शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शहरात धावणार ‘ई-आॅटो’

By admin | Updated: September 7, 2015 02:54 IST

इंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते.

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरइंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी बॅटरीवरील वाहनांचा विकास आणि वापर यासाठी आता शासनाने पुढाकार घेतला आहे. नागपुरात तीन आॅटोरिक्षांना बॅटरीवर चालविण्यासाठी प्रायोगिक स्तरावर ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवे’ (एमओआरटीएच) मंजुरी दिली आहे. ‘ई-रिक्षा’सोबतच आता ‘ई-आॅटो’मुळे नागपुरातील प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. देशातील इंधनाची वाढती मागणी आणि प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी २०२० पर्यंत सुमारे ७० लाख हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याचा मुख्य उद्देश भारताची खनिज तेल आणि इंधनावर असणारे अवलंबित्व कमी करणे व त्यावर होणारा मोठा खर्च कमी करणे हा आहे. बॅटरी व पेट्रोल किंवा डिझेलवर संयुक्त चालणारी, अशी हायब्रीड वाहनांमध्ये नागपुरात कार व दुचाकीच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर केवळ बॅटरी आॅपरेटेडमध्ये ‘ई-रिक्षा’ नागपुरात धावत आहे. आता यात आॅटोरिक्षांची भर पडणार आहे. १० सप्टेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत तीन आॅटोरिक्षांना प्रायोगिक स्तरावर चालविण्यासाठी ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवे’ने (एमओआरटीएच) याला विशेष मंजुरी दिली आहे. हे आदेश परिवहन सचिवांकडून परिवहन आयुक्तांना देण्यात आले असून या संदर्भातील सूचना नागपूर शहर आरटीओला नुकत्याच मिळाल्या आहेत. या आॅटोरिक्षा शहरातील एका महाविद्यालयाने विकसित केल्या आहेत.प्रदूषणाची पातळी कमी होईलनागपूरसारख्या गजबजलेल्या शहरात १४ लाख वाहने रस्त्यावर धावत असल्याने प्रदूषणाची पातळी नेहमीच उच्चांकी असते. त्यामुळे, पर्यावरणपूरक आणि 'झिरो पोल्युशन' करणाऱ्या ‘ई-आॅटोरिक्षा’ला अंतिम मंजुरी मिळाल्यास नागपूर आदर्श शहर ठरण्याची शक्यता आहे. यातील आव्हाने ही प्रचंडे आहेत. परंतु ही एक काळाची गरज नक्कीच आहे. सरकारने या दिशेने पावले उचलली आहेत. परंतु त्याचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी जरुरी असल्याचे परिवहन खात्यातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. असे आहे बॅटरी आॅटोरिक्षाआॅटोरिक्षामधील पेट्रोलवर चालणारे इंजिन काढून बॅटरी आॅपरेटेड इंजिन लावण्यात आले आहे. अ‍ॅटोमोटिव्ह रिसर्च सेंटर (एआरआय) पुणे यांच्याकडून प्रायोगिक स्तरावर धावणाऱ्या या आॅटोरिक्षाची तपासणी करण्यात येईल. यात टायर, बॅटरी, इंजिनची क्षमता, सुरक्षितता, किती वजन घेऊन आॅटो धावू शकतो अशा विविध स्तरावर तपासणी होईल. त्यानंतरच एआरआयची अंतिम मंजुरी मिळेल.