शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:11 IST

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या पोर्टलचे संचालन थांबविले असून देशाच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे विफल ठरले आहेत.

ठळक मुद्दे किरकोळ व्यापाऱ्यांना हवे आर्थिक पॅकेज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या पोर्टलचे संचालन थांबविले असून देशाच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे विफल ठरले आहेत.संकटकाळात ई-कॉमर्स पोर्टलची अशी वागणूक निंदनीय आहे. अशा काळात वाणिज्य वर्गांनी आपली जबाबदारी पार पाडून देशाच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. पण संकटात ई-कॉमर्स कंपन्या चक्क गायब झाल्याचा आरोप कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी लोकमतशी बोलताना केला. लोकांना मदतीची गरज असताना ई-कॉमर्स कंपन्यांनी पोर्टल बंद करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. अशा संकटकाळात व्यवसाय करणे या कंपन्यांना फायद्याचे वाटत नाही. पण अपार संशाधन असलेले ई-वाणिज्य पोर्टल किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय संपुष्टात आणण्यासाठी वर्षभर प्रयत्नरत करतात. पण आता ते पूर्णपणे अज्ञातवासात गेले आहे. देशावर आलेल्या संकटकाळात त्यांच्या पोर्टलची नितांत गरज आहे. संकटकाळात मित्र आणि शत्रूची खरी ओळख लोकांना झाली आहे.देशात आवश्यक वस्तूंच्या वितरणात व्यापाऱ्यांच्या भूमिकेची भरतीया यांनी प्रशंसा केली. सर्व अडचणींवर मात करीत आणि कोरोनामुळे संक्रमित होण्याची शक्यता असतानाही व्यापारी स्वत:ला संकटात टाकून देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्यरित्या करीत आहेत. देशात आवश्यक वस्तूंचा व्यापार करणाºया जवळपास १.२५ कोटी व्यावसायिकांमध्ये लॉकडाऊनचे प्रतिबंध आणि अन्य अडचणीनंतरही २५ टक्के व्यापारी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. कोरोनामुळे देशातील व्यवसाय सध्या अनिश्चित आहे. गेल्या २० दिवसांमध्ये देशातील किरकोळ व्यवसायात दरदिवशी जवळपास १५ हजार कोटींच्या व्यवसायाची हानी होत आहे. भारतात जवळपास सात कोटी व्यापाऱ्यांपैकी जवळपास ६.५ कोटी व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनमुळे आपला व्यापार बंद केला आहे. अशा व्यापाऱ्यांसाठी एक विशेष आर्थिक पॅकेजची मागणी पंतप्रधानांकडे पत्र लिहून केली आहे. व्यापाऱ्यांना पॅकेज मिळाल्यास कोरोना महामारीचा ते दृढतेने सामना करतील, असे भरतीया म्हणाले.

 

टॅग्स :businessव्यवसाय