शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

अवघ्या दोन पैशाची कमाई, कशासाठी ही जीवघेणी घाई ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 08:30 IST

Nagpur News ४०-५० रुपये कमविण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा तरुण जीवघेण्या पळापळीत स्वत:बरोबर इतरांचाही जीव टांगणीला लावत आहे. सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहे.

ठळक मुद्दे‘फूड डिलिव्हरी बॉय’कडून वाहतुकीचे नियम पायदळी दुसऱ्यांचाही जीव टांगणीला

मंगेश व्यवहारे

नागपूर : आजकाल प्रत्येकाचे जगणे पळापळीचे झाले आहे. सगळ्याच गोष्टी आता इन्स्टंट, फास्ट, पटापट हव्या आहेत. त्यात खाद्यपदार्थांचाही समावेश झाला आहे. पती-पत्नी नोकरीपेशात असलेल्या कुटुंबात फूड डिलिव्हरीची मागणी जास्त वाढली आहे. घरातच बसून नामांकित रेस्टॉरेंटची टेस्ट मिळत असल्यामुळे डिलिव्हरीच्या रूपात द्यावे लागणारे ४० ते ५० रुपये देताना कुठलाही संकोच नसतोच. हेच ४०-५० रुपये कमविण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा जीवघेण्या पळापळीत तो स्वत:बरोबर इतरांचाही जीव टांगणीला लावत आहे. सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहे. या पळापळीत डिलिव्हरी देणाऱ्याने नागपुरातच नाही तर इतरही शहरांमध्ये अपघातात जीव गमावला आहे.

‘लोकमत’ने ही जीवघेणी घाई कशासाठी? यासंदर्भात फूड डिलिव्हरी करणाऱ्यांशी संवाद साधला. ते वाहतुकीचे नियम कसे पायदळी तुडवतात यासाठी त्यांचा पाठलाग केला. ४०-५० रुपयांसाठी ते कशी कसरत करतात, वाहने कशी वेगाने चालवितात, सिग्नल जम्प करण्याची संधी मिळताच कशी वाहने दामटतात, हे कॅमेराबद्ध केले.

तो डिलिव्हरी बॉय सिग्नल तोडत सुसाट निघाला

रात्री ८.१५ वाजताची वेळ. तात्या टोपेनगरातील रस्त्यावर व्हेरायटी फूडमधून त्याने फूड पार्सल घेतले. तो लगेच वर्धा रोडकडे देवनगरच्या मार्गाने निघाला. पहिलाच देवनगरचा सिग्नल त्याने तोडला. पुढे विवेकानंदनगर चौक आला. सिग्नल रेड होता. वाहनांची रांग लागली होती. मात्र त्याने वाहनांच्या दाटीवाटीतून दुचाकी काढून सर्वात पुढे आणली. सिग्नलचा लाइट ग्रीन होताच पुन्हा गाडी दामटली. हिंदुस्थान कॉलनी होत गजाननगरच्या मार्गाने, रिंगरोडवरील रेल्वेपुलाखालून तो मानेवाडा रोडच्या दिशेने निघाला. रात्रीची ८ ची वेळ असल्याने या रस्त्यावर भरपूर वाहने होती. वाहनाच्या गर्दीत त्याने ४० ते ५० किलोमीटर वेगाची गती कायम ठेवली होती. नरेंद्रनगरचा सिग्नल तर त्याने सहजच तोडला. तुकाराम सभागृहाजवळील सिग्नललाही तो जुमानला नाही. शताब्दीनगर चौक येईपर्यंत त्याच्या गाडीचा वेग कायम होता. शताब्दीनगर चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तो पुन्हा आपली दुचाकी पुढे करण्यासाठी मार्ग शोधत होता. येथे पर्याय नसल्याने त्याला सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबावे लागले. मात्र ओंकारनगर चौकात पुन्हा सिग्नल ब्रेक केला. मानेवाडा चौकातही वाहनाची गर्दी असल्याने तो थांबला. उदयनगर चौकात त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आणि जानकीनगरकडे दुचाकी वळवीत तिथे कोपऱ्यावर एका घरी फूड डिलिव्हरी दिली. ७ किलोमीटरचे हे अंतर त्याने अवघ्या १५ मिनिटात गाठले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा