शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिक्षण सुरू, वसतिगृह बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण सुरू झाले आहे. परंतु वसतिगृह बंद ...

दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षण सुरू झाले आहे. परंतु वसतिगृह बंद आहेत. नाईलाजाने भाड्याच्या खोलीचा अतिरिक्त खर्च विद्यार्थ्यांना उचलावा लागत आहे. यातच दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी सापडले आहेत. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना किमान स्वाधार योजनेंतर्गत शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला आहे. मात्र वसतिगृहच बंद आहेत, त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळा-महाविद्यालये बंद असले तरी ऑनलाईन वर्ग, विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रशिक्षणासाठी विद्यार्थी शहरात आले आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील विद्यार्थी नागपुरात शिकण्यासाठी आले आहेत. कोरोनाची लाट येण्यापूर्वीच बहुतांश विद्यार्थ्यांचे वसतिगृहात प्रवेश झालेले होते. नंतर विलगीकरणासाठी वसतिगृहच बंद करण्यात आले. दीड वर्षे झाले वसतिगृह बंद आहे. आपापल्या गावी गेलेले विद्याथी आता परत आले आहे. परंतु वसतिगृह बंद असल्याने त्यांना भाड्याने खोली करून राहावे लागत आहे. हा अतिरिक्त खर्च या गरीब मागासवर्गीय त्यांना सोसावा लागत आहे. परिणामी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी सुाू करण्यात आलेली वसतिगृहे बंद असल्याने मूळ उद्देशालाच तडा जात आहे.

-बॉक्स

निर्वाह भत्त्यापासूनही विद्यार्थी वंचित

राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहून जवळपास ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ९०० रुपये निर्वाह भत्ता मिळतो. दीड वर्षांपासून हा भत्ताही बंद आहे. अशा बिकट अवस्थेत हे विद्यार्थी गेल्या दीड वर्षांपासून कठीण दिवस काढताहेत.

-बॉक्स

- भोजनाचा कोट्यवधीचा खर्च वाचला

वसतिगृहातील एका विद्यार्थ्यावर महिन्याला भोजनाचा खर्च किमान ४ हजार रुपये इतका येतो. सामाजिक न्याय विभागाचाच विचार केला तर ३५ हजार विद्यार्थी वसतिगृहात राहून शिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचे तब्बल १४ कोटी रुपये एका महिन्याचेच सरकारचे वाचले. दीड वर्षांपासून वसतिगृह बंद आहे. १० महिन्याचाच विचार केला तर तब्बल १४० कोटी रुपये भोजनावर खर्च होणारे वाचले.

-बॉक्स

- वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही मिळावी मदत

शासनाने वसतिगृह तातडीने सुरू करावे, यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी लावून धरली आहे. विविध संघटनांचाही दबाव वाढत आहे. यातच वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे स्वाधारप्रमाणे त्यांनाही आर्थिक मदत शासनाने करावी, अशी मागणीही होत आहे.