शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

‘एमकॉम’ परीक्षेला चुकांचे ‘ग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:48 IST

गेल्या काही सत्रांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सुरळीत चालू असताना यंदा मात्र काही त्रुटी दिसून येत आहेत. ‘बीकॉम’च्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ‘एमकॉम’च्या परीक्षेलादेखील ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. ५ एप्रिल रोजी ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना चुकीचा प्रश्न सोडवावा लागला, तर ९ एप्रिल रोजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : कधी चुकीचा पेपर तर कधी चुकीचा प्रश्न

योगेश पांडे / आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही सत्रांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सुरळीत चालू असताना यंदा मात्र काही त्रुटी दिसून येत आहेत. ‘बीकॉम’च्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ‘एमकॉम’च्या परीक्षेलादेखील ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. ५ एप्रिल रोजी ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना चुकीचा प्रश्न सोडवावा लागला, तर ९ एप्रिल रोजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.५ एप्रिल रोजी ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांचा (सीबीसीएस प्रणाली) ‘अ‍ॅडव्हान्स कॉस्ट अकाऊन्टिंग’ हा पेपर होता. या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक ३ (क) मध्ये विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार गणित सोडविणे अशक्यच होते.लाखांऐवजी हजारामध्ये आकडे देण्यात आले होते. ‘एसएफएस’ महाविद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. केंद्रप्रमुखांनी विद्यापीठाशी संपर्क केला असता प्रश्न बरोबर असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात मात्र विद्यार्थ्यांना दुसरी आकडेवारी गृहित धरण्याबाबत सांगण्यात आले. त्यामुळे आता १६ गुणांच्या प्रश्नांचे गुण जातात की काय, अशी विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे.‘सीबीसीएस’ऐवजी ‘सीबीएस’चा पेपर४दरम्यान, ९ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता ‘एमकॉम’ द्वितीय सत्राचा ‘ह्मुमन रिसोर्स मॅनेजमेन्ट’ हा पेपर होता. ‘एसएफएस’ महाविद्यालय तसेच अण्णासाहेब गुंडेवार या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ‘सीबीसीएस’ऐवजी (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) ‘सीबीएस’चा (क्रेडिट बेस्ड सेमिस्टर) पेपर देण्यात आला. पेपर हाती आल्यानंतर यातील त्यांच्या प्रणालीपेक्षा पूर्णत: वेगळा होता. गुणांची पद्धतदेखील वेगळी होती. यासंदर्भात पर्यवेक्षकांना विद्यार्थ्यांनी तातडीने माहिती दिली. विद्यापीठाला त्यानंतर संपर्क साधला असता अगोदर सर्व काही ठीक असल्याचे उत्तर देण्यात आले. परंतु त्यानंतर चूक लक्षात आली व योग्य पेपर पाठविण्यात आला. यात सुमारे दीड तासांचा वेळ निघून गेला. ‘एसएफएस’ महाविद्यालयात तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा चालली व त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तर एका केंद्रावर तर विद्यार्थ्यांनी ‘सीबीएस’चाच पेपर सोडविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा