शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक सर्वेक्षणाने उघड झाली भारतीय अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:56 IST

२८ जानेवारी रोजी संसदेत सादर झालेल्या २०१७-१८ या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणात देशाची अर्थव्यवस्था नाजूक असल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्देजेटलींचा लागणार कस

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ जानेवारी रोजी संसदेत सादर झालेल्या २०१७-१८ या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणात देशाची अर्थव्यवस्था नाजूक असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामत: १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री अरुण जेटली यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.सर्वेक्षणाच्या सकारात्मक बाबीसर्वेक्षणात निर्यात वाढ २०१३-१४ साली १.३ टक्क्यावरून २०१७-१८ मध्ये १२ टक्के दाखविली आहे. शिवाय परकीय चलन गंगाजळी चार वर्षात ३४० अब्ज डॉलर्सवरून ४०९ अब्ज डॉलर्स झाल्याचे म्हटले आहे. महागाईचा दरही या काळात जीडीपीच्या ५.७ टक्क्यावरून ३.३ टक्के उतरला आहे तर अर्थसंकल्पीय तूट जीडीपीच्या ४.४ टक्क्यावरून ३.२ टक्के झाली आहे असे नमूद आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ६.७५ टक्के राहण्याचे अनुमान आहे.

सर्वेक्षणाच्या नकारात्मक बाबीसर्वेक्षणात जीडीपी वाढीचा दर ६.७५ टक्के राहील असे म्हटले असले तरी उद्योग क्षेत्राची वाढ चार वर्षात ८.२ टक्क्यावरून ४.४ टक्के व कृषी क्षेत्राची वाढ ४.२ टक्क्यावरून २.१ टक्के घसरल्याचे व चालू खात्याची तूट १.५ टक्के असल्याचे मान्य केले आहे. सर्वेक्षणाच्या या नकारात्मक बाबी आहेत.अर्थव्यवस्था नाजूक का आहे?निर्यात वाढ १२ टक्क्यावर गेली असे म्हटले असले तरी ती उद्योग क्षेत्रातून झाली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे बहुतांशी जीडीपी वाढ सेवा क्षेत्रातून झाल्याचे स्पष्ट आहे. उद्योग क्षेत्र वाढले नाही याचा अर्थ रोजगार वाढ झाली नाही हे दर्शवितो. दरवर्षी एक कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असफल झाल्याचे दिसते. ही चिंतेची बाब आहे.याचबरोबर कृषी क्षेत्रातील वाढ दरही घसरला आहे. ही त्याहून अधिक गंभीर बाब आहे.परकीय चलनाची गंगाजळी चार वर्षात ७० अब्ज डॉलर्स झाली आहे. परंतु २०१७-१८ या एकाच वर्षात गंगाजळी ३९ अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यापूर्वी ही वाढ दरवर्षी फारतर १० ते २० अब्ज डॉलर असे. ही वाढ उत्पादन वाढले नसताना कशी झाली? बहुतांश गंगाजळी शेअर बाजारातील गुंतवणुकीतून आली का याचा खुलासा सर्वेक्षणात होत नाही.सर्वेक्षणात अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या जीएसटीमुळे ५० टक्के वाढल्याचे म्हटले आहे. पण २४ जानेवारीला जीएसटी महसुलाचे जे आकडे सरकारने जाहीर केले, त्यात जीएसटीचा महसूल सप्टेंबर २०१७ मध्ये ९२,१५० कोटी होता. तो जानेवारी २०१८ मध्ये ८६,७०३ कोटीपर्यंत घसरला आहे. यावरून करदाते वाढले तरी महसूल वाढला नाही, हे स्पष्ट होते.जेटलींचा लागणार कससर्वेक्षणात २०१८-१९ मध्ये जीडीपी वाढ ७ ते ७.५ टक्के राहील असे म्हटले आहे. त्यासाठी कृषी व उद्योग क्षेत्राची वाढ अनुक्रमे ४ टक्के व १० ते ११ टक्के होणे आवश्यक आहे. तरच रोजगार निर्मिती होऊ शकेल. यासाठी सवलती दिल्या तर महसूल कमी होऊन अर्थसंकल्पीय तूट वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जेटली यांना खासगी क्षेत्रातून या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करावी लागेल आणि इथेच जेटली यांचा कस लागणार आहे. हे आव्हान अर्थमंत्री कसे हाताळतात ते १ तारखेला समोर येईल.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाArun Jaitleyअरूण जेटली