शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

शिक्षण सुरू, वसतिगृह बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण सुरू झाले आहे. परंतु वसतिगृह बंद ...

दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षण सुरू झाले आहे. परंतु वसतिगृह बंद आहेत. नाईलाजाने भाड्याच्या खोलीचा अतिरिक्त खर्च विद्यार्थ्यांना उचलावा लागत आहे. यातच दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी सापडले आहेत. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना किमान स्वाधार योजनेंतर्गत शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला आहे. मात्र वसतिगृहच बंद आहेत, त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळा-महाविद्यालये बंद असले तरी ऑनलाईन वर्ग, विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रशिक्षणासाठी विद्यार्थी शहरात आले आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील विद्यार्थी नागपुरात शिकण्यासाठी आले आहेत. कोरोनाची लाट येण्यापूर्वीच बहुतांश विद्यार्थ्यांचे वसतिगृहात प्रवेश झालेले होते. नंतर विलगीकरणासाठी वसतिगृहच बंद करण्यात आले. दीड वर्षे झाले वसतिगृह बंद आहे. आपापल्या गावी गेलेले विद्याथी आता परत आले आहे. परंतु वसतिगृह बंद असल्याने त्यांना भाड्याने खोली करून राहावे लागत आहे. हा अतिरिक्त खर्च या गरीब मागासवर्गीय त्यांना सोसावा लागत आहे. परिणामी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी सुाू करण्यात आलेली वसतिगृहे बंद असल्याने मूळ उद्देशालाच तडा जात आहे.

-बॉक्स

निर्वाह भत्त्यापासूनही विद्यार्थी वंचित

राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहून जवळपास ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ९०० रुपये निर्वाह भत्ता मिळतो. दीड वर्षांपासून हा भत्ताही बंद आहे. अशा बिकट अवस्थेत हे विद्यार्थी गेल्या दीड वर्षांपासून कठीण दिवस काढताहेत.

-बॉक्स

- भोजनाचा कोट्यवधीचा खर्च वाचला

वसतिगृहातील एका विद्यार्थ्यावर महिन्याला भोजनाचा खर्च किमान ४ हजार रुपये इतका येतो. सामाजिक न्याय विभागाचाच विचार केला तर ३५ हजार विद्यार्थी वसतिगृहात राहून शिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचे तब्बल १४ कोटी रुपये एका महिन्याचेच सरकारचे वाचले. दीड वर्षांपासून वसतिगृह बंद आहे. १० महिन्याचाच विचार केला तर तब्बल १४० कोटी रुपये भोजनावर खर्च होणारे वाचले.

-बॉक्स

- वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही मिळावी मदत

शासनाने वसतिगृह तातडीने सुरू करावे, यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी लावून धरली आहे. विविध संघटनांचाही दबाव वाढत आहे. यातच वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे स्वाधारप्रमाणे त्यांनाही आर्थिक मदत शासनाने करावी, अशी मागणीही होत आहे.