शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन पैशाची कमाई, कशासाठी ही जीवघेणी घाई ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 08:30 IST

Nagpur News ४०-५० रुपये कमविण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा तरुण जीवघेण्या पळापळीत स्वत:बरोबर इतरांचाही जीव टांगणीला लावत आहे. सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहे.

ठळक मुद्दे‘फूड डिलिव्हरी बॉय’कडून वाहतुकीचे नियम पायदळी दुसऱ्यांचाही जीव टांगणीला

मंगेश व्यवहारे

नागपूर : आजकाल प्रत्येकाचे जगणे पळापळीचे झाले आहे. सगळ्याच गोष्टी आता इन्स्टंट, फास्ट, पटापट हव्या आहेत. त्यात खाद्यपदार्थांचाही समावेश झाला आहे. पती-पत्नी नोकरीपेशात असलेल्या कुटुंबात फूड डिलिव्हरीची मागणी जास्त वाढली आहे. घरातच बसून नामांकित रेस्टॉरेंटची टेस्ट मिळत असल्यामुळे डिलिव्हरीच्या रूपात द्यावे लागणारे ४० ते ५० रुपये देताना कुठलाही संकोच नसतोच. हेच ४०-५० रुपये कमविण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा जीवघेण्या पळापळीत तो स्वत:बरोबर इतरांचाही जीव टांगणीला लावत आहे. सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहे. या पळापळीत डिलिव्हरी देणाऱ्याने नागपुरातच नाही तर इतरही शहरांमध्ये अपघातात जीव गमावला आहे.

‘लोकमत’ने ही जीवघेणी घाई कशासाठी? यासंदर्भात फूड डिलिव्हरी करणाऱ्यांशी संवाद साधला. ते वाहतुकीचे नियम कसे पायदळी तुडवतात यासाठी त्यांचा पाठलाग केला. ४०-५० रुपयांसाठी ते कशी कसरत करतात, वाहने कशी वेगाने चालवितात, सिग्नल जम्प करण्याची संधी मिळताच कशी वाहने दामटतात, हे कॅमेराबद्ध केले.

तो डिलिव्हरी बॉय सिग्नल तोडत सुसाट निघाला

रात्री ८.१५ वाजताची वेळ. तात्या टोपेनगरातील रस्त्यावर व्हेरायटी फूडमधून त्याने फूड पार्सल घेतले. तो लगेच वर्धा रोडकडे देवनगरच्या मार्गाने निघाला. पहिलाच देवनगरचा सिग्नल त्याने तोडला. पुढे विवेकानंदनगर चौक आला. सिग्नल रेड होता. वाहनांची रांग लागली होती. मात्र त्याने वाहनांच्या दाटीवाटीतून दुचाकी काढून सर्वात पुढे आणली. सिग्नलचा लाइट ग्रीन होताच पुन्हा गाडी दामटली. हिंदुस्थान कॉलनी होत गजाननगरच्या मार्गाने, रिंगरोडवरील रेल्वेपुलाखालून तो मानेवाडा रोडच्या दिशेने निघाला. रात्रीची ८ ची वेळ असल्याने या रस्त्यावर भरपूर वाहने होती. वाहनाच्या गर्दीत त्याने ४० ते ५० किलोमीटर वेगाची गती कायम ठेवली होती. नरेंद्रनगरचा सिग्नल तर त्याने सहजच तोडला. तुकाराम सभागृहाजवळील सिग्नललाही तो जुमानला नाही. शताब्दीनगर चौक येईपर्यंत त्याच्या गाडीचा वेग कायम होता. शताब्दीनगर चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तो पुन्हा आपली दुचाकी पुढे करण्यासाठी मार्ग शोधत होता. येथे पर्याय नसल्याने त्याला सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबावे लागले. मात्र ओंकारनगर चौकात पुन्हा सिग्नल ब्रेक केला. मानेवाडा चौकातही वाहनाची गर्दी असल्याने तो थांबला. उदयनगर चौकात त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आणि जानकीनगरकडे दुचाकी वळवीत तिथे कोपऱ्यावर एका घरी फूड डिलिव्हरी दिली. ७ किलोमीटरचे हे अंतर त्याने अवघ्या १५ मिनिटात गाठले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा