शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

पाणीपुरी खाताय, एकदा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 12:11 IST

Nagpur News बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देटायफाईड वाढला लहान मुलांसोबतच मोठेही आजारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘टायफाईड’ म्हणजे विषमज्वराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. १०० रुग्णांमध्ये जवळपास १० रुग्ण या आजाराचे आढळून येत आहे. दूषित भोजन किंवा दूषित पाणी पिल्याने हा आजार होतो. यामुळे बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पुन्हा एकदा चौकाचौकात विविध खाद्य पदार्थांचे हातठेले उभे राहू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. परंतु या दिवसांत तापमानातील घट, शरीरातील कमी होणारी उष्णता, त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरीराचा प्रयत्न, या बदलांतून अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. सध्या दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा ‘टायफाईड’ आढळून येत आहे. नागपुरात पाणीपुरीतून हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरीतील पाणी हे उखळलेले नसते. दुसरे म्हणजे, पाणीपुरीवाला वारंवार हात त्यात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळत असते. डॉक्टरांकडे आलेल्या टायफाईडच्या काही रुग्णांनी आजारापूर्वी पाणीपुरी खाल्ल्याचेही पुढे आले आहे.

-आजाराची लक्षणे

डॉक्टरांनुसार, ‘साल्मोनेला टायफी’ नावाचा हा विषाणू मानवी शरीरात पसरतो. या रोगाच्या पहिल्या आठवड्यात शरीराचे तापमान हळूहळू वाढते. सोबतच डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटते. काहींना उलट्यांचाही त्रास होतो. डॉक्टरांनुसार, या आजाराचे निदान करताना रक्ताची चाचणी म्हणजे ‘विडाल टेस्ट’ पहिल्या आठवड्यात ‘निगेटिव्ह’ येते. परंतु रोगाच्या दुसऱ्या आठवड्यात ताप वाढतो आणि १०४ डिग्री पर्यंत पोहचतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेतही जाऊ शकतो. हगवण लागण्याचा त्रासही होऊ शकतो. याच टप्प्यात करण्यात येणाऱ्या ‘विडाल टेस्ट’मध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येतो. रोगाच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक गुंतागुंत वाढते. यात विष्ठेतून रक्त येणे, निमोनिया, पाण्याची मात्रा कमी होते. काही रुग्णाच्या शरीरावर पुरळही येतात. याच टप्प्यात रुग्णाचे प्लेटलेट्मध्ये कमी होतात. यामुळे सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचा ठरते.

-बालकांसोबतच मोठ्यांनाही आजार

डेंग्यूसोबतच टायफाईडचे रुग्ण दिसून येत आहेत. बालकांसोबत मोठेही या आजाराने पीडित आहेत. साधारण १०० रुग्णांमधून जवळपास १० रुग्ण आढळून येत आहे. स्वच्छता पाळणे, बाहेरील व उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळणे, गरम आणि ताजे अन्नाचे सेवन करणे, हाच यावर उपाय आहे.

-डॉ. सुचित बागडे, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न