शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

पाणीपुरी खाताय, एकदा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 12:11 IST

Nagpur News बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देटायफाईड वाढला लहान मुलांसोबतच मोठेही आजारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘टायफाईड’ म्हणजे विषमज्वराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. १०० रुग्णांमध्ये जवळपास १० रुग्ण या आजाराचे आढळून येत आहे. दूषित भोजन किंवा दूषित पाणी पिल्याने हा आजार होतो. यामुळे बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी विशेषत: पाणीपुरी खातांना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पुन्हा एकदा चौकाचौकात विविध खाद्य पदार्थांचे हातठेले उभे राहू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. परंतु या दिवसांत तापमानातील घट, शरीरातील कमी होणारी उष्णता, त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरीराचा प्रयत्न, या बदलांतून अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. सध्या दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा ‘टायफाईड’ आढळून येत आहे. नागपुरात पाणीपुरीतून हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरीतील पाणी हे उखळलेले नसते. दुसरे म्हणजे, पाणीपुरीवाला वारंवार हात त्यात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळत असते. डॉक्टरांकडे आलेल्या टायफाईडच्या काही रुग्णांनी आजारापूर्वी पाणीपुरी खाल्ल्याचेही पुढे आले आहे.

-आजाराची लक्षणे

डॉक्टरांनुसार, ‘साल्मोनेला टायफी’ नावाचा हा विषाणू मानवी शरीरात पसरतो. या रोगाच्या पहिल्या आठवड्यात शरीराचे तापमान हळूहळू वाढते. सोबतच डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटते. काहींना उलट्यांचाही त्रास होतो. डॉक्टरांनुसार, या आजाराचे निदान करताना रक्ताची चाचणी म्हणजे ‘विडाल टेस्ट’ पहिल्या आठवड्यात ‘निगेटिव्ह’ येते. परंतु रोगाच्या दुसऱ्या आठवड्यात ताप वाढतो आणि १०४ डिग्री पर्यंत पोहचतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेतही जाऊ शकतो. हगवण लागण्याचा त्रासही होऊ शकतो. याच टप्प्यात करण्यात येणाऱ्या ‘विडाल टेस्ट’मध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येतो. रोगाच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक गुंतागुंत वाढते. यात विष्ठेतून रक्त येणे, निमोनिया, पाण्याची मात्रा कमी होते. काही रुग्णाच्या शरीरावर पुरळही येतात. याच टप्प्यात रुग्णाचे प्लेटलेट्मध्ये कमी होतात. यामुळे सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचा ठरते.

-बालकांसोबतच मोठ्यांनाही आजार

डेंग्यूसोबतच टायफाईडचे रुग्ण दिसून येत आहेत. बालकांसोबत मोठेही या आजाराने पीडित आहेत. साधारण १०० रुग्णांमधून जवळपास १० रुग्ण आढळून येत आहे. स्वच्छता पाळणे, बाहेरील व उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळणे, गरम आणि ताजे अन्नाचे सेवन करणे, हाच यावर उपाय आहे.

-डॉ. सुचित बागडे, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न