शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या हाती नको

By admin | Updated: August 22, 2016 02:44 IST

आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे.

मुकुल कानिटकर : सामाजिक मुद्यांवर मान्यवरांच्या उपस्थितीत वैचारिक मंथननागपूर : आजच्या काळात शिक्षण प्रणालीची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचे व्यवस्थापन सरकारच्या नव्हे तर शिक्षकांच्या हाती असले पाहिजे. देशातील शिक्षणप्रणालीचा कायापालट करायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबाबतच्या विचारांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यांच्या विचारातूनच शिक्षणाची दुरावस्था दूर होईल, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘शिक्षणतज्ज्ञ बाबासाहेब’ या विषयावर बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भारतामातेवर निष्ठा होती. ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांप्रमाणे भारताला जगासमोर मांडले. शिक्षण हे समाजप्रबोधनाचे साधन आहे हे बाबासाहेबांचे ठाम मत होते. व्यक्तीला स्वावलंबी बनविणारे, नैतिक मूल्य वाढविणारे व स्वायत्त व्यवस्था असलेले शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता. परंतु बाबासाहेबांचे विचार शिक्षणव्यवस्थेत अंगिकारण्यात आले नाहीत, हे दुर्दैव आहे. कारण तसे झाले असते तर प्रत्येक अभ्यासक्रमातून समाजप्रबोधन झाले असते व अशा स्थितीत अशी परिषद घ्यावीच लागली नसती, असे कानिटकर म्हणाले. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)संविधान हीच देशाची संस्कृती : वेदप्रकाश मिश्रापरिसंवादादरम्यान डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ‘संस्कृतीचे संविधान की संविधानाची संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडले. आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ही आहे. संविधानाच्या प्रास्ताविकाच्या सुरुवातीला ‘आम्ही’ असा शब्द वापरण्यामागे बाबासाहेबांचा सखोल विचार होता. आपल्या देशातील सर्वात पवित्र ग्रंथ हा संविधानच आहे व खऱ्या अर्थाने संविधान हीच देशाची संस्कृती आहे. संविधान आल्यानंतरच गुलामगिरीची मानसिकता दूर झाली. संविधानाला आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी ही तरुण पिढीची आहे. त्यांनी संविधानाला खोलवर जाणून घेण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.