शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरी खाताय, एकदा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 12:11 IST

Nagpur News बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देटायफाईड वाढला लहान मुलांसोबतच मोठेही आजारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘टायफाईड’ म्हणजे विषमज्वराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. १०० रुग्णांमध्ये जवळपास १० रुग्ण या आजाराचे आढळून येत आहे. दूषित भोजन किंवा दूषित पाणी पिल्याने हा आजार होतो. यामुळे बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पुन्हा एकदा चौकाचौकात विविध खाद्य पदार्थांचे हातठेले उभे राहू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. परंतु या दिवसांत तापमानातील घट, शरीरातील कमी होणारी उष्णता, त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरीराचा प्रयत्न, या बदलांतून अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. सध्या दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा ‘टायफाईड’ आढळून येत आहे. नागपुरात पाणीपुरीतून हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरीतील पाणी हे उखळलेले नसते. दुसरे म्हणजे, पाणीपुरीवाला वारंवार हात त्यात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळत असते. डॉक्टरांकडे आलेल्या टायफाईडच्या काही रुग्णांनी आजारापूर्वी पाणीपुरी खाल्ल्याचेही पुढे आले आहे.

-आजाराची लक्षणे

डॉक्टरांनुसार, ‘साल्मोनेला टायफी’ नावाचा हा विषाणू मानवी शरीरात पसरतो. या रोगाच्या पहिल्या आठवड्यात शरीराचे तापमान हळूहळू वाढते. सोबतच डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटते. काहींना उलट्यांचाही त्रास होतो. डॉक्टरांनुसार, या आजाराचे निदान करताना रक्ताची चाचणी म्हणजे ‘विडाल टेस्ट’ पहिल्या आठवड्यात ‘निगेटिव्ह’ येते. परंतु रोगाच्या दुसऱ्या आठवड्यात ताप वाढतो आणि १०४ डिग्री पर्यंत पोहचतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेतही जाऊ शकतो. हगवण लागण्याचा त्रासही होऊ शकतो. याच टप्प्यात करण्यात येणाऱ्या ‘विडाल टेस्ट’मध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येतो. रोगाच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक गुंतागुंत वाढते. यात विष्ठेतून रक्त येणे, निमोनिया, पाण्याची मात्रा कमी होते. काही रुग्णाच्या शरीरावर पुरळही येतात. याच टप्प्यात रुग्णाचे प्लेटलेट्मध्ये कमी होतात. यामुळे सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचा ठरते.

-बालकांसोबतच मोठ्यांनाही आजार

डेंग्यूसोबतच टायफाईडचे रुग्ण दिसून येत आहेत. बालकांसोबत मोठेही या आजाराने पीडित आहेत. साधारण १०० रुग्णांमधून जवळपास १० रुग्ण आढळून येत आहे. स्वच्छता पाळणे, बाहेरील व उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळणे, गरम आणि ताजे अन्नाचे सेवन करणे, हाच यावर उपाय आहे.

-डॉ. सुचित बागडे, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न