शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

ई-पॉस मशीन पडताहेत बंद, धान्य वाटपात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 21:22 IST

E-pos machines are shutting down, grain distribution problems, Nagpur newsराज्यात वाढत्या कोरोनामुळे गरीब नागरिक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून मे महिन्यात राज्य सरकारने नि:शुल्क धान्य वाटपाची घोषणा केली, तर केंद्र सरकारनेसुद्धा मोफत धान्य देण्याची घोषणा केली. परंतु ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. म

ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे कार्डधारक रेशनपासून वंचित : अधिकारी बनले मूकदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात वाढत्या कोरोनामुळे गरीब नागरिक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून मे महिन्यात राज्य सरकारने नि:शुल्क धान्य वाटपाची घोषणा केली, तर केंद्र सरकारनेसुद्धा मोफत धान्य देण्याची घोषणा केली. परंतु ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. मशीनच्या या तांत्रिक बिघाडामुळे धान्य वाटपात अनेक अडचणी येत आहेत. वेळेत धान्य वाटप करणे कठीण जात आहे. परिणामी अनेकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. या अडचणीमुळे रेशन दुकानदारही त्रस्त झाले असून, ते याबाबत अन्न व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आहेत. परंतु विभागातील अधिकारी मूकदर्शक बनले आहेत.

ई-पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून धान्य वाटप केले जाते. ई-पॉश मशीन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच आरसी नंबर टाकले जाते. यानंतर मशीनमध्ये संबंधित कार्डधारकाचा धान्याचा कोटा येतो. या प्रक्रियेनंतर मशीन लगेच बिल दाखविते. परंतु सध्या ई-पॉश मशीन बिल दाखवितच नाही आहे. दुकानदारांचे म्हणणे आहे की, सात ते आठवेळा प्रयत्न केल्यानंतर मशीनमध्ये बिल दर्शविले जाते. परंतु लगेच मशीन बंद पडते. बिलशिवाय धान्य वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे ट्रान्झक्शनची माहिती देता येत नाही. परिणामी किती धान्य वाटप झाले ते माहीत होणार नाही. यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते धान्य वाटप करू शकत नाही आहेत. अनेक कार्डधारकांना रेशन न घेताच परत जावे लागत आहे.

दोन महिन्याच्या धान्य वितरणामुळे वाढला लोड

कोरोना संक्रमणामुळे अनेक नागरिकांनी एप्रिल महिन्याचे धान्य उचलले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्याचे धान्य एकाच वेळी वाटप केले जात आहे. कदाचित यामुळेच ई-पॉश मशीनमध्ये लोड वाढला आहे. यापूर्वीही अशा अडचणी आलेल्या आहेत.

पीएम योजनेचा कोटाही दाखवीत नाही आहे

कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना एप्रिल व मे महिन्यासाठी प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वाटप केले जात आहे. परंतु मशीनमध्ये पीएम योजनेच्या धान्याचा कोटाही दर्शविला जाात नाही आहे. यामुळे या योजनेचाही लाभही नागरिकांना मिळत नाही आहे.

अधिकारी करताहेत दुर्लक्ष

तांत्रिक अडचण, सर्व्हर डाऊन आदी समस्यांबाबत विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले जात आहे. परंतु ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी संबंधित एजन्सीसमोर या अडचणी ठेवून त्या सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे. परंतु अधिकारी केवळ मूकदर्शक बनले आहेत.

- संजय पाटील, अध्यक्ष

विदर्भ राशनभाव दुकानदार/केरोसिन विक्रेता संघटना

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार