शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

राणी तलाव मोक्षधामचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST

कामठी : कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम घाटाच्या विकासाचा संकल्प सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने आजवर करण्यात आला. यानंतर येथील विविध ...

कामठी : कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम घाटाच्या विकासाचा संकल्प सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने आजवर करण्यात आला. यानंतर येथील विविध विकास कामांचे पाचवेळा भूमिपूजनही करण्यात आले. मात्र येथे अद्यापही रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी वाहनांच्या लाईट किंवा टॉर्चचा वापर करावा लागतो. त्यामुळे राणी तलाव मोक्षधाम घाटाची उपेक्षा कधी थांबणार, असा सवाल येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

कामठी-आजनी मार्गावरील राणी तलाव मोक्षधाम घाटावर कामठी शहरातील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र या घाटावर अद्यापही मृतदेह जाळण्यासाठी ओटे नाही. परिसरात हायमास्ट लाईट नाही तसेच पाण्याची समस्या आहे.

राणी तलाव मोक्षधामवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी १९९६ मध्ये स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे खासदार संजय निरुपम यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार खासदार निधीतून निरुपम यांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यानंतर येथे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यादरम्यान नगर परिषदेत सत्तापरिवर्तन झाल्याने आलेला निधी दुसऱ्याच कामावर खर्च करण्यात आला. १९९७ मध्ये तत्कालीन खासदार व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याही हस्ते येथील सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते.

त्यानंतर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांनीही २००० साली येथील विकास कामांचे भूमिपजून केले होते. मात्र यानंतर कोणतेही काम येथे झाले नाही. २००१ मध्ये माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनीही येथील प्रवेशद्वारासाठी पुढाकार घेतला. मात्र तेही काम रखडले. २०१८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणी तलाव मोक्षधाम सौंदर्यीकरणाच्या विकासाकरिता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यानंतर कामठी नगर परिषदअंतर्गत विविध विकास कामाला सुरुवात झाली. मात्र राणी तलाव मोक्षधाम घाटावरील समस्या कायमच आहे. त्यामुळे येथील कामात होणाऱ्या दिरंगाईच्या कारणाचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. न.प. प्रशासनाने यासंदर्भात लक्ष देण्याची मागणी राणी तलाव मोक्षधाम विकास समितीचे अध्यक्ष हरिशंकर गुप्ता, डॉ. संदीप कश्यप, अ‍ॅड. गोपाल शर्मा, लाला खंडेलवाल, विनोद संगेवार व इतर नागरिकांनी केली आहे.