शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सणासुदीला भेसळीचे ग्रहण

By admin | Updated: August 9, 2014 02:33 IST

श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सणानिमित्त बाजारपेठेत विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असते. याच कालावधीत पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी अन्न प्रशासन विभागाकडे आल्या आहेत.

नागपूर : श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सणानिमित्त बाजारपेठेत विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असते. याच कालावधीत पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी अन्न प्रशासन विभागाकडे आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि साधनसामग्रीचा अभाव असल्याने कारवाई कशी करणार, या विवंचनेत अधिकारी पडले आहेत. लवकरच कठोर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. आपल्याकडे भेसळीचा प्रकार नवीन नाहीत. रोजच्या खाण्यापिण्यातील बहुतेक सर्व पदार्थांतून कमी-अधिक भेसळ सर्रास होत असते. सकाळच्या दुधापासून रात्री जेवणानंतर खाण्याच्या पदार्थांपर्यंत सर्वत्र भेसळीने हातपाय पसरले आहेत. आता हा भेसळीचा कॅन्सर उपवासाच्या पदार्थांपर्यंत पोहोचावा, हे तेवढेच काळजीचे आहे. या भेसळीला आळा घालण्याची प्रमुख जबाबदारी शासन यंत्रणेवर जेवढी आहे तेवढीच ती ग्राहक या नात्याने जनतेवरही येते. उघड्यावरील अथवा साधारण पॅकिंग केलेल्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू खरेदी करताना केवळ स्वस्त या आकर्षणाला बळी न पडता मालाचा दर्जा, गुणवत्ता, त्याचा ताजेपणा, पॅकिंग, एक्स्पायरी मुदत या साऱ्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. किमान खाण्यापिण्याचे पदार्थ घेताना काळजी घ्यावी.भेसळीचा कॅन्सर, शिक्षेचे प्रमाण कमीभेसळीमागे केवळ नफाखोरी हाच उद्देश असतो. दूध, दुधाचे पदार्थ, डाळी, मसाल्याचे पदार्थ, चहा-साखर, मध, भाजीपाला, फळे, शक्तिवर्धक पेय, एवढेच नव्हे तर लहान मुलांच्या चॉकलेटपर्यंत भेसळीचा कॅन्सर पसरलेला आहे. भेसळप्रकरणी पुढे कुणावर किती कारवाई झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. भेसळीचे गुन्हे दाखल होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण एकूणच कमी आहे. महाराष्ट्रात या बद्दलची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.दुष्परिणामाची शक्यताखाद्य पदार्थांत वापरण्यात येणाऱ्या धुण्याच्या सोड्यामुळे आतड्याचे आणि पोटाचे विकार होतात. खाद्य तेलातील भेसळीमुळे अपंगत्व येण्याची भीती आहे. डाळ पावडर, अथवा मिठाईला देण्यात येणाऱ्या मेटॅनील येलो किंवा इतर प्रतिबंध केलेल्या रंगामुळे किडनीचे गंभीर आजार होतात. अशी घ्या काळजीशिळे अन्न पदार्थ, मसालेदार खाणे टाळावे. प्लेट स्वच्छ असल्याची खात्री करावी. लिखाण केलेले कागद अथवा पेपरवर गरम पदार्थ ठेवू अथवा देऊ नये. (प्रतिनिधी)