शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:38 IST

विजय भुते लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवणी : राज्य शासनाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत कोलितमारा (ता. पारशिवनी) येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ...

विजय भुते

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवणी : राज्य शासनाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत कोलितमारा (ता. पारशिवनी) येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी आश्रमशाळेची निर्मिती करण्यात आली. सुसज्ज इमारतीत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाही. येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविण्यात आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय हाेण्याची शक्यता बळावली आहे.

या शाळेच्या इमारत बांधकामावर काेट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ९५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, काेराेना संक्रमणामुळे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे १६ विद्यार्थी सध्या शाळेत हजर असल्याची हजेरी बुकावर नाेंद आहे; परंतु त्यांना शिकवायला शाळेत एकही शिक्षक नाही. शनिवारी शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी दिवसभर मैदानावर खेळत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. काही शिक्षक शुक्रवारी त्यांच्या गावी जात असून, ते साेमवारी किंवा मंगळवारी परत येत असल्याने तीन ते चार दिवस शाळा शिक्षकाविना असते.

या शाळेला प्रशस्त इमारत, क्रीडांगण, वसतिगृह, संगणकक्ष यासह अन्य सुविधा आहेत. मात्र, त्या शिक्षकाविना शाेभेच्या वास्तू ठरल्या आहेत. या शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याने ही शाळा सध्या बेवारस असल्यागत आहे. प्रशासनाचा हा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळल्यागत असल्याने पालकांमध्ये असंताेष निर्माण झाला आहे. लाेकप्रतिनिधीही यश प्रकाराची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पालकांनी सांगितले.

...

१७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या शाळेत एकूण १७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असली तरी सध्या शाळेचा कारभार चार शिक्षकांवर सुरू आहे. यातील दाेन शिक्षक प्रकल्प अधिकारी कार्यालय नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर तर एक शिक्षिका रजेवर आहे. मुख्याध्यापकाचे पद रिक्त असून, प्रभारी मुख्याध्यापक आर. जी. बाेचर कामानिमित्त नागपूरला गेल्याचे प्रत्येक वेळी सांगण्यात येते. काही कर्मचाऱ्यांना नागपूर व वर्धा येथील अप्पर आयुक्त कार्यालय व वसतिगृहात प्रतिनियुक्तीवर आहे. लिपिक व मानधनावरील संगणक शिक्षकाला नागपूरला बाेलावले आहे. या शाळेत इंग्रजी, विज्ञान व गणित विषयाला शिक्षकच नाहीत. माध्यमिकला पाच शिक्षकांची गरज असताना दाेन शिक्षकांवर काम चालविले जात आहे. प्राथमिकसाठी आठपैकी दाेन शिक्षक आहेत. वसतिगृहाच्या महिला अधीक्षक अद्याप रुजू झाल्या नाहीत.