शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

पाणीपुरी खाताय, एकदा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 12:11 IST

Nagpur News बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देटायफाईड वाढला लहान मुलांसोबतच मोठेही आजारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘टायफाईड’ म्हणजे विषमज्वराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. १०० रुग्णांमध्ये जवळपास १० रुग्ण या आजाराचे आढळून येत आहे. दूषित भोजन किंवा दूषित पाणी पिल्याने हा आजार होतो. यामुळे बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पुन्हा एकदा चौकाचौकात विविध खाद्य पदार्थांचे हातठेले उभे राहू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. परंतु या दिवसांत तापमानातील घट, शरीरातील कमी होणारी उष्णता, त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरीराचा प्रयत्न, या बदलांतून अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. सध्या दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा ‘टायफाईड’ आढळून येत आहे. नागपुरात पाणीपुरीतून हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरीतील पाणी हे उखळलेले नसते. दुसरे म्हणजे, पाणीपुरीवाला वारंवार हात त्यात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळत असते. डॉक्टरांकडे आलेल्या टायफाईडच्या काही रुग्णांनी आजारापूर्वी पाणीपुरी खाल्ल्याचेही पुढे आले आहे.

-आजाराची लक्षणे

डॉक्टरांनुसार, ‘साल्मोनेला टायफी’ नावाचा हा विषाणू मानवी शरीरात पसरतो. या रोगाच्या पहिल्या आठवड्यात शरीराचे तापमान हळूहळू वाढते. सोबतच डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटते. काहींना उलट्यांचाही त्रास होतो. डॉक्टरांनुसार, या आजाराचे निदान करताना रक्ताची चाचणी म्हणजे ‘विडाल टेस्ट’ पहिल्या आठवड्यात ‘निगेटिव्ह’ येते. परंतु रोगाच्या दुसऱ्या आठवड्यात ताप वाढतो आणि १०४ डिग्री पर्यंत पोहचतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेतही जाऊ शकतो. हगवण लागण्याचा त्रासही होऊ शकतो. याच टप्प्यात करण्यात येणाऱ्या ‘विडाल टेस्ट’मध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येतो. रोगाच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक गुंतागुंत वाढते. यात विष्ठेतून रक्त येणे, निमोनिया, पाण्याची मात्रा कमी होते. काही रुग्णाच्या शरीरावर पुरळही येतात. याच टप्प्यात रुग्णाचे प्लेटलेट्मध्ये कमी होतात. यामुळे सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचा ठरते.

-बालकांसोबतच मोठ्यांनाही आजार

डेंग्यूसोबतच टायफाईडचे रुग्ण दिसून येत आहेत. बालकांसोबत मोठेही या आजाराने पीडित आहेत. साधारण १०० रुग्णांमधून जवळपास १० रुग्ण आढळून येत आहे. स्वच्छता पाळणे, बाहेरील व उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळणे, गरम आणि ताजे अन्नाचे सेवन करणे, हाच यावर उपाय आहे.

-डॉ. सुचित बागडे, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न