शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शिक्षण सुरू, वसतिगृह बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण सुरू झाले आहे. परंतु वसतिगृह बंद ...

दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षण सुरू झाले आहे. परंतु वसतिगृह बंद आहेत. नाईलाजाने भाड्याच्या खोलीचा अतिरिक्त खर्च विद्यार्थ्यांना उचलावा लागत आहे. यातच दीड वर्षांपासून निर्वाह भत्ताही बंद अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी सापडले आहेत. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना किमान स्वाधार योजनेंतर्गत शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला आहे. मात्र वसतिगृहच बंद आहेत, त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळा-महाविद्यालये बंद असले तरी ऑनलाईन वर्ग, विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रशिक्षणासाठी विद्यार्थी शहरात आले आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील विद्यार्थी नागपुरात शिकण्यासाठी आले आहेत. कोरोनाची लाट येण्यापूर्वीच बहुतांश विद्यार्थ्यांचे वसतिगृहात प्रवेश झालेले होते. नंतर विलगीकरणासाठी वसतिगृहच बंद करण्यात आले. दीड वर्षे झाले वसतिगृह बंद आहे. आपापल्या गावी गेलेले विद्याथी आता परत आले आहे. परंतु वसतिगृह बंद असल्याने त्यांना भाड्याने खोली करून राहावे लागत आहे. हा अतिरिक्त खर्च या गरीब मागासवर्गीय त्यांना सोसावा लागत आहे. परिणामी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी सुाू करण्यात आलेली वसतिगृहे बंद असल्याने मूळ उद्देशालाच तडा जात आहे.

-बॉक्स

निर्वाह भत्त्यापासूनही विद्यार्थी वंचित

राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहून जवळपास ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ९०० रुपये निर्वाह भत्ता मिळतो. दीड वर्षांपासून हा भत्ताही बंद आहे. अशा बिकट अवस्थेत हे विद्यार्थी गेल्या दीड वर्षांपासून कठीण दिवस काढताहेत.

-बॉक्स

- भोजनाचा कोट्यवधीचा खर्च वाचला

वसतिगृहातील एका विद्यार्थ्यावर महिन्याला भोजनाचा खर्च किमान ४ हजार रुपये इतका येतो. सामाजिक न्याय विभागाचाच विचार केला तर ३५ हजार विद्यार्थी वसतिगृहात राहून शिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचे तब्बल १४ कोटी रुपये एका महिन्याचेच सरकारचे वाचले. दीड वर्षांपासून वसतिगृह बंद आहे. १० महिन्याचाच विचार केला तर तब्बल १४० कोटी रुपये भोजनावर खर्च होणारे वाचले.

-बॉक्स

- वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही मिळावी मदत

शासनाने वसतिगृह तातडीने सुरू करावे, यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी लावून धरली आहे. विविध संघटनांचाही दबाव वाढत आहे. यातच वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे स्वाधारप्रमाणे त्यांनाही आर्थिक मदत शासनाने करावी, अशी मागणीही होत आहे.