शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

देशाची आर्थिक गती मंदावली, सरसंघचालकांनी केली केंद्राची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 03:37 IST

केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील या धोरणांबाबत असमाधान व्यक्त केले आहे.

नागपूर : केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील या धोरणांबाबत असमाधान व्यक्त केले आहे. देशाची आर्थिक गती मंदावली असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्राची कानउघाडणी केली आहे.रेशीमबाग मैदान येथे शनिवारी सकाळी झालेल्या संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवप्रसंगी डॉ. मोहन भागवत बोलत होते. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीदेखील यावेळी उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, आर्थिक क्षेत्रात आपण ज्याप्रकारे पुढे जात आहोत, संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे आहे. देशाची आर्थिक विकासाची गती मंदावली, असे म्हणतात. ती ठीक होईल, असे देखील वाटते. मात्र भविष्य लक्षात घेता पारंपरिक आर्थिक विचारसरणीतून बाहेर आले पाहिजे. यासंदर्भात समाजाच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, हेही जाणून घेतले पाहिजे. स्वदेशीला बळ दिले पाहिजे. या बाबींचा निती आयोग व धोरण निर्मात्यांनी विचार करावा, असा सल्लाही डॉ.भागवत यांनी दिला. केंद्र शासनाने भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलत काही धाडसी निर्णय नक्कीच घेतले. मात्र उद्योग, व्यापार, कृषी यांच्यासोबतच मोठे, लघु, मध्यम उद्योग, कामगार क्षेत्र यांचे हित लक्षात घेऊन सर्वसमावेशक आर्थिक धोरण लागू करण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले. सामान्य जनतेचा विचार करून राबविल्या जाणाºया योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासायला हवे. लघु, कुटीर व मध्यम उद्योगांमुळे कठीण काळात देखील अर्थव्यवस्था तरली. त्यामुळे या उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मितीसाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच विविध योजना व कामांची गती वाढविली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत