शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

शहरात धावणार ‘ई-आॅटो’

By admin | Updated: September 7, 2015 02:54 IST

इंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते.

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरइंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी बॅटरीवरील वाहनांचा विकास आणि वापर यासाठी आता शासनाने पुढाकार घेतला आहे. नागपुरात तीन आॅटोरिक्षांना बॅटरीवर चालविण्यासाठी प्रायोगिक स्तरावर ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवे’ (एमओआरटीएच) मंजुरी दिली आहे. ‘ई-रिक्षा’सोबतच आता ‘ई-आॅटो’मुळे नागपुरातील प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. देशातील इंधनाची वाढती मागणी आणि प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी २०२० पर्यंत सुमारे ७० लाख हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याचा मुख्य उद्देश भारताची खनिज तेल आणि इंधनावर असणारे अवलंबित्व कमी करणे व त्यावर होणारा मोठा खर्च कमी करणे हा आहे. बॅटरी व पेट्रोल किंवा डिझेलवर संयुक्त चालणारी, अशी हायब्रीड वाहनांमध्ये नागपुरात कार व दुचाकीच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर केवळ बॅटरी आॅपरेटेडमध्ये ‘ई-रिक्षा’ नागपुरात धावत आहे. आता यात आॅटोरिक्षांची भर पडणार आहे. १० सप्टेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत तीन आॅटोरिक्षांना प्रायोगिक स्तरावर चालविण्यासाठी ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवे’ने (एमओआरटीएच) याला विशेष मंजुरी दिली आहे. हे आदेश परिवहन सचिवांकडून परिवहन आयुक्तांना देण्यात आले असून या संदर्भातील सूचना नागपूर शहर आरटीओला नुकत्याच मिळाल्या आहेत. या आॅटोरिक्षा शहरातील एका महाविद्यालयाने विकसित केल्या आहेत.प्रदूषणाची पातळी कमी होईलनागपूरसारख्या गजबजलेल्या शहरात १४ लाख वाहने रस्त्यावर धावत असल्याने प्रदूषणाची पातळी नेहमीच उच्चांकी असते. त्यामुळे, पर्यावरणपूरक आणि 'झिरो पोल्युशन' करणाऱ्या ‘ई-आॅटोरिक्षा’ला अंतिम मंजुरी मिळाल्यास नागपूर आदर्श शहर ठरण्याची शक्यता आहे. यातील आव्हाने ही प्रचंडे आहेत. परंतु ही एक काळाची गरज नक्कीच आहे. सरकारने या दिशेने पावले उचलली आहेत. परंतु त्याचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी जरुरी असल्याचे परिवहन खात्यातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. असे आहे बॅटरी आॅटोरिक्षाआॅटोरिक्षामधील पेट्रोलवर चालणारे इंजिन काढून बॅटरी आॅपरेटेड इंजिन लावण्यात आले आहे. अ‍ॅटोमोटिव्ह रिसर्च सेंटर (एआरआय) पुणे यांच्याकडून प्रायोगिक स्तरावर धावणाऱ्या या आॅटोरिक्षाची तपासणी करण्यात येईल. यात टायर, बॅटरी, इंजिनची क्षमता, सुरक्षितता, किती वजन घेऊन आॅटो धावू शकतो अशा विविध स्तरावर तपासणी होईल. त्यानंतरच एआरआयची अंतिम मंजुरी मिळेल.