शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अवघ्या दोन पैशाची कमाई, कशासाठी ही जीवघेणी घाई ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 08:30 IST

Nagpur News ४०-५० रुपये कमविण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा तरुण जीवघेण्या पळापळीत स्वत:बरोबर इतरांचाही जीव टांगणीला लावत आहे. सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहे.

ठळक मुद्दे‘फूड डिलिव्हरी बॉय’कडून वाहतुकीचे नियम पायदळी दुसऱ्यांचाही जीव टांगणीला

मंगेश व्यवहारे

नागपूर : आजकाल प्रत्येकाचे जगणे पळापळीचे झाले आहे. सगळ्याच गोष्टी आता इन्स्टंट, फास्ट, पटापट हव्या आहेत. त्यात खाद्यपदार्थांचाही समावेश झाला आहे. पती-पत्नी नोकरीपेशात असलेल्या कुटुंबात फूड डिलिव्हरीची मागणी जास्त वाढली आहे. घरातच बसून नामांकित रेस्टॉरेंटची टेस्ट मिळत असल्यामुळे डिलिव्हरीच्या रूपात द्यावे लागणारे ४० ते ५० रुपये देताना कुठलाही संकोच नसतोच. हेच ४०-५० रुपये कमविण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा जीवघेण्या पळापळीत तो स्वत:बरोबर इतरांचाही जीव टांगणीला लावत आहे. सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहे. या पळापळीत डिलिव्हरी देणाऱ्याने नागपुरातच नाही तर इतरही शहरांमध्ये अपघातात जीव गमावला आहे.

‘लोकमत’ने ही जीवघेणी घाई कशासाठी? यासंदर्भात फूड डिलिव्हरी करणाऱ्यांशी संवाद साधला. ते वाहतुकीचे नियम कसे पायदळी तुडवतात यासाठी त्यांचा पाठलाग केला. ४०-५० रुपयांसाठी ते कशी कसरत करतात, वाहने कशी वेगाने चालवितात, सिग्नल जम्प करण्याची संधी मिळताच कशी वाहने दामटतात, हे कॅमेराबद्ध केले.

तो डिलिव्हरी बॉय सिग्नल तोडत सुसाट निघाला

रात्री ८.१५ वाजताची वेळ. तात्या टोपेनगरातील रस्त्यावर व्हेरायटी फूडमधून त्याने फूड पार्सल घेतले. तो लगेच वर्धा रोडकडे देवनगरच्या मार्गाने निघाला. पहिलाच देवनगरचा सिग्नल त्याने तोडला. पुढे विवेकानंदनगर चौक आला. सिग्नल रेड होता. वाहनांची रांग लागली होती. मात्र त्याने वाहनांच्या दाटीवाटीतून दुचाकी काढून सर्वात पुढे आणली. सिग्नलचा लाइट ग्रीन होताच पुन्हा गाडी दामटली. हिंदुस्थान कॉलनी होत गजाननगरच्या मार्गाने, रिंगरोडवरील रेल्वेपुलाखालून तो मानेवाडा रोडच्या दिशेने निघाला. रात्रीची ८ ची वेळ असल्याने या रस्त्यावर भरपूर वाहने होती. वाहनाच्या गर्दीत त्याने ४० ते ५० किलोमीटर वेगाची गती कायम ठेवली होती. नरेंद्रनगरचा सिग्नल तर त्याने सहजच तोडला. तुकाराम सभागृहाजवळील सिग्नललाही तो जुमानला नाही. शताब्दीनगर चौक येईपर्यंत त्याच्या गाडीचा वेग कायम होता. शताब्दीनगर चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तो पुन्हा आपली दुचाकी पुढे करण्यासाठी मार्ग शोधत होता. येथे पर्याय नसल्याने त्याला सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबावे लागले. मात्र ओंकारनगर चौकात पुन्हा सिग्नल ब्रेक केला. मानेवाडा चौकातही वाहनाची गर्दी असल्याने तो थांबला. उदयनगर चौकात त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आणि जानकीनगरकडे दुचाकी वळवीत तिथे कोपऱ्यावर एका घरी फूड डिलिव्हरी दिली. ७ किलोमीटरचे हे अंतर त्याने अवघ्या १५ मिनिटात गाठले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा