शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

‘ब्रिकेट’पासून ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्कार

By admin | Updated: November 24, 2015 05:57 IST

अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाची हानी होते. हीच बाब लक्षात घेऊन प्रदूषणाची पातळी कमी व्हावी

योगेश पांडे ल्ल नागपूरअंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाची हानी होते. हीच बाब लक्षात घेऊन प्रदूषणाची पातळी कमी व्हावी यासाठी शेतातील काडीकचऱ्यापासून तयार होणाऱ्या ‘ब्रिकेट’ आणि गोवरी यांचा वापर करून नागपुरात ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविण्यात आला. विशेष म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे करण्यात आला आहे.शहरातील विविध स्मशानघाटांवर अंत्यसंस्कारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ‘एका पार्थिवासाठी किमान एक वृक्ष’ असे समीकरण आहे. हेच वृक्ष वाढविताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. लाकडांनीच अंत्यसंस्कार व्हावेत, असे बंधन कुठल्याही धर्मात नसल्याचा दावा करीत नागपुरातील ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला. यातूनच गोवरीच्या माध्यमातून ‘हरीत दहन’ ही संकल्पना समोर आली. २०१४ मध्ये ‘गॅस’ तसेच गोवरीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. २०१४ साली सुमारे २०० मृतदेहांचे या प्रणालीने अंत्यसंस्कार झाले व यामुळे सुमारे ४५० झाडांना जीवदान मिळाले.आता गोवरी दहनाच्या समोर जाऊन संस्थेने ‘अ‍ॅग्रो वेस्ट’पासून तयार होणाऱ्या ‘ब्रिकेट’चादेखील अंत्यसंस्कारांसाठी वापर करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. ‘ब्रिकेट’ हे सोयाबीन, कापूस, तूरसारख्या पिकांच्या कापणीनंतर शेतात उरलेल्या कचऱ्यापासून बनविले जाते. ‘ब्रिकेट’ बाजारात सहजतेने उपलब्ध असून याचा उपयोग उद्योगक्षेत्रात करण्यात येतो. रविवारी नागपुरातील सहकारनगर घाटावर शशिकला भीष्म यांचा अंत्यसंस्कार याप्रकारे करण्यात आला. ‘ब्रिकेट’ची ‘जीसीव्ही’ (ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू) लाकडाइतकीच असल्यामुळे तितकीच उष्णता निर्माण होते. त्यामुळे अंत्यसंस्कारादरम्यान कुठलीही समस्या जाणवली नाही अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.‘ब्रिकेट’चे फायदे४प्रदूषणात घट४अंत्यसंस्कारासाठी कमी खर्च४झाडांची वाचणारी कत्तल४अतिरिक्त इंधनाची आवश्यकता नाही४ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगारनिर्मिती