शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नक्षलग्रस्त, दुर्गम आश्रमशाळांमधील शिक्षणाच्या उंटावरून शेळ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 19:48 IST

Nagpur News ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक परिस्थितीकडे आदिवासी विकास विभागाचे साफ दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देआदिवासी विभागाला हवे तासिका तत्त्वावर शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीत स्थानिक परिस्थितीचा विचारच नाही

नागपूर : राज्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील गावांमधील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाने जाहिराती काढल्या आहेत; मात्र यातील सर्वच पदे तासिका तत्त्वावर आहेत. यामुळे या पदांसाठी बाहेरचे उमेदवार मिळतील काय, हा प्रश्न आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार न करता ही प्रक्रिया सुरु झाल्याने आदिवासी विभागाच्या शिक्षण विभागाचा हा उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार असल्याची स्थिती यावरून दिसत आहे.

ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक परिस्थितीकडे आदिवासी विकास विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. दोन वर्षांत कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्यावर आता कुठे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. आदिवासी विभागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे मागील काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यावर पूर्ण वेळ शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याऐवजी आदिवासी विकास विभागाने तासिका तत्त्वावर ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक आश्रमशाळांसाठी अशा जाहिराती काढण्यात आल्या आहेत. एमएससी, बीएससी, बीएड, डीएड उमेदवारांची मागणी तासिका तत्त्वावर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आदिवासीबहुल क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या पदांची पात्रता धारण केलेले स्थानिक उमेदवार मिळणे कठीण आहे. असे असताना तासिका तत्त्वावर ही पदे भरण्याचा निर्णय झाल्याने बाहेरचे उमेदवार तुटपुंज्या मानधनावर शिकविण्यासाठी जातील का, तेथील निवास, भोजन खर्च त्यांना परवडेल का, याचा विचारच या प्रक्रियेत झालेला नाही. यामुळे दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे वाया गेल्यावर पुन्हा शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे हे वर्षही वाया जाण्याचीच शक्यता अधिक आहे.

अनेक पदे रिक्त

आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड प्रकल्पामध्ये शिक्षकांची ६३ पदे रिक्त आहेत. यात उच्च माध्यमिक, माध्यमिक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमांचे शिक्षक आदींचा समावेश आहे.

पदे रिक्त आहेत हे खरे आहे. मात्र ही नियमित भरती नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जाऊ नये म्हणून केलेली तात्पुरती तरतूद आहे. कायमस्वरूपी पदे भरण्यासंदर्भात विभागाकडून हालचाली सुरू आहेत.

- रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर

...

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र