शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या हाती नको

By admin | Updated: August 22, 2016 02:44 IST

आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे.

मुकुल कानिटकर : सामाजिक मुद्यांवर मान्यवरांच्या उपस्थितीत वैचारिक मंथननागपूर : आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे. देशातील शिक्षणप्रणालीचा कायापालट करायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबाबतच्या विचारांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यांच्या विचारातूनच शिक्षणाची दुरावस्था दूर होईल, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘शिक्षणतज्ज्ञ बाबासाहेब’ या विषयावर बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भारतामातेवर निष्ठा होती. ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांप्रमाणे भारताला जगासमोर मांडले. शिक्षण हे समाजप्रबोधनाचे साधन आहे हे बाबासाहेबांचे ठाम मत होते. व्यक्तीला स्वावलंबी बनविणारे, नैतिक मूल्य वाढविणारे व स्वायत्त व्यवस्था असलेले शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता. परंतु बाबासाहेबांचे विचार शिक्षणव्यवस्थेत अंगिकारण्यात आले नाहीत, हे दुर्दैव आहे. कारण तसे झाले असते तर प्रत्येक अभ्यासक्रमातून समाजप्रबोधन झाले असते व अशा स्थितीत अशी परिषद घ्यावीच लागली नसती, असे कानिटकर म्हणाले. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)संविधान हीच देशाची संस्कृती : वेदप्रकाश मिश्रापरिसंवादादरम्यान डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ‘संस्कृतीचे संविधान की संविधानाची संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडले. आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ही आहे. संविधानाच्या प्रास्ताविकाच्या सुरुवातीला ‘आम्ही’ असा शब्द वापरण्यामागे बाबासाहेबांचा सखोल विचार होता. आपल्या देशातील सर्वात पवित्र ग्रंथ हा संविधानच आहे व खऱ्या अर्थाने संविधान हीच देशाची संस्कृती आहे. संविधान आल्यानंतरच गुलामगिरीची मानसिकता दूर झाली. संविधानाला आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी ही तरुण पिढीची आहे. त्यांनी संविधानाला खोलवर जाणून घेण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.