॉ. पडोळे यांनी प्रास्ताविक केले.

वातावरण बदलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाने मोठी उडी मारली आहे. कोरोना साथीच्या काळात नव्या तंत्रज्ञानालाही जन्म दिला आहे. पण, येत्या काळात अशा नव्या साथींना तसेच वातावरण बदलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, हे निश्चित आहे. त्यांचा सामना करण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये उत्तम संशोधन आणि इनोव्हेशन होणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. शेखर मांडे यांनी केले.

१,१३४ पदव्यांचे ऑनलाईन वितरण

ऑनलाईन कार्यक्रमात १ हजार १३४ विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. यात ४९ जणांना पीएच. डी., ३३३ जणांना एम. टेक., ६३४ विद्यार्थ्यांना बी. टेक. व ५९ विद्यार्थ्यांना बी. आर्क. ही पदवी प्रदान करण्यात आली. संशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४६ पदके आणि शैक्षणिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे ऑनलाईन समारंभ असला तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष विद्यार्थी संचालकांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारत आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले होते.

.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र