शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

ई-पॉस मशीन पडताहेत बंद, धान्य वाटपात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 21:22 IST

E-pos machines are shutting down, grain distribution problems, Nagpur newsराज्यात वाढत्या कोरोनामुळे गरीब नागरिक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून मे महिन्यात राज्य सरकारने नि:शुल्क धान्य वाटपाची घोषणा केली, तर केंद्र सरकारनेसुद्धा मोफत धान्य देण्याची घोषणा केली. परंतु ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. म

ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे कार्डधारक रेशनपासून वंचित : अधिकारी बनले मूकदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात वाढत्या कोरोनामुळे गरीब नागरिक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून मे महिन्यात राज्य सरकारने नि:शुल्क धान्य वाटपाची घोषणा केली, तर केंद्र सरकारनेसुद्धा मोफत धान्य देण्याची घोषणा केली. परंतु ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. मशीनच्या या तांत्रिक बिघाडामुळे धान्य वाटपात अनेक अडचणी येत आहेत. वेळेत धान्य वाटप करणे कठीण जात आहे. परिणामी अनेकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. या अडचणीमुळे रेशन दुकानदारही त्रस्त झाले असून, ते याबाबत अन्न व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आहेत. परंतु विभागातील अधिकारी मूकदर्शक बनले आहेत.

ई-पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून धान्य वाटप केले जाते. ई-पॉश मशीन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच आरसी नंबर टाकले जाते. यानंतर मशीनमध्ये संबंधित कार्डधारकाचा धान्याचा कोटा येतो. या प्रक्रियेनंतर मशीन लगेच बिल दाखविते. परंतु सध्या ई-पॉश मशीन बिल दाखवितच नाही आहे. दुकानदारांचे म्हणणे आहे की, सात ते आठवेळा प्रयत्न केल्यानंतर मशीनमध्ये बिल दर्शविले जाते. परंतु लगेच मशीन बंद पडते. बिलशिवाय धान्य वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे ट्रान्झक्शनची माहिती देता येत नाही. परिणामी किती धान्य वाटप झाले ते माहीत होणार नाही. यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते धान्य वाटप करू शकत नाही आहेत. अनेक कार्डधारकांना रेशन न घेताच परत जावे लागत आहे.

दोन महिन्याच्या धान्य वितरणामुळे वाढला लोड

कोरोना संक्रमणामुळे अनेक नागरिकांनी एप्रिल महिन्याचे धान्य उचलले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्याचे धान्य एकाच वेळी वाटप केले जात आहे. कदाचित यामुळेच ई-पॉश मशीनमध्ये लोड वाढला आहे. यापूर्वीही अशा अडचणी आलेल्या आहेत.

पीएम योजनेचा कोटाही दाखवीत नाही आहे

कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना एप्रिल व मे महिन्यासाठी प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वाटप केले जात आहे. परंतु मशीनमध्ये पीएम योजनेच्या धान्याचा कोटाही दर्शविला जाात नाही आहे. यामुळे या योजनेचाही लाभही नागरिकांना मिळत नाही आहे.

अधिकारी करताहेत दुर्लक्ष

तांत्रिक अडचण, सर्व्हर डाऊन आदी समस्यांबाबत विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले जात आहे. परंतु ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी संबंधित एजन्सीसमोर या अडचणी ठेवून त्या सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे. परंतु अधिकारी केवळ मूकदर्शक बनले आहेत.

- संजय पाटील, अध्यक्ष

विदर्भ राशनभाव दुकानदार/केरोसिन विक्रेता संघटना

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार